अनुभूमिका (४)
या चौदाव्या समुल्लासात आम्ही
मुसलमानांच्या (मता) पंथाविषयी विवेचन केले आहे. ते केवळ कुराणाच्या
अभिप्रायानुसार आहे. इतर ग्रंथांचा विचार नाही. कारण मुसलमान कुराणावरच पूर्ण
श्रद्धा ठेवतात. मुसलमानांमध्ये अनेक पंथ असल्याने एखाद्या शब्दाचा काय अर्थ
लावायचा या विषयी त्यांच्यात मतभेद आहेत. तथापि कुराणावरील श्रद्धेच्या बाबतीत
सर्वांचे एकमत आहे. मूळ कुराण अरबी भाषेत असून मौलवी लोकांनी ते उर्दूत लिहिले
आहे. त्याचे देवनागरी, हिंदीत रूपांतर करून ते अरबीच्या मोठमोठ्या विद्वानांकडून आम्ही तपासून लिहिले
आहे. जर कोणी असे म्हणेल की, अमुक अर्थ बरोबर नाही, तर त्याने प्रथम मौलवी साहेबांच्या भाषांतराचे खंडन करावे
आणि मग या विषयावर लिहावे कारण लिखाण केवळ मानव जातीच्या कल्याणासाठी व
सत्यासत्याच्या निर्णयासाठी केलेले आहे. सर्व (मतां) पंथाविषयी थोडे थोडे ज्ञान
प्रत्येकाला व्हावे व त्याने लोकांना परस्पराशी विचार विनिमय करण्याची संधी मिळावी
आणि त्यांनी एकमेकांच्या दोषाचे खंडन करून गुणांचे ग्रहण करावे. इतर मत-पथांवर ना
या मतावर खोटेनाटे दोषारोप करावे अथवा त्यांची अवास्तव दुल करावो,
हा हेतू नसून जे गुण म्हणून सांगावेत व जे दोष आहेत ते दोष
सर्वांना कळावेत. यामुळे कोणीही खोट्या गोष्टी खऱ्या म्हणून सांगू शकणार नाही आणि
सत्याच्या मार्गात अडथळा निर्माण करू शकणार नाही आणि अशा प्रकारे सत्यासत्य
प्रकाशित केल्यानंतरही ज्याची इच्छा असेल त्याने ते मानावे अथवा मानू नये. कोणावरही
जुलूम जबरदस्ती केली जात नाही. आपल्या अथवा इतरांच्या दोषांना दोष व गुणांना गुण
समजून गुणांचे ग्रहण व दोषांचा त्याग करणे, तसेच दुराग्राही लोकांचा दुराग्रह कमी करणे हीच सज्जनांची
रीत आहे. कारण पक्षपातामुळे जगात खूपच अनर्थ घडले आहेत व घडत आहेत. खरी गोष्ट अशी
आहे की,
या अनिश्चित व क्षणभंगुर जीवनात दुसऱ्याचे नुकसान करून
स्वतःला व इतरांना लाभापासून वंचित ठेवणे हे माणुसकीला शोभणारे नाही.
जर काही वस्तुस्थितीच्या विरुद्ध
लिहिले गेले असेल तर सज्जन लोकांनी त्या आमच्या निदर्शनास आणून
2
द्यावे. नंतर जे उचित असेल ते
मानले जाईल कारण हे लिखाण हट्ट,दुराग्रह, ईर्ष्या, द्वेष, वादविवाद व विरोध वाढविण्यासाठी नव्हे तर कमी करण्यासाठी
करण्यात आलेले आहे. एकमेकांची हानी करण्यापासून वेगळे राहून परस्परांना लाभदायक
होईल असे कार्य करणे हे आमचे मुख्य कर्तव्य आहे. आता या चौदाव्या समुल्लासात मुसलमानांच्या
पंथाविषयीचे विवेचन सर्व सज्जनांच्या विचारार्थ मी प्रस्तुत करीत आहे. त्यांनी
विचार करून त्यातील इष्ट असेल ते ग्रहण करावे आणि अनिष्ट असेल त्याचा त्याग करावा.
आजकाल कुराणच्या सर्वसाधारण उपलब्ध
आवृत्तीमध्ये सूरतचे नाव व आयतची क्रम संख्याच दिली जाते. परंतु या कारणाने
महर्षिनी दिलेले संदर्भ-चुकीचे होत नाहीत. तरीही आम्ही सर्वसाधारण वाचकांच्या
विशेष सोईसाठी कुराणच्या सध्याच्या सर्वसाधारण आवृत्तीतील काही संदर्भ चौदाव्या
समुल्लासाच्या समीक्षेच्या क्रमाने खाली देत आहोत.
॥ अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु
इत्यनुभूमिका॥
3
चौदावा समुल्लास
मुस्लिम पंथाची समीक्षा
यानंतर मुसलमानांविषयी आम्ही
लिहिणार आहोत.
ईश्वराच्या नावाने आरंभ
(१) परम दयाळू (आणि) कृपाळू परमेश्वराच्या नावाने (मी आरंभ
करतो) ।। -मंजिल १। सिपारा १। सूरत १।।
(समीक्षक) मुसलमान लोक असे म्हणतात की,
कुराण हे ईश्वराचे आहे; परंतु या वचनावरून असे दिसून येते की,
हे रचणारा कोणीतरी दुसरा आहे. कारण जर परमेश्वराने कुराण
रचले असते तर ’परमेश्वराच्या नावाने मी आरंभ करतो' असे न म्हणता त्याने 'मानवांना उपदेश देण्यासाठी मी आरंभ करतो'
असे म्हटले असते. 'तुम्ही असे म्हणा,' अशी शिकवण तो माणसांना देत असेल तर तेही बरोबर नाही. कारण
पापाचा प्रारंभही देवाच्या नावाने होऊन देवाचे नावही दूषित होऊन जाईल. जर तो दया व
क्षमा करणारा असेल तर त्याने आपल्या सुष्टितील मनुष्यांच्या सुखासाठी इतर
प्राण्यांना दारुण पीडा देऊन मारण्याची व त्यांचे मांस खाण्याची आज्ञा का दिली ?
ते प्राणी निरपराधी व परमेश्वराने निर्माण केलेले नाहीत काय
?
त्याने हे सुद्धा असे सांगावयास पाहिजे होते की,
'परमेश्वराच्या नावाने मी फक्त
चांगल्या गोष्टीचा आरंभ करतो. वाईट गोष्टींचा नव्हे,’ या वचनात गोंधळ, घोटाळा आहे. चोरी, जारी (व्यभिचार), मिथ्याभाषण वगैरे अथार्मिक कृत्यांचा प्रारंभही देवाचे नाव
घेऊन करावा काय? असा
गोंधळ असल्यामुळेच कसाई वगैरे मुसलमान गाय वगैरे पशूंच्या माना कापतानाही प्रारंभी
बिस्मिल्लाह (देवाच्या नावाने) असे म्हणतात. जर हाच याचा पूर्वोक्त अर्थ आहे तर वाईट
गोष्टीचा प्रारंभ सुद्धा परमेश्वराच्या नावाने म्हणतात. यामुळे मुसलमानांचा खुदा
दयाळू देखील राहणार नाही. कारण त्याची दया त्या पशूवर राहिली नाही. मुसलमानांना या
वचनाचा दुसराच अर्थ करतात. वेगळा अर्थ लावीत असतील तर त्याचा शुद्ध अर्थ काय आहे?
इत्यादी॥१॥
(२) सर्व स्तुती सकल जगाचा पालनकर्ता असा जो परमेश्वर
त्यालाच (योग्य) आहे. (तो) परम दयाळू (आणि) कृपाळू (आहे). -मं० १। सि० १।
सूरतुल्फातिहा आयत १। २।।
4
(समीक्षक) कुराणाचा खुदा जगाचा पालनकर्ता आणि सर्वावर दया
करणारा व क्षमाशील असता तर इतर मता (पंथा) च्या लोकांना आणि पशुपक्ष्यांनाही मुसलमानांकडून
मारण्याचा हुकूम त्याने दिला नसता. तो क्षमा करणारा आहे म्हणजे तो पाप्यांनाही
क्षमा करील काय? जर
तसे असेल तर काफिरांची कत्तल करा. जे कुराण व पैगंबर यांना मानणारे नाहीत ते काफिर
आहेत असे त्याने मुसलमानांना का सांगितले असते ? म्हणुन कुराण हे ईश्वरकृत दिसत नाही. ॥२॥
(३) (तो शेवटच्या) निर्णयाच्या दिवसाचा धनी (आहे). (हे
परमेश्वरा) तुझीच भक्ती आम्ही करीत आहोत; व तुझीच मदत आम्ही मागत आहोत. तू सरळ मार्ग दाखव. -मंन१।
सि० १। सू० १। आ० ३। ४। ५।।
(समीक्षक) परमेश्व रनित्य न्याय करीत नाही काय?
तो एका दिवशीच न्यायनिवाडा करतो काय ?
यामुळे तर अंधार दिसत आहे. त्याचीच भक्ती करणे व
त्याच्याकडेच साह्या मागणे हे ठीक आहे. परंतु वाईट गोष्टीसाठीही साह्य मागावयाचे
काय?
आणि सरळ (योग्य) मार्ग फक्त मुसलमानांनाच आहे की इतरांचाही
आहे?
सरळ मार्गाचा अवलंब मुसलमान का करीत नाहीत ?
वाईट गोष्टीकडे नेणारा सरळ मार्ग तर त्यांना नको ना?
सर्वांचे कल्याण एकच आहे. तर मग मुसलमानांचेच असे काय
वैशिष्ट्य राहिले? जे इतरांचे कल्याण इच्छित नसतील तर ते पक्षपाती आहेत. ॥३॥
(४) (म्हणजे) ज्या (लोकां) वर कृपा केली आहेस त्यांना मार्ग
(दाखव) पण ज्यांच्यावर (तुझा) कोप झालेला आहे त्यांना (मार्ग) नको आणि आडमार्गी
भटकणाऱ्यांनाही नको-मं० १। सि० १। सू० १। आ० ६। ७।।
(समीक्षक) जर मुसलमान लोक पूर्वजन्म व पूर्वकृत पाप-पुण्य
मानीत नाहीत तर काही लोकांवर दया करणे व काही लोकांवर दया न करणे यामुळे परमेश्वर
पक्षपाती होईल. कारण पापपुण्याचा विचार न करता सुखदुख देणे हा निव्वळ अन्याय आहे.
तसेच विनाकारण एखाद्यावर दया करणे आणि एखाद्यावर कोप करणे हेही अस्वाभाविक आहे.
कारण पापपुण्याचा विचार केल्याशिवाय तो दया अथवा कोप करू शकत नाही आणि त्यांचे
पूर्वसंचित पापपुण्यच नाही तर कोणावर दया करणे व कोणावर क्रोध करणे होऊ शकत नाही.
या आयतीवरील टिपणीत (भाष्यामध्ये) ‘लोकांनी हा सूरा नेहमी याप्रकारे म्हणावा,
यासाठी परमेश्वराने तो लोकांच्या तोंडून वदविला आहे.'
असे असेल तर अलिफ, बे वगैरे अक्षरेही ईश्वराने शिकविली असतील. जर तसे नसेल तर
अक्षरज्ञानाशिवाय हा सूरा ते लोक कसे वाचू (म्हणू) शकले?
ईश्वराने नुसते ते त्यांना म्हणायला सांगितले व ते म्हणत
गेले काय?
असे असेल संपूर्ण कुराण तोंडी शिकविले असणार यावरून असे
समजले पाहिजे की, ज्या पुस्तकात पक्षपाताच्या गोष्टी असतील ते पुस्तक ईश्वरकृत होऊ शकत नाही.
जसे कुराण अरबी भाषेत अवतरल्यामुळे अरब लोकांना त्याचे वाचन-अध्ययन करणे सोपे तर
इतर भाषा बोलणाऱ्यांना अवघड जाते. यामुळे परमेश्वरात पक्षपात येतो. ज्याप्रमाणे
परमेश्वराने या सृष्टितील सर्व देशांत राहणाऱ्या लोकांविषयी न्यायदृष्टी बाळगून सर्वच
देशांतील लोकांना जी भाषा समान परिश्रम घेऊन शिकावी लागते अशा विलक्षण संस्कृत
भाषेत वेदांची रचना केली त्याप्रमाणे त्याने कुराणाच्या बाबतीत केले असते तर
त्याच्यावर पक्षपातीपणाचा आरोप ठेवता आला नसता. ॥४॥
5
पहिल्या पुस्तकात कमतरता होती काय ?
(५) हे (असे) पुस्तक (होय की) त्या (च्या ईश्वरवाणी होण्या)
त कसलाच संशय नाही. (ते परमेश्वराला) भिऊन चालणाऱ्यांस सन्मार्गदर्शक (होय).
(म्हणजे) जे लोक (धर्मविषयक) गैबी-इंद्रियातीत-गोष्टीवर विश्वास ठेवतात व (नित्य)
नमाज पढतात आणि जे काही आम्ही देऊन ठेवले आहे त्यातून (परमार्थत) खर्च वेच करतात;
आणि (हे पैगंबरा!) जे लोक, तुला जे (पुस्तक) प्रकट करण्यात आले आहे त्यावर व
तुझ्यापूर्वी जी (पुस्तके) प्रकट झाली आहेत त्यांवर विश्वास ठेवतात,
आणि परलोकीचीही जे (पूर्ण) खात्री बाळगतात,
असलेच लोक आपल्या पालनकर्त्यांच्या सरळ मार्गावर होत;
आणि हेच (अखेर आपल्या मनोरथात) सफल होतील. (हे पैगंबरा)
च्या लोकांनी (इस्लाम स्वीकारण्याचे) नाकारिले, त्यांना त् (ईश्वरी शिक्षेचे) भय दाखवलेस काय अगर न
दाखविलेस काय सारखेच. ते तर विश्वास धरणार नाहीत. परमेश्वराने त्यांच्या अंत:करणावर
व त्याच्या कानांवर मोहर लावला आहे, व त्यांच्या डोळ्यावर पडदा (पाडला) आहे;
आणि त्यांना (परलोकी) मोठी शिक्षा (होणे) आहे. -मं० १।
सि०१। सूरत २। आ० १। २। ३। ४। ५। ६। ७।।
(समीक्षक) आपल्याच तोंडाने आपल्याच पुस्तकाची प्रशंसा करणे
ही ईश्वराची दांभिकता नाही काय? परहेजगार म्हणजे धार्मिक लोक स्वत:च सन्मार्गावर असतात. पण
जे वाईट मार्गाने जाणारे आहेत त्यांना हे कुराण सन्मार्ग दाखवूच शकत नाही. मग
त्याचा काय उपयोग?॥१॥ पाप, पुण्य
व पुरुषार्थ केल्याशिवाय परमेश्वर आपल्याच खजिन्यातून खर्च करण्यास पैसे देतो काय?
जर देत असेल तर सर्वांना का देत नाही ?
आणि मग मुसलमान लोक परिश्रम कशाला करतात?॥२॥ जर बायबल वगैरे मतग्रंथावर श्रद्धा ठेवणे योग्य आहे तर
मुसलमान लोक कुराणावर जशी श्रद्धा ठेवतात तशी बायबल वगैरे ग्रंथावर का ठेवीत नाहीत?
आणि जर ते तशी श्रद्धा ठेवीत असतील तर कुराणाचे अस्तित्व
कशासाठी आहे ? कुराणात
अधिक गोष्टी सांगितल्या आहेत असे म्हणणे असेल तर पूर्वीच्या ग्रंथात म्हणजे
बायबलात त्यागोष्टी लिहायला ईश्वर विसरला असेल. पण जर तो विसरला नसेल तर मग
कुराणाची रचना निष्प्रयोजन आहे. आम्ही पाहतो की, बायबल व कुराण यांतील काही गोष्टी एकसमान मिळत नाहीत.
तेवढ्या वगळल्यास बाकी सर्व गोष्टी सारख्याच आहेत. मग परमेश्वराने वेदाप्रमाणे एकच
ग्रंथ का निर्माण केला नाही? कयामतवर म्हणजे अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवसावरच विश्वास
ठेवला पाहिजे. इतर कशावर विश्वास ठेवायचा नाही काय?॥३॥ फक्त ख्रिस्ती व मुसलमान लोकच ईश्वराच्या उपदेशानुसार वागतात
?
त्यांच्यामध्ये कोणी पापी असत नाही काय?
अधर्मी असणारे ख्रिस्ती व मुसलमानही मोक्ष मिळवितील आणि इतर
धर्मनिष्ठ असणारेही मोक्ष मिळविणार नसतील तर ती अत्यंत अन्यायाची व अंदाधुदी नव्हे
काय?
॥४॥ जे लोक इस्लाम मत मानत नाहीत त्यांना काफिर ठरविणे हा
एकतर्फी निवाडा नाही काय? ॥५॥ परमेश्वरानेच त्यांच्या अंत:करणावर व कानांवर मोहोर लावली असेल व म्हणूनच
ते पाप करतात तर त्यात त्यांचा काही दोष नाही. तो ईश्वराचाच दोष आहे. त्यामुळे
सुखदुःखाची किंवा पापपुण्याची जबाबदारी माणसांवर येऊ शकत नाही. मग खुदा त्यांना
शिक्षा का करतो ? कारण त्यांनी पाप अथवा पुण्य स्वतंत्रतेने केले नाही. ॥६॥
6
(६) त्यांच्या अंत:करणात (आधीच अविश्वासाच) रोग होता. तशात
आता (कुराण प्रकट करून) अल्लाने त्यांचा (तो) रोग (आणखीही) वाढविला. -मं० १। सि०
१। सू० २। आ० १०।।
(समीक्षक) त्यांचा काहीही अपराध नसताना खुदाने त्यांचा रोग
वाढविला. त्याला दया आली नाही. त्या बिचाऱ्यांना फार दुःख झाले असणार,
हे कृत्य सैतानाच्या कृत्याहूनही जास्त सैतानीपणाचे नाही
काय?
एखाद्याचे मन मोहोरबंद करणे, एखाद्याचा रोग वाढविणे हे ईश्वराचे काम असू शकत नाही. कारण
रोग वाढविणे हे ज्याच्या त्याच्या पापामुळे आहे.
(७) ज्या (परमेश्वरा) ने तुम्हांसाठी पृथ्वीला बिछाईत व
आकाशाला छत बनविले. -मंन१। सि०१। सू०२। आ० २२।।
(समीक्षक) आकाश हे कशाचे तरी छत होऊ शकते काय ?
ही अडाणीपणाची गोष्ट आहे. आकाशाला छत समजणे हास्यास्पद आहे.
जर कोणत्या प्रकारच्या पृथ्वीला आकाश मानत असाल तर ती त्यांची आपली घरातील गोष्ट
आहे. ॥७॥
(८) आणि आम्ही आपला सेवक (मोहमद) यास जे (कुराण) प्रकट केले त्यासंबंधाने
जर तुम्हीं संशयात असाल, (व समजत असाल की हे ईश्वरी पुस्तक नव्हे, पण मनुष्याने रचलेले आहे) आणि तुम्ही (आपल्या त्या दाव्यात)
खरे असाल,
तर ह्यासारखाच एक अध्याय (सूरा तुम्ही रचून) आणा व
परमेश्वराखेरीज तुम्ही आपले प्रत्यक्षही माहितीही बोलावून घ्या. मग जर तुम्ही
(एवढी गोष्टी) न करू शकला व (ती) तुमच्याने केव्हाही करवणारच नाही,
तर ज्या नरकाग्नीचे इंधन मनुष्ये व दगड होतील,
त्याचे भय बाळगा, तो नास्तिकांकरिता (भडकवून) तयार ठेवलेला आहे. मंन०१। सि०१।
सू०२। आ०२३। २४।।
(समीक्षक) कुराणातील सुऱ्यांसारखा एखादा सूरा रचणे ही अशक्य
गोष्ट आहे काय? अकबर
बादशाहाच्या कारकीर्दीत मौलवी फैजीने टिंबविरहित (नुक्ता असणारी अक्षरे नसलेले)
कुराण रचले नव्हते काय? ती नरकाची आग कोणती आहे ? या आगीला भिण्याचे कारण नाही काय?
या आगीतही जे काही टाकावे ते सारे जळून जाते. ज्याप्रमाणे
कुराणात असे लिहिले आहे की, काफिरांसाठी नरकाचे दगड तयार करण्यात आले आहे त्याचप्रमाणे पुराणांमध्ये असे
लिहिले आहे की, म्लेच्छांसाठी
घोर नरक तयार करण्यात आला आहे. आता तुम्हीच सांगा की,
कोणाचे म्हणणे खरे मानायचे? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपापल्या पंथाचे लोक स्वर्गाला
आणि दुसऱ्या पंथाचे अनुयायी नरकाला जातात. म्हणून दोघांचीही मते खोटी आहेत. खरी
गोष्ट अशी आहे की जे धर्मनिष्ठ असतील त्यांना सुख मिळेल आणि जे पापी असतील यांना
दुख भोगावे लागेल. मग ते कोणत्याही पंथाचे असले तरीही त्याने काही फरक पडत नाही.
॥८॥
स्वर्गातील स्त्रिया
(१) आणि (हे पैगंबरा) ज्या लोकांनी विश्वास धरिला व चांगली
कामेही केली, त्यांना
शुभवर्तमान ऐकीव की, त्यांच्यासाठी अशा (स्वर्गीय) बागा आहेत की ज्यांच्या खालून नद्या वाहत असतील,
जेव्हा त्यांना त्यातून एखादे फळ खावयास दिले जाईल,
तेव्हा ते म्हणतील की आम्हाला पूर्वी जे दिले होते तेच हे
आणि तेथे
7
त्यांच्यासाठी चोरवी (व निर्मल)
जोडपी असतील व ते त्या (बागां) त सदासर्वदा राहतील.-मं० १। सि० १। सू० २। आ० २५।।
(समीक्षक) कुराणाचा हा स्वर्ग संसारापेक्षा कोणत्या बाबतीत
उत्तम आहे ? कारण
ज्या गोष्टी या जगात आहेत त्याच मुसलमानांच्या स्वर्गात आहेत. फरक एवढाच की,
येथे पुरुष जन्मतात, मरतात, येतात, जातात. तसे स्वर्गात नसते. परंतु येथील स्त्रिया सदा सर्वकाळ
राहत नाहीत; आणि
तेथील स्त्रिया सदैव उत्तम राहतात. पण जोपर्यंत कयामतची (न्यायदानाची) रात्र येणार
नाही तोपर्यंत त्या बिचाऱ्यांचे दिवस कसे जात असतील ?
मात्र खुदाची त्यांच्यावर कृपा होत असेल आणि खुदाच्या
आश्रयाने त्या काळ कंठीत असतील तर ठीक आहे. कारण हा मुसलमानांचा स्वर्ग गोकुलिये
गोसाव्यांच्या गोलोकासारखा आहे व त्यांच्या देवळासारखा दिसतो. कारण जसे
गोलोकामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त महत्त्व दिले जाते तसेच खुदाच्या घरी
स्त्रियांचा मानमरतबा पुरुषांपेक्षा जास्त असून त्याच्यावर खुदाचे प्रेमही पुष्कळ
आहे. पुरुषांवर नाही. कारण खुदाने बायकांना जसे स्वर्गात कायम ठेवून घेतले आहे तसे
पुरुषांना ठेवून घेतलेले नाही. खुदाची मर्जी नसती तर त्या बायका स्वर्गात कशा राहू
शकल्या असत्या? ही
गोष्ट अशी असेल तर खुदा या स्त्रियांत फसावा. ॥९॥
(१०) आणि परमेश्वराने आदमाला सर्व (वस्तूंची) नावे शिकविली.
नंतर त्याने त्या वस्तूंना दूतापुढे मांडून फर्माविले की,
जर तुम्ही (आपल्या दाव्यात) खरे आहात,
तर तुम्ही मला ह्या वस्तूंची नावे सांगा (पाहू?)
(तेव्हा परमेश्वराने आदमला)
फर्माविले की, हे
आदम! तू दूतास त्या (वस्तुं ) ची नावे
सांग. मग जेव्हा आदमाने दूतास त्या (वस्तूं) ची नावे सांगितली,
तेव्हा (परमेश्वराने दूतास उद्देशून) सांगितले की,
काय मी तुम्हास सांगितले नव्हते की मी आकाशाचे व पृथ्वीचे
गुप्त भेद जाणतो आणि जे काय तुम्ही (आता) जाहीर करता व जे काय तुम्ही (मनात )
लपविता ते (सर्वही) मला माहित आहे. -मं० १। सि० १। सू० २। आ० ३०। ३१।।
(समीक्षक) आपल्याच दूतांना फसवून आपला मोठेपणा सिद्ध करणे
किंवा बढाईमारणे हे काय ईश्वराचे काम होऊ शकते ? हा तर शुद्ध दांभिकपणा झाला. त्याला कोणीही विद्वान मान्यता
देऊ शकणार नाही अथवा त्याबद्दल अशी फुशारकी मारणार नाही. असल्याच गोष्टींद्वारे
ख़ुदा आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित करू इच्छितो काय? अर्थात जंगली लोकांमध्ये वाटेल तसला पाखंडीपणा चालू शकतो.
सभ्य समाजात तो चालत नाही.॥१०॥
सैताना द्वारा खुदाच्या आज्ञेचा
भंग
(११) आणि आम्ही दूतास फर्मावले की,
तुम्ही आदमाला नमन करा. तेव्हा सैतानाखेरीज (सर्वांनीच) नमन
केले. त्याने (मात्र) नाकारिले; व तो शेखीत आला आणि नास्तिक बनून बसला. -मं० १। सि० १। सू०
२। आ० ३४।।.
(समीक्षक) यावरून खुदा सर्वज्ञ नाही आणि तो भूत,
भविष्य व वर्तमानकाळाच्या सर्व गोष्टी जाणत नाही. तो जाणत
असता तर त्याने सैतानाला उत्पन्नच कशाला केले असते ? शिवाय खुदामध्ये काही तेजही
8
नाही. कारण सैतानाने खुदाचा हुकूमच
मानला नाही आणि खुदा त्याचे काही वाकडे करू शकला नाही. आणखी पाहा?
जेथे सैतानासारखा एकच काफिर मुसलमानांच्या खुदाला पुरून
उरला तेथे मुसलमानांच्या म्हणण्याप्रमाणे कोट्यावधी काफिर आहेत अशा ठिकाणी
मुसलमानांच्या खुदाचे व मुसलमानांचे काय चालू शकेल? कधी-कधी खुदाही एखाद्याचा रोग वाढवितो व एखाद्याला चुकीचा
मार्ग दाखवितो या गोष्टी खुदाने सैतानाकडून व सैतानाने खुदाकडून शिकून घेतल्या
असाव्यात. कारण खुदाखेरीज सैतानाचा गुरू दुसरा कोण असणार?
॥११॥
(१२) आणि आम्ही (आदमला) सांगितले की,
हे आदमा! तू व तुझी पत्नी (उभयता) स्वर्गात राहा व तेथे
तुमच्या मर्जीस येईल ते खूप खा (प्या). पण ह्या (गव्हाच्या) वृक्षाजवळ फिरकू नका.
(असे कराल) तर तुम्ही (आपणच आपले) नुकसान करून घ्याल. मग सैतानाने त्यांना फूस
दिली व (अखेर) ज्या (सुखा) त ते होते त्यापासून त्यांना अंतरविले आणि आम्ही
फर्माविले की, तुम्ही
(सर्व) खाली उतरा. तुम्ही एकमेकांचे शत्रु आहात आणि पृथ्वीत तुझ्यासाठी एक (खास)
वेळपर्यंत राहण्याचे ठिकाण व (निर्वाहाचे) साधन आहे. मग आदमने आपल्या पालनकर्त्यापासून
(क्षमायाचनेचे काही) शब्द शिकून घेतले. -मं० १। सि० १। सू० २। आ० ३५। ३६। ३७।।
(समीक्षक) आता खुदाची अल्पज्ञता पाहा! आताच त्याने आदमला
स्वर्गात राहण्याचा आशीर्वाद दिला
आणि लगेच त्याला सांगितले की,
"येथून चालता हो!" त्याला
थोड्या वेळानंतर काय होणार याची कल्पना
असती तर त्याने तो वर का दिला असता?
शिवाय भडकविणाऱ्या सैतानाला शिक्षा देण्यास हा खुदा असमर्थ
दिसून पडतो आणि तो वृक्ष कोणासाठी
उत्पन्न केला होता? स्वतःसाठी की इतरांसाठी? त्याने तो स्वतःसाठी
निर्माण केला असेल तर त्याला
त्याची काय गरज होती ? आणि जर तो इतरांसाठी असेल तर मग प्रतिबंध
करण्याचे कारण काय?
म्हणून हे काम ईश्वराचे असू शकत नाही आणि ईश्वरकृत ग्रंथात
त्याचा अंतर्भाव असू
शकत नाही. आदम साहेबांनी स्वर्गात
असताना खुदाकडून कोणत्या गोष्टी शिकून घेतल्या होत्या?
आणि हे
आदम साहेब पृथ्वीवर कोणत्या
प्रकारे आले ? त्यांचा
तो स्वर्ग डोंगरावर आहे की आकाशात ? तेथून ते
पृथ्वीवर कसे आले ?
ते पक्ष्यांसारखे उडत आले की वरून दगड पडावेत तसे खाली पडले?
आदम साहेबांना मातीपासून बनविण्यात
आले होते त्यावरून त्यांच्या स्वर्गात मातीही असावी आणि तेथे देवदूत वगैरे जे इतर
लोक होते तेही मातीचे असले पाहिजेत. कारण मातीची शरीरे व अवयव नसतील तर
इंद्रियांचे उपभोग घेता येत नाहीत. आता पार्थिव शरीर असतील तर त्यांना मृत्यूही
अवश्य येत असणार. त्यांना मृत्यू येत असेल तर मेल्यानंतर ते तेथून कोठे जात असतील ?
आणि जर त्यांना मृत्यू येत नसेल तर त्यांचा जन्मही होत
नसणार,
जन्म असेल तर मृत्यू अवश्य असला पाहिजे. तसे असल्यास
कुराणात जे लिहिले आहे की, स्वर्गात स्त्रिया सदैव रहतात, ते खोटे ठरते. कारण त्यात स्त्रीयाही नक्कीच मरत असणार.
याचा अर्थ असा की, स्वर्गात जाणाऱ्यांनाही अवश्य मरण येणार.॥१२॥
आणि ज्या दिवशी कोणी मनुष्य
दुसऱ्या कोणा मनुष्याच्या काहीच कामास येणार नाही व त्याच्या वतीने (कोणाचीच)
शिफारस मान्य होणार नाही आणि त्याच्यापासून (कोणातऱ्हेची) काही भरपाई घेतली जाणार
9
नाही;
व लोकांना (कोठूनही) काही साहाय्य मिळणार नाही. त्या
(पुनरुत्थाचे) दिवसाला तुम्ही घ्या. -मं० १। सि० १। सू० २। आ० ४८।।
(समीक्षक) चालू काळातील दिवसांना भिऊ नये काय ?
वाईट कृत्ये करण्यास सर्व दिवशीच भिले
पाहिजे. जर कोणाचीच शिफारस मान्य
होणार नसेल तर मग पैगंबराच्या साक्षीने अथवा शिफारसीने खुदा स्वर्ग
देईल,
ही गोष्ट कशी खरी असेल ? खुदा स्वर्गातील लोकांचाच मदतगार आहे आणि नरकातील लोकांना
तो
मदत करीत नाही काय?
असे असेल तर खुदा पक्षपाती आहे.॥१३॥
आम्ही मूसाला (तौरात-जुना करार)
पुस्तक व निर्णायक नियमशास्त्र (चमत्कार) दिले. -मं० १। सि० १। सू० २। आ० ५३।।,
(समीक्षक) मूसाला (मोझेसला) पुस्तक दिले होते तर कुराण रचणे
निरर्थक ठरते आणि त्याला चमत्कार करण्याचे सामर्थ दिले हे बायबलात व कुराणातही
लिहिलेले आहे. परंतु त्यावर विश्वास ठेवता येत नाही. कारण तसे असते तर आताही तसे
होत असते. परंतु आता कोणीही करू शकत नाही. पूर्वीही कोणामध्ये चमत्कार करण्याचे सामर्थ्य
नव्हते. आज काल जसे स्वार्थी लोक अविद्वानांसमोर विद्वान असल्याचा आव आणतात तशी
त्यावेळीही लबाडी केली असावी. कारण खुदा आणि त्याचे भक्त आजही विद्यमान आहेत. तर
मग खुदा आता चमत्कार सामर्थ्य का देत नाही ?आणि खुदाचे भक्त आज चमत्कार का करू शकत नाहीत?
मूसाला पुस्तक (बायबल) दिले होते तर पुनः कुराण देण्याची
आवश्यकता का होती ? कारण सत्कर्म करावे, दुष्कर्म करू नये हा उपदेश बायबलात व कुराणात सारखाच असताना तो उपदेश
देण्यासाठी दोन वेगवेगळे ग्रंथ रचल्याने पुनरुक्तीचा दोष निर्माण होतो मूसा वगैरे
मंडळींना दिलेल्या पुस्तकांमध्ये काही गोष्टी सांगावयास ईश्वर विसरला होता काय?
॥१४॥
पाप क्षमा
(१५) व (तोंडून) हित्ततुन (म्हणजे क्षमा क्षमा) बोलत जा,
म्हणजे आम्ही तुम्हांस तुमच्या पापाची क्षमा करू व जे
(आमचा) हुकूम चांगला बजावतील त्यांना आम्ही अधिक (पुण्यही) देऊ (ते वेगळेच)., -मं०
१। सि० १। सू० २। आ० ५२।।
(समीक्षक) हा खुदाचा उपदेश सर्वांना पापी बनविणारा आहे की
नाही?
कारण जेव्हा आपल्या पापाबद्दल क्षमा केली जाणार आहे अशी
खात्री माणसाला वाटते तेव्हा पाप करण्यास कोणीही भीत नाही. म्हणून असे म्हणणारा
ईश्वर असू शकत नाही आणि तसे सांगणारे पुस्तक ईश्वरीय ग्रंथ असू शकत नाही. कारण
परमेश्वर हा न्याय करणारा आहे. तो कधीही अन्याय करीत नाही आणि क्षमा केल्याने तो
अन्यायकारी बनतो. अपराधानुसार शिक्षा दिल्यानेच तो न्यायी ठरतो. ॥१५॥
(१६) जेव्हा मूसाने आपल्या लोकांसाठी पाण्याची दरखास्त केली
तेव्हा आम्ही फर्मावले की (हे मूसा) तू आपली काठी खडकावर मार. (काठी मारताक्षणी)
त्या (खडका) तून बारा झरे फुटून वाहू लागले. -मं० १। सि० १। सू० २। आ० ६०।।
10
(समीक्षक) आता तुम्हीच पाहा! यापेक्षा अधिक असंभव थापा कोणी
मारू शकेल काय? एका
शिळेवर काठी मारताच बारा झरे वाहू लागणे पूर्णपणे असंभव आहे. अर्थात ती शिळा
पोखरून तिच्यात पाणी भरले व तिला बारा छिद्र पाडली तर मात्र ते शक्य आहे. एरव्ही
ते शक्य नाही. ॥१६॥
(१७) आम्ही त्यांस म्हणालो की, तुम्ही माकडे बनून जा, (की, जेथे जाल तेथे) धुत्कारले जाल. मग आम्ही या वृत्तांतात जे लोक ह्याच्या (घडून
येण्याच्या) वेळी हजर होते व जे लोक ह्याच्या मागून येणार होते त्या (सर्वा) साठी
एक धडा घालून दिला आणि (तसाच परमेश्वराला) भिऊन चालणाऱ्यांसाठी एक बोध.-मं० १। सि०
१। सू० २। आ० ६५। ६६।।
(समीक्षक) ख़ुदाने निंदनीय माकडे होण्याचा धाक केवळ भीती दाखविण्याकरिता
दाखविला असेल तर त्याचे बोलणे खोटे ठरले किंवा त्याने फसविले असे म्हणावे लागते.
जो कोणी अशा गोष्टी करतो आणि ज्यात अशा गोष्टी असतील तो ईश्वर नाही व हे पुस्तक
त्या ईश्वराने रचलेले असू शकत नाही. ॥१७॥
(१८) अशाच तऱ्हेने (पुनरुत्थानाच्या दिवशी) परमेश्वर
मेलेल्यास सजीव (जिवंत) करील; आणि तो (जगात) तुम्हास आपल्या (सामर्थ्याच्या) निशाण्या
दाखवितो की नवल नव्हे की तुम्ही समजाल (की पुनरुत्थानाचे घडून येणे सत्य आहे).
-मं० १। सि० १। सू० २। आ० ७३।।
(समीक्षक) खुदा मृतांना जिवंत करीत होता तर मग आता तो तसे का
करत नाही ? कयामतीच्या
दिवसापर्यंत ते त्यांच्या थडग्यात पडून राहणार काय ? आजकाल खुदा दौऱ्यावर आहे काय ?
मृतांना जिवंत करणे हाच ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा आहे
काय?
पृथ्वी, सूर्य, चंद्र वगैरे त्याच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा नव्हेत काय?
जगामध्ये ज्या विविध प्रकारच्या अद्भुत गोष्टी डोळ्यांना
प्रत्यक्ष दिसतात त्या ईश्वराच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा कमी आहेत काय?॥१८॥
(१९) ते निरंतर स्वर्गातच राहतील. -मं० १। सि० १। सू० २। आ० ८२।।
(समीक्षक) कोणत्याही जीवामध्ये अनंत पाप अथवा पुण्य करण्याचे
सामर्थ्य नसते. म्हणून कोणीही कायमचे स्वर्गात किंवा नरकात राहू शकत नाही आणि जर
खुदा तसे करील तर तो अन्यायी व अविद्वान ठरेल. कयामतीच्या रात्री न्यायनिवाडा
होणार असेल तर माणसांची पापे व पुण्ये समसमान असणे उचित होय. जे (कर्म) अनंत नाही
त्याचे फळ अनंत (काळपर्यंत मिळणारे) कसे असू शकेल? सृष्टीची उत्पत्ती सात आठ हजार वर्षांहून कमीच आहे असे
सांगतात. मग काय त्यापूर्वी खुदा रिकामटेकडा बसला होता काय ?
आणि कयामतीनंतर तो रिकामाच राहणार काय ?
या सगळ्या गोष्टी बालीश आहेत. कारण परमेश्वराचे कार्य सदैव
चालूच असते. ज्याचे जेवढे पाप-पुण्य असेल तेवढेच फळ तो त्याला देत असतो. म्हणून या
विषयासंबंधी कुराणात जे काही सांगितले आहे ते खरे नाही. ॥१९॥
(२०) आणि जेव्हा आम्ही तुम्हांपासून पक्के वचन घेतले की
तुम्ही आपला (परस्पराचा) रक्तपात करु नये व आपल्या शहरातून आपल्या लोकांस हद्दपार
करू नये. तुम्ही कबूल केले व तुम्हां (सांप्रतकाळचे) लोकांसही
11
(त्याची) साक्ष पटतेच तथापि तेच तुम्ही आहात की जे आपल्यास
मारून टाकता आणि (तसेच ) आपल्यापैकी काहींना त्यांच्या शहरांतून हद्दपार करता.
-मं० १। सि० १। सू० २। आ० ८४। ८५।।
(समीक्षक) शपथ घेणे व घ्यायला लावणे हा अल्पज्ञतेचा प्रकार
आहे की सर्वज्ञतेचा? परमेश्वर तर सर्वज्ञ आहे. तर मग संसारी माणसासारखा कूडाकूट प्रकार तो कशाला
करील?
आपापसात रक्ताचे पाट न वाहविणे आणि आपल्या पंथबांधवांना
त्यांच्या घरांतून बाहेर हाकलून न लावणे परंतु इतर पंथाच्या लोकांचे रक्त सांडणे व
त्यांना त्यांच्या घरांतून बाहेर काढणे. हा तर खोटा मूर्खपणा व पक्षपात आहे. आपले
अनुयायी वचनभंग करतील ही गोष्ट परमेश्वराला आधीपासून माहीत नव्हती काय ?
यावरून असे दिसून येते की, मुसलमानांचा खुदाही पुष्कळ बाबतीत ख्रिस्त्यांच्या
ईश्वरासारखाच आहे; आणि हे कुराण स्वतंत्र पुस्तक नसून त्यातील काही थोड्या गोष्टी वगळल्यास इतर
सर्व गोष्टी बायबलमधल्याच आहेत. ॥२०॥
(२१) ज्या लोकांनी पुढच्या (आयुष्या) चे ऐवजी ह्या जगाचे
आयुष्य विकत घेतले, ते हेच होते, तर (पुनरुत्थानाचे दिवशी) त्याच्यावरून तर शिक्षा हलकी केली जाणार नाही व
(कोठूनही) त्यांना मदत पोहोचणार नाही. -मं० १। सि० १। सू० २। आ० ८६।।
(समीक्षक) अशा ईर्ष्या व द्वेषाच्या गोष्टी कधीतरी
ईश्वराकडून होऊ शकतात काय? ज्या लोकांचा पापभार हलका केला जाईल अथवा ज्यांना साह्य केले जाईल ते कोण लोक
आहेत ?
जर ते पापी असतील व त्यांच्या पापांबद्दल त्यांना शिक्षा
देण्याऐवजी त्यांची पापे हलकी केली जाणार असतील तर तो अन्याय होईल. जर त्यांना
देऊन त्यांची पापे कमी केली जाणार असतील तर या आयतीमध्ये ज्यांचा उल्लेख आहे तेही
शिक्षा मिळवून हलके होऊ शकतात. शिक्षा दिल्यानंतरही त्यांची पापे नाहीशी केली गेली
नाहीत तर तोही अन्याय होईल. धर्मात्म्यांची पापे हलकी केली जातील असे म्हणण्याचा उद्देश
असेल तर त्यांची पापे मुळातच अगदी थोडी असतात. ती खुदा आणखी कमी काय करणार?
यावरून हे लिखाण विद्वानाचे नाही,
हे सिद्ध होते. वस्तुत: परमेश्वराने धर्मात्म्यांना सुखे
आणि अधर्मियांना दुखे त्यांच्या कर्मानुसार सदैव दिली पाहिजेत.॥२१॥
(२२) आणि अलबत आम्ही मूसाला (तौरात) पुस्तक दिले व
त्याच्यामागून एकामागे एक (इतर) प्रेषितही पाठविले आणि मरयमचा पुत्र ईसा (येशू)
यासही आम्ही ढळढळीत चमत्कार दिले व पवित्र आत्मा (म्हणजे जिब्रील) याद्वारे आम्ही
त्याला पाठबळ दिले. तर का (तुम्ही इतके दांड होऊन गेला आहात की) जेव्हा जेव्हा
तुम्हापाशी कोणी प्रेषित (पैगंबर) तुमच्या जीवास नको नको होत असे हुकूम घेऊन आला,
तेव्हा तेव्हा तुम्ही गर्वाने अडून बसलात?
मग काहींना तुम्ही पाखंडी म्हटलेत व काहींना तुम्ही जीवे
मारू लागतात. -मं० १। सि० १। सू० २। आ० ८७।।
(समीक्षक) मूसाला पुस्तक दिले असे कुराणात स्पष्टपणे
सांगितले आहे. म्हणून तो मान्य करणे हे मुसलमानांचे कर्तव्य ठरते. तसेच,
त्या ग्रंथात जे जे दोष आहेत तेही मुसलमानांच्या ग्रंथात
समाविष्ट झाले. त्यामध्ये 'मोजिजे’ म्हणजे दैवी चमत्कारांविषयी जे काही लिहिले आहे ते सारे खोटे आहे.
भोळ्याभाबड्या लोकांना फसविण्यासाठी वापरलेली ती एक खोटी गोष्ट आहे. कारण
सृष्टिक्रम आणि विद्या (विज्ञान) यांच्या
12
विरुद्ध असणाऱ्या सगळ्या गोष्टी
खोट्याच असतात. दैवी चमत्कार त्या काळी घडत होते तर ते आजकाल का घडत नाहीत ?
ज्याअर्थी ते आजकाल घडत नाहीत त्याअर्थी पूर्वीही घडत नव्हते,
यात मुळीच शंका नाही.॥२२॥
अल्लाह काफिरांचा शत्रु
(२३) व लोक ह्याच्या पूर्वी नास्तिकांविरुद्ध आपल्या जयाची
प्रार्थना करीत होते; तर जेव्हा जे काही ते जाणून ओळखून होते ते त्यांच्यापाशी येऊन चुकले तेव्हा ते
त्याची नाकारणी करू लागले. म्हणून नाकारणाऱ्यास परमेश्वराचा शाप होय--मं० १। सि०
१। सू० २। आ० ८९।।
(समीक्षक) जसे तुम्ही इतर मत-पंथियांना काफिर म्हणता तसे
तेही तुम्हाला काफिर म्हणत नाहीत काय? आणि आपल्या पंथाच्या ईश्वराच्या वतीने ते तुमचा धिक्कार
करतात. मग कोण खरा व कोण खोटा? विचार करून पाहिल्यास सर्वच पंथाच्या अनुयायांमध्ये कमी
अधिक खोटेपणा आहे आणि जे काही सत्य आहे ते सर्व पंथामध्ये समान आहे. ही सारी
भांडणे मूर्खपणाची आहेत.॥२३॥
(२४) ते विश्वासूसाठी सदबोध व (तारणाचे) शुभवर्तमान होय. जो
कोणी परमेश्वराचा दुश्मन होय व त्याच्या दूतांचा व त्याच्या प्रेषितांचा व
(प्रामुख्ये करुन) जिब्रील (दूत) चा व मीकाएल (दूता) चा. तर खरोखरीच परमेश्वरही
नास्तिकांचा दुश्मन होय-मं० १। सि० १। सू० २। आ० ९७।९८।।
(समीक्षक) मुसलमान म्हणतात की, खुदा 'लाशरीक' आहे. मग त्याने ही फौजच्या फौज कोठून 'शरीक' (समाविष्ट) केली? जो इतरांचा शत्रू आहे तो ख़ुदाचाही शत्रू आहे काय?
तसे असेल तर ते योग्य नाही. कारण ईश्वर हा कोणाचाही शत्रू
असू शकत नाही. ॥२४॥
(२५) परमेश्वर ज्यास इच्छितो त्याची आपल्या दयेसाठी खास
(निवड) करतो-मं० १। सि० १। सू० २। आ० १०३।।
(समीक्षक) जो प्रमुख होण्यास आणि दया करण्यास योग्य नसेल
त्यालाही खुदा प्रमुख बनवितो व त्याच्यावर दया करतो काय ?
तसे असेल तर खुदा फारच मोठा गोंधळ माजविणारा ठरतो. कारण मग
सत्कृत्ये कोण करील? आणि दुष्कृत्ये करणे कोण सोडल ? कारण माणसाला मिळणारी फळे खुदाच्या लहरीवर अवलंबून असतील व
ती कर्मावर अवलंबून नसतील तर सर्व लोक कर्माच्या बाबतीत बेफिकीर बनतील आणि
कर्मोच्छेदाचा प्रसंग ओढवेल. ॥२५॥
(२६) (मुसलमानांनो) बहुतेक ग्रंथधारी लोक आपल्या मनातील
मात्सर्यामुळे अशी उत्कंठा बाळगतात की, तुमच्या विश्वासधारणानंतरही त्यांनी तुम्हांस पुन्हा नास्तिक
करून टाकावेत. -मं० १। सि० १। सू० २। आ० १०१।।
(समीक्षक) आता पाहा! खुदाच आपल्या अनुयायांना सावध करीत आहे
की तुमची श्रद्धा काफिर लोक डळमळीत करतील. खुदा सर्वज्ञ नाही काय?
अशा गोष्टी ईश्वराच्या असू शकत नाहीत. ॥२६॥
(२७) तर जेथेही कोठे तुम्ही (किबल्याकडे) तोंड कराल,
तेथेच परमेश्वराचा सामना आहे. -मं० १। सि० १। सू० २। आ०
११५।।
13
(समीक्षक) ही गोष्ट खरी असेल तर मुसलमान किबल्याकडे तोंड का
करतात?
त्यांचे म्हणणे जर असे असेल की,
किबल्याकडे तोंड करण्याची आम्हाला खुदाची आज्ञा आहे,
तर वाटेल तिकडे तोंड करा असेही खुदाने सांगितले आहे. यापैकी
कोणती तरी एक आज्ञा खरी व दुसरी खोटी असली पाहिजे आणि जर अल्लाला तोंड असेल तर ते
सर्व बाजूना असू शकत नाही. कारण एक तोंड (एकाच बाजूला असणार) ते सर्व बाजूंना कसे
असणार ?
म्हणून ही आज्ञा सुसंगत नाही.॥२७॥
सृष्टी रचना
(२८) (ही विचित्र) आकाश, पृथ्वी यांचा तोच उत्पादक होय आणि जेव्हा तो कोण एखाद्या
कामाचा निश्चय करतो, तेव्हा तो त्याच्या संबंधाने फक्त एवढेच फर्मावितो की,
'हो' व ते होऊन जाते. -मं० १। सि० १। सू० २। आ० ११७।।
(समीक्षक) ख़ुदाने 'हो' असा जो हुकूम दिला तो कोणी ऐकला? कोणाला उद्देशून तो हुकूम दिला होता?
आणि काय झाले? कोणत्या उपादान कारणातून त्याची उत्पत्ती झाली?
सृष्टीच्या पूर्वी खुदाशिवाय दुसरे काहीच नव्हते असे
कुराणात व बायबलात सांगितले आहे. तर मग हे जग कोठून आले? कारणाशिवाय कोणतेही कार्य घडत नाही. तर मग
एवढे मोठे जग उपादान कारणाशिवाय कसे बनले ? म्हणून हा सारा शुद्ध
पोरकटपणा आहे.
(पूर्वपक्षी) छेः छेः! खुदाच्या इच्छेने ते बनले.
(उत्तरपक्षी) तुमच्या इच्छेने माशीचा एक पाय तरी बनू शकतो
काय?
मग खुदाच्या इच्छेने हे सरे जग बनले असे तुम्ही कसे म्हणता?
(पूर्वपक्षी) खुदा सर्वशक्तीमान आहे. म्हणून त्याची इच्छा
असेल ते तो करतो.
(उत्तरपक्षी) सर्वशक्तीमान याचा अर्थ काय?
(पूर्वपक्षी) जो वाटेल ते करु शकतो तो सर्वशक्तीमान होय.
(उत्तरपक्षी) खुदा दुसरा खुदाही बनवू शकतो काय ?
तो स्वत: मरू शकतो काय? मूर्ख, रोगी व अज्ञानीही बनू शकतो काय?
(पूर्वपक्षी) असे कधी होऊ शकत नाही.
(उत्तरपक्षी) म्हणूनच परमेश्वर आपले व इतरांचे गुण,
कर्म व स्वभाव यांच्या विरुद्ध काहीही करू शकत नाही. जगातील
कोणतीही वस्तू बनण्यास व बनविण्यास प्रथम तीन गोष्टींची आवश्यकता असते:- (१)
बनविणारा,
उदाहरणार्थ, कुंभार (२) माठ बनविण्याचे साधन म्हणजे माती आणि (३)
ज्याच्या साह्याने माठ बनविला जातो ते उपकरण म्हणजे चाक! ज्याप्रमाणे कुंभार,
माती व साधन किंवा उपकरण यांच्या योगाने माठ बनतो आणि तो
बनण्यापूर्वी कुंभार, माती व उपकरण या गोष्टी विद्यमान असतात. त्याचप्रमाणे जग निर्माण होण्यापूर्वी
परमेश्वर,
जगाचे कारण प्रकृती व त्यांचे गुण,
कर्म, स्वभाव या गोष्टी अनादी आहेत. म्हणून कुराणात वर्णिलेली
गोष्ट सर्वथैव अशक्य आहे. ॥२८॥
14
(२९) जेव्हा आम्ही (काबा) गृहाला लोकांचे पुण्यक्षेत्र व
शांतिस्थान ठरविले आणि (लोकांस आज्ञा केली की) इब्राहीमचे (ह्याच) जागेत तुम्ही
नमाजाची जागा मुक़र ठेवा. -मं० १। सि० १। सू० २। आ० १२५।।
(समीक्षक) काब्याच्या पूर्वी खुदाने एकहीं पवित्र स्थान
निर्माण केले नव्हते काय ? जर केले असेल तर काबा निर्माण करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. जर केले नसेल
तर पूर्वी जन्मलेल्या बिचाऱ्या लोकांना त्याने पवित्र स्थानाशिवायच ठेवले होते काय
?
बहुधा ईश्वराला पवित्र स्थान बनविण्याची आठवणच राहिली नसेल.
॥२९॥
(३०) आणि असा कोण आहे की जो इब्राहीमचे पंथास विमुख होईल ?
परंतु ज्याची अक्कल मारली गेली असेल तोच आणि आम्ही त्याला
ह्या लोकीही खरोखरच निवडून घेतले होते व परलोकीही तो पवित्राचरणी लोकांपैकीच होईल.
-मं० १। सि० १। सू० २। आ० १३०।।
(समीक्षक) जे लोक इब्राहीमचा पंथ मानीत नाहीत ते सगळे मूख
असतील,
हे कसे शक्य आहे ? इब्राहीमलाच ख़ुदाने पसंत केले याचे कारण काय ?
तो धर्मात्मा होता म्हणून पसंत केले असेल तर इतरही पुष्कळ
धर्मात्मे असण्याची शक्यता होती.तो धर्मात्मा नसताना त्याची निवड केली असेल तर तो
देवाने अन्याय केला अर्थात जो धर्मात्मा असतो तोच देवाला प्रिय असतो,
अधर्मी प्रिय नसतो, हे योग्यच आहे.॥३०॥
मूर्तिपूजा
(३१) तसेच तोंड फिरवून फिरवून आकाशाकडे पाहणे आम्ही
निरीक्षितच आहो. जो किबला (काबा) तू चाहतेस त्याच्याकडे आम्ही तुला वळण्याचा हुकूम
देऊ. (बरे) तर (आता नमाज पढताना) आदर सन्मानाने मशीदी (म्हणजे काब्या)कडेच आपले
तोंड करीत जा; आणि
(मुसलमानांनो! तुम्हीही) जेथे कोठेही असाल, तेथे त्याच्याकडे आपली तोंडेकरीत असा. -मं० १। सि० २। सू०
२। आ० १४४।।
(समीक्षक) ही काय लहान मूर्तिपूजा आहे?
मोठी नाही.
(पूर्वपक्षी) आम्ही मुसलमान मूर्तिपूजक नसून मूर्तिभंजक
आहोत. आम्ही किबल्याला (काब्याला) ख़ुदा समजत नाही.
(उत्तरपक्षी) ज्यांना तुम्ही मूर्तिपूजक समजता तेही त्या-त्या
मूर्तीना ईश्वर समजत नाहीत; तर त्या मूर्तीनां प्रतीक मानून त्याच्यासमोर परमेश्वराची भक्ती करतात. तुम्ही
मूर्तिभंजक आहात तर काबा मशिदीची ती मोठी मूर्ती तुम्ही का फोडून टाकली नाही?
(पूर्वपक्षी) वाहवा ! आम्हाला किबल्याकडे तोंड करून नमाज
पढण्याची जशी आज्ञा कुराणामध्ये देण्यात आलेली आहे तशी ईश्वरोपासना करण्याची आज्ञा
वेदामध्ये नाही. म्हणून ते मूर्तिपूजक ठरतात. आम्ही मूर्तिपूजक नाही. खुदाचा हुकूम
पाळणे हे आमचे कर्तव्यच आहे.
(उत्तरपक्षी) जसा तुमच्यासाठी कुराणात हुकूम आहे तशी
त्यांच्यासाठी पुराणात आला आहे. जसे तुम्ही कुराणाला ईश्वरीय वचन मानता तसे
पुराणपंथी लोकही पुराणे ही परमेश्वरी अवतार असणाऱ्या व्यासांची वचने
15
आहेत असे समजतात. तुमच्यात व
त्यांच्यात मूर्तिपूजेच्या बाबतीत काहीच फरक नाही. उलट तुम्ही मोठे मूर्तिपूजक
आहात आणि ते छोटे मूर्तिपूजक आहेत. एखाद्या माणसाने घरात शिरलेल्या मांजराला बाहेर
काढण्याचा प्रयत्न करावा आणि त्याचवेळी घरामध्ये उंटाने प्रवेश करावा तसे मुहम्मद
साहेबांनी लहान मूर्तीला मुसलमानांच्या पंथातून काढून टाकले;
परंतु डोंगराएवढी मक्केची मशीद ही प्रचंड मूर्ती सर्व
मुसलमानांच्या पंथात समाविष्ट केली. ही काय लहान मूर्तिपूजा आहे ?
म्हणून जसे आम्ही वैदिक आहोत तसे तुम्हीही वैदिक व्हा
म्हणजे मूर्तिपूजा वगैरे दोषांपासून तुमची सुटका होईल. अन्यथा नाही. जोपर्यंत
तुम्ही आपल्या पंथातून ही मोठी मूर्तिपूजा काढून टाकणार नाही तोपर्यंत इतरांच्या
लहान मूर्तिपूजेचे खंडन करणे तुम्हाला लज्जास्पद असून निवृत्त राहिले पाहिजे आणि
अशा मोठ्या मूर्तिपूजेपासून दूर राहून तुम्ही स्वत:ला पवित्र बनविले पाहिजे. ||३१||
(२) जे लोक परमेश्वराचे मार्गात जिवे मारले जातील त्यांना
मेलेले म्हणू नका. तर ते जिवंत आहेत. -मं० १। सि० २। सू० २। आ० १५४।।
(समीक्षक) ईश्वराच्या मार्गात मरण्याची किंवा मारण्याची काय
आवश्यकता आहे? ही
गोष्ट केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी आहे, हे तुम्ही स्पष्टपणे का सांगत नाही?
ही लालूच दाखविली की लोक खूप लढतील,
आपला विजय होईल, इतरांना मारण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत,
लूट-मार करविल्याने ऐश्वर्य प्राप्त होईल आणि मग आपण
विषयानंद घेऊ वगैरे तुम्ही स्वार्थासाठी हा विपरीत व्यवहार केला आहे.॥३२॥
(३३) व (तसेच) हे की परमेश्वर शिक्षेतही कडक आहे. सैतानाचे
पदोपदी (पावलावर पाऊल टाकून) चालू नका. कारण तो बोलून चालून दुष्मन होय. तो तर तुम्हांस
कुकर्म व निर्लज्जपणा (चीच काय ती कामे) करावयास सांगील व हेच (इच्छील) की तुम्ही
जाणत देखील नाही अशा (नसत्या कुभांडाच्या) गोष्टी तुम्ही (आपल्याकडून)
परमेश्वरासंबंधी व्यक्त कराव्या. -मं० १। सि० २। सू० २। आ० १६८। १६९। १७०।।
(समीक्षक) तुमचा खुदा पुण्यवान लोकांच्या बाबतीत दयाळू आणि
पाप्यांना कठोर दु:ख देणारा आहे की मुसलमानांवर दया करणारा आणि इतरांच्या बाबतीत
दयाहीन आहे ? जर
तसे असेल तर तो ईश्वरच असू शकत नाही. पण जर तो पक्षपाती नसेल तर जो कोणी माणूस
कोठेही धर्माचरण करील तर तो (ईश्वर) त्याच्यावर दयाळु आणि अधर्माचरण करील त्याला
तो शिक्षा देईल. तेव्हा ईश्वरव जीव यांच्यामध्ये मुहम्मद साहेब व कुराण यांना
मानण्याची आवश्यकता नाही.जो सर्वाना दुष्कृत्ये करावयास लावणारा,
मनुष्यमात्राचा शत्रू असा जो सैतान आहे त्याला खुदाने
उत्पन्नच का केले? त्याला भविष्यात काय घडणार आहे हे माहित नव्हते काय?
जर त्याला ते माहीत होते. परंतु परीक्षा पाहण्यासाठी
ईश्वराने त्याला निर्माण केले तर तेही टिकू शकणार नाही. कारण परीक्षा पाहणे हे
अल्पज्ञांचे काम आहे. जो सर्वज्ञ आहे तो सर्व जीवांची बरीवाईट कृत्ये नेहमीच जाणतो
आणि सैतान सर्वांना बहकावीत असेल तर सैतानाला कोणी बहकाविले?
सैतान स्वत:च बहकू शकतो. तर इतरही आपणहुन बहकू शकतात त्यात
सैतानाचे काय काम ? आणि जर खुदानेच सैतानाला
16
बहकाबिले असेल तर खुदा हा सैतानाचा
सैतान ठरतो. ईश्वराच्या बाबतीत असे घडू शकत नाही. जो कोणी बहकतो तो वाईट संगतीने व
अविद्येमुळेच भ्रान्त बनतो.॥३३॥
(३४) त्याने तर तुम्हांसाठी फक्त मेलेले (जनावर) व रक्त व
डुकराचे मांस ही निषिद्ध केली आहेत व (तसेच) परमेश्वराशिवाय अन्य कोणा (चे आराधने)
स्तव जे (बळी दिले व) नामजाद केले जाईल ते (जनावर) -मं० १। सि० २। सू० २। आ० १७३।।
(समीक्षक) येथे ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे की,
मृत पशूचे शरीर, आपोआप मेलेल्या पशूचे असो की कोणीतरी मारलेल्या पशूचे असो,
हे सारखेच असते. अर्थात त्यांच्यात थोडा फरक असतो. परंतु
मृतावस्थेत काही फरक नसतो आणि जर डुकराचे मांस निषिद्ध ठरविले तर माणसाचे मांस
खाणे योग्य आहे ? परमेश्वराच्या नावाने शत्रू वगैरेला अत्यंत दु:ख देऊन ठार मारणे ही गोष्ट
चांगली असू शकते काय ? वस्तुतः याने ईश्वराच्या नावाला काळिमा लागतो. ज्या प्राण्यांनी पूर्वजन्मी
काहीही अपराध केलेला नाही त्यांना मुसलमानांच्या हातून ईश्वराने दारुण दुःख का बरे
दिले?
त्यांच्या बाबतीत ईश्वर दयाळू नाही काय?
खुदा त्यांना आपल्या मुलांसमान मानीत नाही काय?
गाय वगैरे ज्या प्राण्यांमुळे मानवजातीवर उपकार होतात
त्यांना मारणे हे निषिद्ध न ठरविता त्यांची हत्या करविणारा खुदा जगाची हानी करणारा
आहे. तो हिंसारूपी पापाने कलंकितही होतो. असल्या गोष्टी खुदाच्या व खुदाच्या
पुस्तकाच्या कधीच असू शकत नाहीत. ॥३४॥
(५) (मुसलमानांनो!) उपासाचे रात्रीत तुम्हास आपल्या
पत्न्यांपाशी जाण्याची मुभा दिली गेली आहे. त्या तुमचा पदर (वस्त्र) होत व तुम्ही
त्यांचा पदर आहात. परमेश्वराने पाहिले की, तुम्ही (चोरी छुपी त्यांचेपाशी गेल्याने) खुद्द आपलेच
(धार्मिक) नुकसान करीत होता. म्हणून त्याने तुमचा पश्चाताप मान्य केला व तुमच्या
अपराधांची क्षमा केली. तर आता (उपासात रात्रीचे समयी) तुम्ही त्यांच्याशी अंगसंग
करा आणि (अंगसंगाचा परिणाम) जी (पुत्रप्राप्ती) परमेश्वराने तुम्हासाठी लिहून
ठेवलेली आहे तिची आकांक्षा करा; (व निव्वळ काम तृप्तीचे नादास) लागू नका. तुम्ही खा व प्या,
येथपर्यंत की (रात्रीचे) काळ्या धारेपासून प्रात:कालाची
पांढरी धार तुम्हास स्पष्ट दिसून येऊ लागेल. -मं० १। सि० २। सू० २। आ० १८७।।
(समीक्षक) जेव्हा मुसलमानांचा पथ सुरू झाला तेव्हा किंवा
त्याच्या आधी कोणीतरी येथील पौराणिकांना महिनाभर चालणाऱ्या चंद्रायण व्रताचा विधी
काय असतो हे विचारून घेतले असावे आणि त्याप्रमाणे आपल्या येथे ते व्रत सुरू केले
असावे असे यावरून (रमजानच्या रोज्यांवरून) सिद्ध होते. या शास्त्रविधी मध्ये कृष्ण
पक्षात चंद्राची कला जसजशी घटत जाते तसतसा जेवणातून एक-एक घास कमी केला जातो वः
शुक्लपक्षात चंद्राच्या वाढत्या कलेप्रमाणे एकेक घास वाढविला जातो. या व्रतामध्ये
ऐन मध्याह्निला (भदुपारी) जेवण करावयाचे असते ते नीट न कळल्यामुळे मुसलमानांनी
त्यात बदल करून चंद्रदर्शन झाल्यावर जेवण करावे असे ठरविले असावे. परंतु या
व्रतामध्ये स्त्रीसमागम वर्ज्य असतो. त्याऐवजी खुदाने सांगून टाकले की,
तुम्ही रात्री स्त्रियांशी खुशाल समागम करा;
आणि रात्री वाटेल तितक्या वेळा जेवा. याला काय व्रत
म्हणावयाचे ? दिवसा
न खाता रात्री खात राहिले. वस्तुतः दिवसा न जेवता रात्री जेवणे हे सृष्टिक्रमाच्या
विरुद्ध आहे.॥३५॥
17
(३६) आणि (मुसलमानांनो !) जे लोक तुम्हाशी लढतील त्यांच्याशी
तुम्हीही परमेश्वराचे मार्गार्थ (म्हणजे धर्मार्थ) लढा आणि (जे लोक तुम्हाशी
लढतात) त्यांना जेथे पावाल तेथे कत्तल करा आणि कुफ्र (काफिर राहणे हे) कत्तली
पेक्षाही अधिक भयंकर होय; आणि तुम्ही येथपर्यंत लढा की (मुलुखात) फंदफितुर (नावासही) राहणार नाही;
व (एका) परमेश्वराचाच हुकूम चालेल. तर जसा कहर त्यांनी
तुम्हांवर गुदरविला तसाच कहर तुम्ही त्यांच्यावर गुदवा. -मं० १। सि० २। सू० २। आ०
१९०। १९१। १९२। १९३।।
(समीक्षक) कुराणात अशा गोष्टी सांगितल्या नसत्या तर मुसलमान
लोक इतर पंथांच्या लोकांवर जो इतका भयंकर जलम करतात तो त्यांनी केला नसता. वस्तुतः
काहीही अपराध नसताना ते लोकांना ठार मारून फार मोठे पाप करीत असतात. इस्लामचा
स्वीकार करणे म्हणजे कुफ्र होय आणि जो कुफ्र करतो त्याला काफिर म्हणतात.
कुफ्रापेक्षा काफिरांची कत्तल करणे हे जास्त चांगले असे मुसलमान समजतात. जो कोणी
इस्लामचा स्वीकार करणार नाही त्याची आम्ही कत्तल करणारही मुसलमानांची भूमिका असते.
त्याप्रमाणे ते करत आले आहेत. पंथाच्या नावाने लढता-लढता ते आपली राज्ये वगैरे
घालवून बसले. इतर पंथांविषयी त्यांचे मन फार कठोर असते. चोरीचा बदला (सूड) चोरी
आहे काय ?
चोरी वगैरे करून चोर आमचा जेवढा गुन्हा करतो त्याचा सूड
म्हणून आपणही चोरी करावी काय? तसे करणे पूर्णपणे अन्याय आहे. एखादा अडाणी माणूस आपल्याला
शिव्या देऊ लागला तर आपणही त्याला शिव्या द्याव्यात काय?
तसे करणे हे ईश्वरी कृत्य नव्हे. ईश्वराचे विद्वान भक्त तसे
कधीच करणार नाहीत. ईश्वरोक्त ग्रंथात अशा गोष्टीला स्थान असू शकत नाही. केवळ
स्वार्थी व ज्ञानरहित माणूसच असे करतो किंवा लिहितो. ॥३६॥
खुदा केवळ मुसलमानाचा आहे काय ?
(३७) परमेश्वर (कोणत्याही तऱ्हेने) अत्याचार करणाऱ्यांना
पसंत करीत नाही. अहो मुसलमानांनो! इस्लामात तुम्ही पुरेपुर दाखल व्हा. - -मं० १।
सि० २। सू० २। आ० २०५। २०८।।
(समीक्षक) झगडा करणाऱ्यांना खुदा पसंत करीत नसेल तर त्याने
स्वतःच मुसलमानांना झगडा करण्यास का प्रवृत्त केले? आणि झगडाळू मुसलमानांशी तो मैत्री का करतो?
मुसलमान इस्लामचा स्वीकार करतात,
एवढयानेच परमेश्वर खुष होत असेल तर तो मुसलमानांचा पक्षपाती
आहे. तो संपूर्ण विश्वाचा ईश्वर नव्हे. यावरून असे लक्षात येते की,
कुराण ईश्वरकृत नाही आणि त्यात वर्णन केलेला खुदा हा ही
ईश्वर होऊ शकत नाही.॥३७॥
(२८) अल्लाची इच्छा असेल त्याला तो अमर्याद आजीविका देतो
--मं० १। सि० २। सू० २। आ० २१२।।
(समीक्षक) पापपुण्याचा विचार न करता अल्ला माणसाच्या
पोटापाण्याची सोय करतो काय? मग पाप
किंवा पुण्य करणे हे सारखेच झाले;
कारण सुख-दुख प्राप्त होणे हे ईश्वराच्या इच्छेवर आहे
म्हणून ते धर्मापासून
विमुख होऊन स्वैराचार करतात आणि
कोणी-कोणी कुराणात सांगितलेल्या या गोष्टीवर विश्वास न ठेवता
खऱ्या अर्थाने धर्माचरणही करतात.
॥३८॥
18
स्त्रिया म्हणजे शेती
(३९) आणि (हे पैगंबरा! लोक) तुला ऋतुस्नानाविषयी विचारतात,
तर (तू त्यांना) समजावून दे की तो मल होय. तर विटाळात
तुम्ही स्त्रियांपासून अलग राहा आणि त्या चोरख्या (शुद्ध) होईपर्यंत त्यांच्यापाशी
जाऊ नका. मग जेव्हा त्या न्हाऊन धुऊन घेतील तेव्हा जेथून परमेश्वराने तुम्हास
सांगून दिले आहे तेथून त्यांच्यापाशी या. तुमच्या पत्न्या (जणूकाय) तुमची क्षेत्रे
(शेते) होत. तुम्ही आपल्या क्षेत्रात हवे तसे जा. तुमच्या शब्दात ज्या निरर्थक
(शपथा) होत त्याबद्दल तर परमेश्वर तुम्हास पकडणार नाही. -मं० १। सि० २। सू० २। आ०
२२२। २२३। २२४।।
(समीक्षक) रजस्वला (विटाळणी) स्त्रीला स्पर्श,
समागम करू नका, ते चांगले आहे. परंतु स्त्रिया या तुमच्या शेती सारख्या
असून तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे वाटेल तेव्हा त्यांच्याजवळ जा. हे पुरुषांना
विषयासक्त बनविण्यास कारणीभूत आहे. निरर्थक शपथांबद्दल खुदा शपथ घेणाऱ्यांना जबाबदार
धरीत नसेल तर सर्व लोक खोटे बोलतील व शपथाः मोडतीलत्यामुळे खुदा असत्याचा प्रवर्तक
होईल.॥३९॥
खुदाचे उधार मागणे
(४०) (असा) कोण आहे की, जो परमेश्वराला दिलखुशीने कर्ज देईल;
की परमेश्वर त्याचे कर्ज त्याला अनेक पटींनी वाढवून (परत)
देईल?
-मं० १। सि० २। सू० २। आ० २४५।।
(समीक्षक) खुदाला कर्ज काढण्याचे काय प्रयोजन?
ज्याने सारे जग निर्माण केले तो काय माणसाकडून कर्ज घेतो ?
मुळीच नाही. अज्ञानानेच असे म्हटले जाऊ शकते. त्यांचा खजिना
रिकामा झाला होता काय? व्यापार धंदा आणि ह्या देणे वगैरे करीत असताना त्याला भयंकर फटका बसला म्हणून
तो कर्ज घेऊ लागला काय ? हा खुदा दामदुप्पट देण्याचा वायदा करतो काय तो सावकाराचे काम करतो?
परंतु असल्या गोष्टी तर दिवाळखोर,
आयपेक्षा जास्त व्यय करणारे आणि ज्यांची आय (प्राप्त) फार
कमी असते अशा लोकांना कराव्या लागतात. ईश्वराला नाही. ॥४०॥
(४१) त्यांच्यापैकी कोणी असे होते की,
ज्यांनी (इस्लाम स्वीकारला व कोणी असे होते की विश्वासास)
नाकारिले आणि जर परमेश्वर इच्छिता तर (हे लोक) आपसात न लढते,
परंतु ईश्वर जे योजितो ते करितो. -मं० १। सि० ३। सू० २। आ०
२४९।।
(समीक्षक) जेवढ्या लढाया होतात त्या सगळ्या ईश्वराच्या
इच्छेने होतात काय ? ईश्वराला अधर्म करावासा वाटला तर तो तसे करू शकतो काय?
तसे असेल तर तो खुदाच नव्हे. कारण शांतता भंग करून लढाया
करविणे हे भल्या माणसाचे काम नव्हे. यावरून विधित होते की,
हे कुराण ईश्वरानेही रचलेले नाही अथवा एखाद्या धार्मिक
विद्वानानेही रचलेले नाही. ॥४१॥
(४२) जे काही आकाशात आहे आणि जे काही पृथ्वीवर आहे ते
त्याचेच होय. त्याच्या (सत्तारूपी) सिंहासनाने आकाश व पृथ्वी (ही सर्व) व्यापली
आहे. -मं० १। सि० ३। सू० २। आ० २५५।।
(समीक्षक) आकाशात व भूमीवर जे काही पदार्थ आहेत ते सर्व
परमात्म्याने जीवांसाठी उत्पन्न केले
19
आहेत;
स्वतःसाठी नव्हे. कारण तो पूर्णकाम आहे. त्याला कोणत्याही
वस्तूची अपेक्षा नसते. जर त्याचे सिंहासन आहे तर तो ख़ुदा एकदशी (स्थानसिमित) आहे.
परंतु जो एकदेशी असतो त्याला ईश्वर म्हणत नाहीत. कारण ईश्वर सर्वव्यापक आहे.॥४२॥
(४३) परमेश्वर पूर्वेकडून सूर्य उगवतो. तू तो पश्चिमकडून
उगीव (पाहू!) यावर तो नास्तिक (काफिर) थक्क होऊन राहिला. (तरीही त्याने विश्वास
धरिला नाही.) आणि परमेश्वर हटवादी लोकांस सुबुद्धी देत नसतो. -मं० १। सि० ३। सू०
२। आ० २५८।।
(समीक्षक) हा अडाणीपणा आहे, पाहा ! सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे अथवा पश्चिमेकडून
पूर्वेकडे कधीच जात-येत नसतो. तो तर आपल्या परिघीमध्येच फिरत असतो. यावरून हे
सिद्ध होते की, कुराण
रचणाऱ्याला खगोल विद्येचे किंवा भूगोलविद्येचे मुळीच ज्ञान नव्हते. जो मुसलमानांचा
खुदा पाप्यांना सन्मार्ग दाखवीत नाही त्याची पुण्यात्मांना काहीच गरज नाही. कारण
धर्मात्मे हे धर्माच्या मार्गानेच जात असतात. जे लोक वाट चुकलेले असतात त्यांना
धर्माची वाट दाखविणे हे ईश्वराचे काम असते. आपले हे कर्तव्य पार पाडीत नाही ही त्याची
फार मोठी चूक आहे.॥४३॥
(४४) फर्माविले की (वरे) तर चार पक्षी घे व त्यास आपल्या
ध्यानात बरोबर ठेव. (व त्यांचा चेंदामेंदा कर) तदनंतर एकेका डोंगरावर त्याचा एकेक
तुकडा ठेवून दे व मग त्यांना बोलव, म्हणजे ते (आपोआप) तुजकडे धावत येतील. -मं० १। सि० ३। सू०
२। आ० २६०।।
(समीक्षक) वाहवा! भानामतीच्या जादूप्रमाणे मुसलमानांचा
खुदाही जादूचे खेळ करीत आहे. असल्याच गोष्टीने देवाचे देवत्व असते काय?
बुद्धिमान लोक असल्या खुदावर तिलांजली देऊन त्याच्यापासून
चार हात दूर राहतील व मूर्ख लोक त्याच्या जाळ्यात अडकतील. असल्या गोष्टींनी खुदाची
कीर्ती वाढण्याऐवजी त्याचा दुलौकिकच त्याचे पदरी पडेल. ॥४४॥
(४५) तो ज्याला इच्छितो त्याला (गोष्टीची) समज देतो. -मं० १।
सि० ३। सू० २। आ० २६१।।
(समीक्षक) ख़ुदा ज्याला इच्छितो त्याला नीती देतो म्हणजे
ज्याला इच्छित नाही त्याला अनीती देत असणार. हे काम ईश्वराचे नाही. जो पक्षपात न
करता सर्वांना नीतीचा उपदेश करतो तोच ईश्वर व सद्गुरु असू शकतो. इतर कोणी असू शकत
नाही. ॥४५॥
(६) जे लोक व्याज घेतात ते थडग्यातून उडणार नाहीत. -मं० १।
सि० ३। सू० २। आ० २७५।।
(समीक्षक) ते थडग्यातच पडून राहतील काय ?
आणि तसेच पडून राहाणार असतील तर कुठवर राहतील?
असली अशक्य गोष्ट ईश्वरीय ग्रंथातील असू शकत नाही. ती पोरकट
लोकांचीच असू शकते. ॥४६॥
(४७) मग (खोट्या वासनेबद्दल) ज्याला तो इच्छील त्याला क्षमा
करील व ज्याला इच्छील त्याला शिक्षा करील आणि परमेश्वर सर्वशक्तिमान आहे. -मं० १।
सि० ३। सू० २। आ० २६९।।
(समीक्षक) जो क्षमेला पात्र आहे त्याला क्षमा न करणे आणि
अयोग्य माणसाला क्षमा करणे हे शुद्ध मूर्ख राजासारखे कर्म नाही काय?
जर ईश्वर वाटेल त्याला पापी अथवा पुण्यवान बनवीत असेल तर
जीवाला
20
पाप-पुण्य लागता कामा नये आणि ज्या
अर्थी ईश्वरानेच त्याला पापी किंवा पुण्यवान बनविले आहे त्याअर्थी जवाला सुख-दुखही
भोगावे लागता कामा नये. ज्याप्रमाणे सेनापतींच्या आज्ञेने त्याच्या हाताखालील
सैनिकाने एखाद्याला ठार मारले किंवा त्याचे रक्षण केले तर त्या कृत्याचे फळ
सैनिकाला भोगावे लागत नाही, त्याप्रमाणे त्यालाही नाही. ॥४७॥
स्वर्ग की वेश्यावन
(४८) (हे पैगंबरा ! या लोकांस) सांग की (तुमची इच्छा असेल
तर) मी तुम्हांस ह्या (इहलौकिक क्षणिक साधना) पेक्षाही अत्युत्तम चीज दाखवून देऊ
का?
पालनकर्त्या समीप (स्वर्गाचे) बाग होते की त्यांच्या खालून
नद्या वाहत आहेत (व ते) त्यांत सदासर्वदा राहतील; आणि (बागांव्यतिरिक्त) शुचिर्भूत (व चौध्या) पल्या होत आणि
(सर्वात अति श्रेष्ठ अशी) परमेश्वराची सुप्रसन्नता होय आणि परमेश्वर सेवका (च्या
बऱ्यावाईटा) स पाहतो आहे. -मं० १। सि० ३। सू० ३। आ० १५।।
(समीक्षक) हा स्वर्ग आहे की वेश्यावन (कुंटणखाना) आणि त्याला
ईश्वर म्हणावे की स्त्रैण म्हणावे? असल्या गोष्टी ज्या पुस्तकात असतील त्याला कोणीही बुद्धिमान
माणूस ईश्वरप्रणीत ग्रंथ मानू शकेल काय? हा खुदा पक्षपात का करतो? या बायका स्वर्गात सदैव राहतात त्या येथे जन्म घेऊन
स्वर्गात गेल्या आहेत की तेथेच जन्मल्या आहेत? जर त्या या जगात जन्म घेऊन स्वर्गाला गेल्या असतील आणि कयामतीच्या
रात्रीच्या आधीच त्यांना तेथे बोलावून घेण्यात आले असेल तर त्यांच्या नवऱ्यांना का
बोलावून घेतले नाही ? आणि कयामतीच्या रात्री सर्वांचा न्यायनिवाडा होईल,
हा नियम का मोडला? जर त्या तेथेच जन्मल्या असतील तर अंतिम निवाड्याच्या
दिवसापर्यंत त्या कशा निर्वाह करतील? तेथे त्यांच्यासाठी पुरुषही असतील तर येथून स्वर्गात
जाणाऱ्या मुसलमानांना खुदा बायका कोठून देईल? आणि अशा स्वर्गात सदैव राहणाऱ्या स्त्रिया खुदाने बनविल्या
तसे तेथे कायम राहणारे पुरुष त्याने का बनविले नाहीत ?
यावरून मुसलमानांचा खुदा अन्यायी व अजाण आहे. ॥४८॥
(४९) परमेश्वरापाशी (मूळचा सत्य) धर्म (म्हटला) तर केवळ
इस्लामच होय--मं० १। सि० ३। सू० ३। आ० १९।।
(समीक्षक) अल्ला हा फक्त मुसलमानांचाच आहे आणि इतरांचा नाही
काय?
तेराशे वर्षांपूर्वी ईश्वरीय मत नव्हते काय ?
यावरूनच हे कुराण ईश्वराने रचलेले नसून एखाद्या पक्षपाती
इसमाने रचलेले आहे हे सिद्ध होते.॥४९॥
(५०) प्रत्येक जीवास त्याच्या कर्माचे त्याला पुरेपूर फळ
दिले जाईल; व
लोकांवर (कोण्या तऱ्हेचा) जुलूम होणार नाही. (हे पैगंबरा!) तू (तर ही) प्रार्थना
कर की,
हे परमेश्वरा! (साऱ्या) राज्याचे मालका! तूच ज्याला इच्छितोस
त्याला राज्य देतोस व तूच ज्याच्यापासून इच्छितोस त्याच्यापासून राज्य काढून घेतोस
आणि तूच ज्याला इच्छितोस त्याला इज्जत अब्रू देतोस व तूच ज्याला इच्छितोस त्याला
नमवितोस (हरतऱ्हेचे हित व) कल्याण तुझ्याच हाती आहे. नि:संशय तु सर्वशक्तिमान
आहेस. तूच (उन्हाळ्यात) रात्रीस घटवून दिवसात सामील करतोस आणि तूच (हिवाळ्यात)
दिवसास (घटवून) रात्रीत सामील करतोस आणि तूच निर्जीवापासून
21
सजीव व तूच सजीवातून निर्जीव काढतो
व तूच ज्याला इच्छितोस त्याला बेशुमार देतोस. मुसलमानांस पाहिजे की त्यांनी
मुसलमानांना सोडून नास्तिकांस मित्र पत्करू नये आणि जो असे करील तर त्याशी व
परमेश्वराशी काही संबंधच नाही. (हे पैगंबरा! या लोकांस) सांगून दे की जर तुम्ही
परमेश्वराशी प्रीती ठेवता तर तुम्ही माझे अनुकरण करा. म्हणजे परमेश्वरही तुम्हांशी
प्रीती ठेवील व तुम्हांस तुमचे अपराध क्षमा करील आणि परमेश्वर क्षमाशील व दयाळू
आहे.-मं० १। सि० ३। सू० ३। आ० २५। २६। २७। २८। २९।।
(समीक्षक) जर प्रत्येक जीवाला कर्माचे पुरेपूर फळ दिले जाणार
असेल तर त्याला क्षमा केली जाणार नाही; आणि जर क्षमा केली जाणार असेल तर कर्माचे पुरेपूर फळ दिले
जाणार नाही व तो अन्याय होईल. उत्तम कर्में न करता जर ईश्वर राज्य व प्रतिष्ठा
देईल तर तोही अन्याय होईल आणि पाप केले नसताना जो राज्य व प्रतिष्ठा हिरावून घेईल
तरीही तो अन्यायी ठरेल. जिवंत असणाऱ्याला मृत बनविणे व मृताला जिवंत करणे अशक्य
आहे. कारण ईश्वराची व्यवस्था अच्छेद्य-अभेद्य आहे. तिच्यात कधीही बदल होऊ शकत
नाही. आता इस्लामच्या पक्षपाताच्या गोष्टी पाहा. जे कोणी मुसलमानी पंथाचे नसतील
त्यांना काफिर ठरविणे, मुस्लिमेतरांमधील उत्तम, सदाचारी लोकांशीही मैत्री न करण्याचा व दुष्ट दुराचारी
मुसलमानांशी मैत्री ठेवण्याचा उपदेश करणे ही गोष्ट ईश्वराला ईश्वरत्वापासून दूर
ठेवते. यावरून असा निष्कर्ष निघतो की कुराण, कुराणातील खुदा आणि मुसलमान पक्षपाती व अविद्येने भरलेले
आहेत. म्हणूनच मुसलमान अंधारात चाचपडत आहेत आणि मुहम्मद साहेबांची ही हुशारी तर
पाहा ! ते आपल्या अनुयायांना असे आश्वासन देतात की, 'तुम्ही माझा पक्ष घ्याल तर खुदा तुमचा पक्ष घेईल आणि तुम्ही
पक्षपातपूर्ण पापे केली तर तो त्याबद्दल तुम्हाला क्षमाही करील.'
यावरून सिद्ध होते की, मुहम्मद साहेबांचे अंत:करण शुद्ध नव्हते. म्हणूनच आपला
स्वार्थ साधण्यासाठी मुहम्मद साहेबांनी कुराण रचले किंवा दुसऱ्याकडून लिहून घेतले.
॥५०॥
(५१) आणि जेव्हा दूतांनी (मर्यमला) सांगितले की,
अगे मर्यम! तुला परमेश्वराने निवडले व (पापांच्या
गंधापासूनही) तुला पाकसाफ राखिले, आणि (त्यामुळेच) तुला सकल जगाचे स्त्रियांवर (श्रेष्ठत्व
देऊन) निवडून काढले. -मं० १। सि० ३। सू० ३। आ० ४५।।
(समीक्षक) आजकाल देवदूत व खुदा हे कोणाशी बोलायला येत नाहीत.
मग ते पूर्वी कसे आले असतील? पूर्वीचे लोक पुण्यवान होते व आताचे तसे नाहीत,
असे तुमचे म्हणणे असेल तर ते साफ खोटे आहे. ज्या काळी
ख्रिस्तीपंथ व इस्लाम प्रचारात आले त्या काळी त्या देशांत जंगली व विद्याविहीन
माणसे जास्त होती. म्हणूनच असले ज्ञानविरोधी पंथ रूढ झालेआता विद्वान लोक अधिक
असल्यामुळे हे पंथ टिकाव धरू शकत नाहीत. किंबहूना असले पोकळ पंथ लयाला चालले आहेत,
मग त्यांची वृद्धी होण्याची गोष्ट दूरच राहिली. ॥५१ ॥
(५२) तो त्यास मात्र इतकेच फर्मावितो की,
'हो,' व ते होऊन जाते आणि यहुद्यांनी (येशूशी) डाव केला व
परमेश्वराने (त्यांच्याशी) डाव केला; आणि डाव करणाऱ्यांत परमेश्वर (सर्वात) उत्तम (डाव करणारा)
होय. -मं० १। सि० ३। सू० ३। आ० ५३। ५४।।
22
(समीक्षक) मुसलमान लोक खुदाशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट मानीत
नाहीत. तर मग त्याने कोणाला व्हायला सांगितले ? आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे कोण झाले ?
याचे उत्तर मुसलमान सात जन्मांतही देऊ शकणार नाहीत. कारण
उपादान कारणाशिवाय कधीही कार्य होऊ शकत नाही. कारणाशिवाय कार्य झाले असे म्हणणे
म्हणजे आईबापांशिवाय माझे शरीर निर्माण झाले असे म्हणण्यासारखे आहे. जो इतरांना
फसवितो व मक्कारी करतो तो कधीही ईश्वर तर असूच शकत नाही पण कोणताही सज्जन माणूस
देखील असले कृत्य करीत नाही. ॥५२॥
(५३) तुम्हाला इतके पुरे नाही काय की तुमचा पालनकर्ता
(आकाशातून) तीन हजार दूत पाठवून तुमची मदत करील. -मं० १। सि० ४। सू० ३। आ० १२४।।
(समीक्षक) पूर्वीच्या काळी जो अल्ला मुसलमानांना तीन हजार
देवदूतांसह साह्य करीत असे तो आता मुसलमानांची अनेक राज्ये नष्ट झाली व होत आहेत
तरी त्यांच्या साह्याला धावून का येत नाही ? यावरून ही गोष्ट केवळ मूर्ख लोकांना लालूच दाखवून आपल्या
जाळ्यात अडकविण्यासाठी रचलेली असून ती अत्यंत अन्यायाची आहे. ॥५३ ॥
(५४) नास्तिक लोकांवर आम्हांस विजयी कर. तुमचा (खरा)
हितचिंतक परमेश्वर होय व तो (सर्व मदतगारांत) उत्तम मदतगार होय आणि परमेश्वराच्या
मार्गात जर तुम्ही मारले जाल अगर मरुन जाल तर परमेश्वराची क्षमा व दया,
लोक (धनदौलत काही काळ जपून) गोळा करतात त्याहून उत्तम होय.
-मं० १। सि० ४। सू० ३। आ० १४७। १५०। १५८।।
(समीक्षक) आता ही मुसलमानांची चूक लक्षात घ्या. हे लोक
आपल्याहून वेगळ्या पंथाच्या लोकांना मारण्यासाठी खुदाची प्रार्थना करतात. त्यांचे
म्हणणे ऐकण्या इतका परमेश्वर भोळा आहे काय ? अल्ला फक्त मुसलमानांचे कार्य सिद्ध आहे तर मग मुसलमानांची
कामे नाश का होतात ? हा खुदा मुसलमानांच्या मोहात फसलेला दिसतो. खुदा जर असा पक्षपाती आहे तर
धर्मात्मा पुरुषांच्या दृष्टीने तो कधीच उपासनीय होऊ शकत नाही.॥५४॥
(५५) आणि परमेश्वर असाही नव्हे की,
तुम्हाला अदृष्ट गैबी गोष्टी कळवील. पण (होय) परमेश्वर
आपल्या पैगंबरापैकी ज्याला इच्छितो त्याला निवडून घेतो. तर तुम्ही परमेश्वर व
त्याचे पैगंबर यांजवर विश्वास -मं० १। सि० ४। सू० ३। आ० १७९।।
(समीक्षक) जर मुसलमान लोक खुदाखेरीज इतर कोणावरही श्रद्धा
ठेवीत नाहीत आणि इतर कोणाला खुदाचा भागीदार मानत नाहीत तर मग त्यांनी पैगंबर साहेबांना
श्रद्धेच्या बाबतीत खुदाबरोबर सामील का केले आहे? अल्लाने पैगंबराबर श्रद्धा ठेवा असे लिहिले. यामुळे पैगंबर
अल्लामध्ये सामील झाला; या वचनाचा अर्थ जर असा लावला गेला की, मुहम्मद साहेब ईश्वराचे प्रेषित (पैगंबर) आहेत यांवर
श्रद्धा ठेवली पाहिजे, तर मग असा प्रश्न निर्माण होतो की, मुहम्मद साहेबांना प्रेषित समजण्याची काय आवश्यकता आहे ?
त्यांना प्रेषित बनविल्याशिवाय खुदा आपले अभीप्सित कार्य
करू शकत नसेल तर तो गक्कीच असमर्थ आहे. ॥५५॥
२३
खुदा व पैगंबर भांडखोर
(५६) हे श्रद्धावानांन! (अल्लाच्यामार्गात आलेल्या कष्टांना
तोंड देण्यासाठी) सहन करा, सहनशीलतेच्या बाबतीत (एकमेकांच्या) पुढे रहा आणि काफिरोशी मुकाबला करण्यासाठी
तयार रहा (पाय रोवून उभे रहा) आणि परमेश्वराला भिऊन रहा. त्यायोगे तुमच्या अभिलाषा
कदाचित पूर्ण होतील. -मं० १। सि० ४। सू० ३। आ० १८६।।
(समीक्षक) हा कुराणातील खुदा आणि पैगंबर दोघेही व युद्धखोर
होते. जो लढाईचा हुकूम देतो तो शांतताभंग करणारा असतो. ईश्वराला नाममात्र
भ्याल्याने मुक्ती मिळते काय ? की अधर्मयुद्धापासून दूर राहिल्याने मुक्त होता येते ?
प्रथम पक्षानुसार ईश्वराला भिणे न भिणे हे सारखेच आहे.
दुसऱ्या पक्षानुसार मात्र अधर्मयुद्धाची भीती बाळगणे योग्य ठरते. ॥५६॥
(५७) ह्या परमेश्वराच्या (बांधीव) मर्यादा होत आणि जो
परमेश्वर व त्याचा पैगंबर यांच्या हुकुमाप्रमाणे चालेल,
(परलोकी) त्याला परमेश्वर अशा
बागांत (नेऊन) दाखल करील की ज्यांच्या खालून (पाण्याचे) पाट वाहत असतील आणि हे
मोठे सार्थक होय आणि जो कोणी, परमेश्वर व त्याचा पैगंबर यांच्या हुकुमाचा अनादर करील व
परमेश्वराच्या (बांधीव) मर्यादांचे उल्लंघन करील त्याला परमेश्वर नरकाग्नीत नेऊन
दाखल करील. तो त्यात निरंतर राहील; व त्याला फजितीची शिक्षा (प्राप्त) होईल. -मं० १। सि० ४।
सू० ४। आ० १३। १४।।
(समीक्षक) ख़ुदानेच मुहम्मद साहेब पैगंबरांना स्वतःमध्ये
सामील (सहभागी) करून घेतले आहे आणि स्वतःच कुराणात तसे लिहून ठेवले आहे. खुदा
पैगंबर साहेबांमध्ये असा काही गुंतला आहे की, त्याने स्वर्गामध्येही पैगंबराला भागीदार बनविले आहे. एकाही
बाबतीत मुसलमानांचा खुदा स्वतंत्र नाही. म्हणून त्याला अद्वितीय म्हणणे व्यर्थ
आहेअसल्या चुकीच्या गोष्टी ईश्वरीय ग्रंथात असू शकत नाहीत. ॥५७॥
(५८) (परमेश्वर) कोणावर अणुमात्रही जुलूम करीत नाही आणि
(कोणाचे अणुमात्रही) पुण्य असेल तर तो ते अनेक पटींनी वाढवितो व आपल्याकडून मोठा
मोबदला देतो. -मं० १। सि० ५। सू० ४। आ० ४०।।
(समीक्षक) ईश्वर कोणावर अणुमात्रही अन्याय करीत नाही तर तो
पुण्य द्विगुणित कसे करतो? आणि मुसलमानांसाठी पक्षपात का करतो? वस्तुतः ईश्वर कर्माची फळे कमी अथवा जास्त देईल तर तो अन्यायी
ठरेल. ॥५८॥
(५९) जेव्हा ते तुझ्यापासून (उडून) बाहेर जातात,
तेव्हा त्यांच्यांतून काही लोक रात्री (बसून बसून) आपण जे
बोलतात त्याच्या उलट (भलभलत्या) मसलती करू लागतात आणि जशजशा मसलती रात्री (बसून
बसून) ते करतात त्या परमेश्वर (आपल्या दूताद्वारे) नोंदीत जातो. परमेश्वराने
त्यांच्या कर्माच्या शासनार्थ (त्यांच्या बुद्धीस) पालथे केले आहे. (म्हणूनच ते
बहकून गेले आहेत) का तुम्ही हे इच्छितो की, ज्याला परमेश्वराने बहकविले आहे त्याला तुम्ही सन्मार्गी
लावावे (आणि) ज्याला परमेश्वर बहकवील, त्याच्यासाठी तुमच्यातून कोणी मार्ग काढील हे अशक्यच. -मं०
१। सि० ५। सू० ४। आ० ८१-८८।।
(समीक्षक) जर अल्ला (प्रत्येक जीवाच्या कर्माच) जमाखर्च
हिशेबाच्या वहीत लिहून ठेवीत असेल तर तो सर्वज्ञ नाही. तो सर्वज्ञ असेल तर त्याला
लिहून ठेवण्याची काय गरज? मुसलमान असे म्हणतात की, सैतानच
24
सर्वांना चुकीच्या मार्गाला लावतो
म्हणून तो दुष्ट आहे. परंतु येथे तर खुद्द अल्लाच जीवांना बहकावीत आहे. मग खुदा
आणि सैतान यांच्यात काय फरक उरला? होय एक फरक सांगता येईल की, खुदा हा मोठा सैतान असून सैतान हा छोटा सैतान आहे. कारण
मुसलमानांचे असे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे की, जो बहकावतो तोच सैतान होय. त्यांच्या म्हणण्यानुसार खुदाही
सैतान ठरतो. ॥५९॥
(६०) आणि (लढाईपासून) आपले हात न आवरून धरतील तर त्यांना धरा
व जेथे तुम्ही त्यांना पावाल तेथे त्यांना ठार करा आणि कोणाही मुसलमानास वाजवी
नाही की त्याने मुसलमानास (जिवे) मारून टाकावे. आणि जो मुसलमानाला चुकीने (ही)
मारून टाकील तर एक मुसलमान गुलाम मुक्त करणे आणि जो मुसलमानस बुध्या (जिवे) मारून
टाकील तर त्याची शिक्षा जहन्नम (म्हणजे नरकामी) होय. की तो त्यात नित्य राहील आणि
त्याच्यावर परमेश्वराचा गजब (सादर) होईल व त्याच्यावर परमेश्वराचा शाप उतरेल. -मं०
१। सि० ५। सू० ४। आ० ९१। ९२। ९३।।
(समीक्षक) आता पाहा, हि केवढी महापक्षपाताची गोष्ट आहे! जो मुसलमान नसेल तो जेथे
सापडेल तेथे त्याला ठार मारा आणि मुसलमानांना मारू नका. चुकून मुसलमान मारले गेले
तर त्याबद्दल प्रायश्चित सांगितले आहे. परंतु मुस्लिमेतराला मारल्यास स्वर्ग मिळेल
असे म्हटले आहे. असला उपदेश कचऱ्याच्या टोपलीत टाकला पाहिजे. असले मतग्रंथ,
असले पैगंबर, असले ईश्वर आणि असले पंथ जगाचे कल्याण करण्याऐवजी अहितच
करतात. असले पंथ नसणेच चांगले असल्या प्रमादसह पंथांपासून चार हात दूर राहून
शहाण्या लोकांनी वेदोक्त धर्माचा स्वीकार केला पाहिजे. कारण त्यात किंचितही असत्य
नाही. इस्लाम सांगतो की, जो कोणी मुसलमानाला ठार मारील तो नरकात जाईल आणि इतर पंथांचे लोक असे मानतात
की मुसलमानाला ठार मारणाऱ्याला स्वर्ग मिळतो. आता तुम्हीच सांगा की,
या दोन मतापैकी कोणते मत स्वीकारावे व कोणते सोडावे ?
परंतु असले मूखतापूर्ण व कल्पित पंथ सोडून देऊन वेदोक्त
मताचा स्वीकार करणे हेच सर्व मानवांना उचित होय. वेदोक्त धर्म सर्वोतम आहे.
ज्यानुसार आर्य मार्गावरून म्हणजे श्रेष्ठ पुरुषांच्या मार्गावरून चालावे आणि
दस्यूंच्या म्हणजे दुष्ट लोकांच्या मार्गापासून दूर राहावे. ॥६०॥
(६१) आणि जो कोणी सरळ मार्ग स्पष्ट दिसून आल्यावर पैगंबराचे
उलट जाईल व मुसलमानांच्या मार्गाशिवाय (अन्यमार्गी) लागेल,
तर त्याला नरकाग्नीत (नेऊन) दाखल करू. -मं० १। सि० ५। सू०
४। आ० ११५।।
(समीक्षक) आता खुदा व रसूल (पैगंबर) यांच्या पक्षपातपूर्ण
गोष्टी पाहा! मुहम्मद साहेब वगैरे असे समजत होते की, आपण खुदाच्या नावावर असे लिहिले नाही तर आपला पंथ वाढणार
नाही,
पदार्थ मिळणार नाही व चैन करता येणार नाही. यावरूनच हे
लक्षात येते की, ते
आपला स्वार्थ साधण्यात आणि इतरांची उद्दिष्टे निष्फळ करण्यात पटाईत होते. यावरून
ते अनाप्त होते त्यांचे म्हणणे प्रमाण आहे असे आप्त व विद्वानासमोर कधी होऊ शकणार
नाहीत.॥६१॥
(६२) जो कोणी परमेश्वरास नाकारील व त्याच्या दूतास व
त्याच्या पुस्तकास व त्याच्या पैगंबरास व शेवटच्या दिवसास (नकारील) तर तो
(सन्मार्गहीन) फारच दूर भटकत गेला. ज्या लोकांनी विश्वास धरला,
25
पुन्हा (विश्वासास) नाकारले व
नाकारणीनंतर ते नास्तिकपणात वाढतच गेले. तर परमेश्वर त्यांना क्षमा करणार नाही व
(सरळ ) मार्गही दाखविणार नाही. -मं० १। सि० ५। सू० ४। आ० १३६। १३७।।
(समीक्षक) अजूनही ईश्वर (खुदा) अद्वितीय राहू शकतो काय ?
खुदा एकमेवाद्वितीय आहे, त्याच्यामध्ये कोणीही सहभागी नाही असे एका बाजूने म्हणत
राहावयाचे आणि त्याचवेळी त्याच्यामध्ये अनेक लोक सहभागी आहेत असेही मानीत
राहावयाचे हे परस्परविरोधी वर्तन नव्हे काय ? तीनदा तोबा केल्यानंतर खुदा क्षमा करीत नाही काय?
आणि तीन वेळा पाप केल्यावर सन्मार्ग दाखवितो व चौथ्या
वेळेपासून सन्मार्ग दाखवीत नाही, जर लोक चार-चार वेळा नास्तिकता करतील तर नास्तिकता खूपच
बोकाळेल. ॥६२॥
(६३) परमेश्वर दांभिक वनास्तिक अशा सर्वांना नरकाग्नीत (एका
जागी) गोळा करील. दांभिक लोक (मुसलमानांस धोका दिल्याने जणू की) परमेश्वरास धोका
देतात आणि वास्तविक (त्यांच्या परिपत्यास्तव) परमेश्वर त्यांनाच धोका देतो आहे.
अहो मुसलमानांनो ! तुम्ही मुसलमानांस सोडून नास्तिकांस मित्र पत्करू नका. -मं० १।
सि० ५। सू० ४। आ० १४०। १४२। १४४।।
(समीक्षक) सारे मुसलमान स्वर्गात जातील व इतर पंथाचे अनुयायी
नरकात जातील याला प्रमाण (पुरावा) काय ? वाहवा! जो खुदा वाईट लोकांकडून फसविला जातो व जो इतरांना
फसवितो असला खुदा आमच्यापासून दूर राहिलेलाच बरा. त्याने फसव्या लोकांशी मैत्री
करावी आणि त्या लोकांनीही त्याच्याशी दोस्ती करावी. कारण,
'यादृशी शीतला देवी तादृशः खारवाहनः'।
जशास तसा भेटतो तेव्हा त्यांचे काम
चालते. ज्यांचा खुदा फसवा, धोकेबाज आहे ते लोक म्हणजे त्याचे उपासकही तसेच फसवणूक करणारे,
धोकेबाज का नसावेत ? एखाद्या दुष्ट मुसलमानाशी मैत्री आणि एखाद्या सज्जन
मुस्लिमेतराशी शत्रुत्व करणे कोणाच्याही दृष्टीने उचित आहे काय ?॥६३॥
(६४) अहो मनुष्य लोकहो! हा पैगंबर (महम्मद) तुम्हाकडे
तुमच्या पालनकर्त्याकडून सत्य (धर्म) घेऊन आला आहे. तर विश्वास धरा आणि परमेश्वर
सर्वांना कर्ताहर्ता होय. बस्स!. -मं० १। सि० ६। सू० ४। आ० १७०। १७१।।
(समीक्षक) पैगंबरावर श्रद्धा ठेवा असे सांगितल्याने
श्रद्धेच्या बाबतीत पैगंबर हा खुदाचा सहभागी म्हणजे भागीदार ठरतो की नाही?
अल्ला एकदेशी आहे. तो सर्वव्यापक नाही. म्हणून त्याच्याकडून
पैगंबर (प्रेषित) येत-जात असतात. असला अल्ला कधीच ईश्वर असू शकत नाही. कुराणामध्ये
कोठे ईश्वर हा सर्वव्यापक आहे असे म्हटले आहे तर कोठे तो एकदेशी असल्याचा उल्लेख
येतो. यावरून कुराण हे एका व्यक्तीने रचलेले नसून अनेकांनी ते लिहिले आहे असे
सिद्ध होते. ॥६४॥
(६५) मेलेले (जनावर) व रक्त व डुकराचे मांस आणि जे (जनावर)
परमेश्वराशिवाय अन्य कोणास (जबे करतेवेळी-कापताना) नामनिर्दिष्ट केले गेले असेल ते
व जे गुदमरून मेले असेल ते व मार लागून मेलेले व उंचीवरून पडून गेलेले व (दुसऱ्या
कोणा जनावराचे) शिंग भोसकून मेलेले आणि (तसेच) ज्या (जनावरा) स हिंस्र श्वापदांनी (फाडून)
खाल्ले असेल ते (जनावर) ही सर्व तुम्हांस शास्त्रानिषिद्ध (हराम) होत. -मं० २। सि०
६। सू० ५। आ० ३।।
26
(समीक्षक) एवढेच पदार्थ हराम (निषिद्ध) आहेत काय ?
मग बाकीचे पशुपक्षी, किडे वगैरे मुसलमानांच्या दृष्टीने हलाल (शास्त्राविहित,
सेवनीय) आहेत असे समजावयाचे काय?
यावरूनच ही माणसाची कल्पना आहे ईश्वरी कल्पना नाही,
असे सिद्ध होते. म्हणून हे वचन प्रमाण मानता येत नाही. ॥६५॥
(६६) खुषदिलाने परमेश्वरास कर्ज देत राहाल तर मी अवश्य तुमची
पापे तुम्हांपासून दूर करीन आणि जरूर तुम्हांस (स्वर्गाच्या) अशा बागात नेऊन दाखल करीन.
-मं० २। सि० ६। सू० ५। आ० १२।।
(समीक्षक) वाहवा ! मुसलमानांच्या खुदाच्या घरी थोडादेखील
पैसा अडका उरला नसावा. त्याच्याजवळ पैसा असता तर त्याने कर्ज किंवा उसने पैसे का
मागितले असते ? आणि
तुमची पापे नष्ट करून मी तुम्हांला स्वर्गात पाठवीन अशी लालूच त्याने पाप्यांना का
दाखविली असती ? यावरून
असे. दिसते की, मुहम्मद
साहेबांनी खुदाच्या नावावर स्वत:चा स्वार्थ सिद्ध केला. ॥६६॥
(६७) परमेश्वर ज्याला इच्छिल त्याला क्षमा करील व ज्याला
इच्छिल त्याला शिक्षा देईल. तुम्हांस अशा अशा देणग्या दिल्या की ज्या अलम
दुनियेच्या लोकांपैकी कोणासच दिल्या नाहीत. -मं० २। सि० ६। सू० ५। आ० १८। २०।।
(समीक्षक) सैतान जसा वाटेल त्याला पापी बनवितो तसाच
मुसलमानांचा खुदाही सैतानाचे काम करतो. असे असल्यामुळे स्वर्गात किंवा नरकात फक्त
खुदानेच गेले पाहिजे, कारण बरी व वाईट कृत्ये करणारा खुदाच असतो; आणि जीव पराधीन असतो. सैन्य हे सेनापतीच्या आधीन असते व ते
त्याच्या आज्ञेनुसार कोणाचेही रक्षण करते अधवा कोणालाही ठार मारते. त्याच्या
भल्याबुऱ्या कृत्याची जबाबदारी सेनापतीवर असते. ती सैन्यावर नसते. ॥६७॥
(६८) तुम्ही परमेश्वराची आज्ञा माना व पैगंबराची आज्ञा माना.
-मं० २। सि० ७। सू० ५। आ० ९२।।
(समीक्षक) पाहा ! पैगंबर हा खुदाचा भागीदार आहे. अशा स्थितीत
खुदा एकमेवाद्वितीय आहे असे मानणे निरर्थक आहे. ॥६८॥
(६९) पूर्वी जे झाले गेले त्याची परमेश्वराने माफी केली आणि
जो पुन्हा (असे काम) करील तर परमेश्वर त्याच्यापासून (आज्ञाभंगाचा) बदला घेईल.
-मं० २। सि० ७। सू० ५। आ० ९५।।
(समीक्षक) केलेल्या पापांबद्दल क्षमा करणे म्हणजे पाप
करण्याची अनुज्ञा देऊन पापांच्या वाढीस उत्तेजन देण्यासारखेच आहे. पापाला क्षमा
काण्याची गोष्ट ज्या पुस्तकात असेल ते ईश्वराने अधवा एखाद्या विद्वानाने रचलेले
नसून ते पापवर्धक आहे, होय ! भावी पापांपासून दूर ठेवण्यासाठी एखाद्याची प्रार्थना करणे आणि
पापापासून अलिप्त राहण्यासाठी पुरुषार्थ व पश्चात्ताप करणे हे उचित आहे. परंतु
माणूस फक्त पश्चात्ताप करीत. राहील आणि पापे करणे सोडणार नाही तर त्याने काहीच
साध्य होणार नाही. ॥६९॥
(७०) आणि अशा मनुष्याहूनही जास्त जालीम (आणखी) कोण होणार की,
जो परमेश्वरावर खोटे कुभांड रचितो,
अथवा असे प्रतिपादितो की, मजकडे प्रकटीकरण आले आहे आणि वास्तविक पाहू जाता,
त्याजकडे कसलेच काही प्रकटिले गेले नाही ?
आणि जो विधान करितो की, (कुरआन) जे (तुम्ही म्हणता की, ते) परमेश्वराने प्रकट केले आहे. (म्हणाल तर) तसलेच मी आता
प्रकट करीन. -मं० २। सि० ७। सू० ६। आ० ९३।।
27
(समीक्षक) या आयतीवरून असे सिद्ध होते की,
माझ्याकडे परमेश्वराकडून आयती (वचने किंवा आज्ञा) येतात,
असे जेव्हा मुहम्मद साहेब म्हणत होते तेव्हा आणखी कोणीतरी
मुहम्मद साहेबांप्रमाणेच 'माझ्याकडेही ईश्वराकडून आयती येतात, म्हणून मलाही पैगंबर माना’ असे म्हणणारा निघाला असावा.
आपल्या या प्रतिस्पर्ध्यावर मात करावी आणि आपले महत्व वाढवावे या हेतूने त्यांनी
ही आयत रचली असावी. ॥७०॥
खुदा व सैतानाचे भांडण
(७१) आणि आम्ही तुम्हांस (म्हणजे तुमचा पिता आदम यास)
निर्मिले व नंतर आम्हीच तुमचे (म्हणजे तुमचा पिता आदम याचे) रूप धाडिले. तदनंतर
आम्ही दूतास फर्माविले की, तुम्ही आदमच्या पुढे नमन करा. तेव्हाच सर्वांनी) नमन केले. पण इब्लीस (सैतान)
हा नमन करणाऱ्यांत (सामील) झाला नाही. परमेश्वराने (इब्लीसला) विचारले की,
जेव्हा मी तुला हुकूम दिला तेव्हा (आदमच्या पुढे)
नसण्यापासून तुला कोणत्या वस्तूने अटकाव केला? तो बोलला, मी याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. (का की) मला तू अग्नीपासून
निर्मिलेस व त्याला (आदमला) मातीतून पैदा केलेस (यावर परमेश्वराने) फर्माविले (की
तुझी ही शेखी आहे) तू स्वर्गातून खाली उतर. का तर तुला हे शोभत नाही की,
तू स्वर्गात (राहून) शेखी मिरवावीस ! तो अर्ज करू लागला की,
ज्या दिवशी (सर्व) लोक (पुन्हा जिवंत) उठवून उभे केले जातील
त्या दिवसापर्यंतचा तु मला अवकाश दे. (परमेश्वराने) म्हटले. (जा! मंजूर!) तू अवकाश
दिलेल्यांपैकी आहेस. (यावर सैतान) बोलला की, जशी तू माझ वाट मारली आहेस तसाच मीही तुझ्या सरळ मार्गावर
मनुष्य जातीस टपून बसेल तरच खरा आणि तू बहुतेक मनुष्य जातीस (आपले) आभारी पावणार
नाहीस. (परमेश्वराने) फर्माविले की, स्वर्गातून निघ. (तू) तुच्छ व बहिष्कृत झालेला (आहेस).
मनुष्यमात्रातून जो कोणी तुझे अनुकरण करील, मी नि:संशय तुम्हां सर्वांनी जहन्नम भरून टाकीन. -मं० २।
सि० ८। सू० ७। आ० ११। १२। १३। १४। १५। १६। १७।।
(समीक्षक) आता खुदा आणि सैतान यांच्यातील भांडणाची सुरस कथा
लक्ष देऊन ऐका. एखाद्या अगदीच साधारण पट्टेवाल्याच्या लायकीचा असणारा सैतान हा
देवदूत (फरिश्ता) होता. तो ख़ुदालाही दबला नाही; आणि खुदाही त्याच्या आत्म्याला पवित्र करू शकला नाही. जो
सैतान पापी बनून बंड करून उठला तरी खुदाने त्याला सोडून दिले. खुदाची ही फारच मोठी
चूक होती. सैतान हा सर्वांना बहकाविणारा आहे आणि खुदा सैतानाला बहकावतो. यावरून
असे सिद्ध होते की, खुदा हा सैतानाचाही सैतान आहे. कारण खुद्द सैतानच देवाला सांगतो की,
"तू मला चुकीच्या मार्गाला लावलेस," यामुळे खुदामध्ये पावित्र्य आढळत नाही आणि
सर्व पापांचे मूळ कारण खुदाच ठरतो. असला परमेश्वर मुसलमानांनाच होऊ शकतो. इतर
श्रेष्ठ विद्वानांचा तो परमेश्वर असू शकत नाही. शिवाय देवदूतांशी माणसाप्रमाणे
संभाषण करणारा देहधारी, अल्पज्ञ व त्यावरहित असा मुसलमानांचा खुदा आहे. म्हणूनच
विद्वान लोक इस्लामी पंथ पसंत करीत नाहीत. ॥७१॥
(७२) (लोकांनो) निःसंशय तुमचा पालनकर्ता हाच (असा) परमेश्वर
होय की,
त्याने सहा दिवसांत
28
आकाश व पृथ्वी ही निर्माण केली;
व मग तो (अर्श ऊर्फ) महासिंहासनारूढ झाला. (लोकांनो) तुम्ही
आपल्या पालनकर्याचा काकुळतीस येऊनच चुपचाप धावा करीत जा. -मं० २। सि० ८। सू० ७। आ०
५४। ५६।।
(समीक्षक) छान जो सहा दिवसात जग बनवितो म्हणजे आकाशातील
सिंहासनावर विश्रांती घेतो ईश्वर कधीतरी सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापक असू शकतो काय?
तसा तो नसल्यामुळे त्याला खुदा म्हणजे ईश्वरही म्हणता येत
नाही. तुमच्या खुदाला मोठ्याने ओरडून बोलवावे लागते. म्हणजे तो बहिरा आहे की काय?
या सर्व गोष्टी अनीश्वरकृत आहेत. म्हणून कुराण ईश्वरकृत असू
शकत नाही. त्याने सहा दिवसात जग निर्माण केले व सातव्या दिवशी सर्वात वरच्या
(आठव्या) स्वर्गात विश्रांती घेतली. म्हणजे तो थकून गेला असावा. तो अजून झोपला आहे
की,
जागा झाला आहे? जर तो जागा असेल तर हल्ली तो काही काम करतो की नुसतीच
भटकंती आणि ऐषआराम करतो? ॥७२॥
(७३) देशात फिसाद फैलावीत फिरू नका. -मं० २। सि० ८। सू० ७।
आ० ७४।।
(समीक्षक) ही गोष्ट चांगली आहे. परंतु याउलट कुराणामध्ये
इतरत्र जिहाद (धर्मयुद्ध) करा आणि कफिरांची कत्तल करा असेही सांगितले आहे. या
परस्परविरोधी गोष्टी नव्हेत काय ? यावरून असे दिसते की, जेव्हा मुहम्मद साहेब दुर्बळ झाले असतील तेव्हा त्यांनी या
सामोपचाराच्या मार्गाचा उपदेश केला असावा आणि सबळ झाल्यावर जिहादची कल्पना त्यांना
सुचली असावी. या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी असल्यामुळे त्या दोन्ही खऱ्या नाहीत.
॥७३॥
(७४) यावर मूसाने आपली काठी टाकून दिली. तो काय पाहतात की तो
धडधडीत अजगर आहे. -मं० २। सि० ९। सू० ७। आ० १०७।।
(समीक्षक) आता या लिखाणावरून असे दिसून येते की असल्या खोटया
गोष्टी खुदा आणि मुहम्मद साहेब हे दोघेही खऱ्या मानीत होते. जर असे असेल तर ते
दोघेही विद्वान नव्हते. कारण डोळे पाहण्याचे आणि कान ऐकण्याचे जे काम करतात ते इतर
अवयवांकडून करवून घेता येत नाही म्हणून ही सगळी जादूगिरी आहे. ||७४|
(७५) मग आम्ही त्यांच्यावर तुफान (वादळ) पाठविले व तसेच टोळ,
उवा, बेडूक आणि रक्त. (सारांश) सरतेशेवटी आम्ही त्यांच्यापासून (त्यांच्या
खोडसाळपणाचा) बदला घेतलाच (घेतला) आम्ही त्यांना समुद्रात ठार करून टाकले आणि
आम्ही बनी इस्राएलांस समुद्रपार पोहोचवून दिले आणि जी (जी) कर्में हे लोक करीत आले
आहेत ती (सर्व) निरर्थक होत. -मं० २। सि० ९। सू० ७। आ० १३३। १३६। १३७। १३९।।
(समीक्षक) आता पाहा. एखाद्या लबाड इसमाने एखाद्याला अशी धमकी
द्यावी की मी तुला ठार मारण्यासाठी तुझ्यावर साप सोडीन,
तशीच ही गोष्ट आहे. जो खुदा पक्षपात करून एका जातीला बुडवून
टाकतो आणि दुसऱ्या जातीला पैलतीराला सुखरूप नेऊन पोचवितो तो अधर्मी,
पापी आहे असे का म्हणू नये? ज्या दुसऱ्या पंथांचे कोट्यवधी अनुयायी आहेत ते पंथ खोटे
आहेत आणि आपणच खरे आहोत असे जो पंथ म्हणतो त्याच्याहून जास्त खोटा पंथ कोणता असेल ?
कारण कोणत्याही पंथात सर्व माणसे चांगली अथवा सर्व
29
माणसे वाईट असू शकत नाहीत. असा
एकतर्फी निर्णय देणारा पंथ हा महामुर्खाचा पंथ आहे. जुन्या कराराच्या (बायबलाच्या)
आधारावर उभारलेला धर्म खोटा होता काय ? की खोटा ठरविला गेलेला पंथ दुसराच एखादा होता ?
जर तो दुसरा एखादा पंथ असेल तर तो कोणता होता ?
कुराणामध्ये कोणत्या नावाने त्या पंथांचा उल्लेख आलेला आहे ?
॥७५॥
(७६) मग जेव्हा त्याच्या पालनकर्त्याने पर्वतावर (आपले)
जाज्वल्य स्वरूप प्रकट केले तेव्हा (भूकंप झाला व परमेश्वराने) त्याला चक्काचूर
केले व मूसा (मोझेस) मूर्छित होऊन पडला. -मं० २। सि० ९। सू० ७। आ० १४३।।
(समीक्षक) जे पाहण्यात येते ते व्यापक असू शकत नाही आणि जर
खुदा असले चमत्कार करीत पूर्वी फिरत होता तर आता तो असले चमत्कार कोणालाही करून का
दाखवीत नाही? या
सगळ्या गोष्टी ज्ञानविरोधी व म्हणून खोट्या असल्यामुळे त्या मान्य करण्यास योग्य
नाहीत. ॥७६॥
(७७) आणि हे (पैगंबरा!) तू आपल्या मनातल्या मनातच नम्रतापूर्वक
व भिऊन (भिऊन) मोठ्या आवाजात नव्हे (तर मंद स्वराने) सांजसकाळ आपल्या
पालनकर्त्याचे स्मरण कर. -मं० २। सि० ९। सू० ७। आ० २०५।।
(समीक्षक) कुराणामध्ये कोठे-कोठे असे लिहिले आहे की,
आपल्या स्वामीला जोरजोरात ओरडून हाक मार. तर कोठे-कोठे
मनातल्या मनात हळूहळू ईश्वराचे स्मरण कर असे सांगितले आहे. आता तुम्हीच सांगा,
यातली कोणती गोष्ट खरी आहे? आणि कोणती खोटी? परस्पर विरोधी गोष्टी बोलणे म्हणजे प्रमत्त गाणे होय.
अर्थात् चुकून एखादी गोष्ट परस्पर विरोधी लिहिली बोलली गेली असेल तर ती चूक मान्य
करण्यास काहीच हरकत नसावी. ॥७७॥
(७८) (हे पैगंबरा! मुसलमान शिपाई) तुला लुटीचे मालाविषयी
प्रश्न करतात. (तर तू त्यांना) सांगून दे की, लुटीचा माल तर परमेश्वर व पैगंबर यांचा होय. म्हणून तुम्ही
परमेश्वरास भ्या. -मं० २। सि० ९। सू० ८। आ० १।।
(समीक्षक) जे लुटालुट करतात, दरोडे घालतात व घालायला लावतात त्यांनी स्वतःला खुदा,
पैगंबरा व प्रामाणिकही म्हणवून घ्यावे ही केवढी आश्चर्याची
गोष्ट आहे हे लोक अल्लाची भीती दाखवतात व दरोडे घालण्यासारखी दुष्कृत्येही करीत
राहातात. या लोकांना आमचा पंथ फार चांगला आहे. असे म्हणण्याची लाज कशी वाटत नाही?
हटवादीपणा सोडून देऊन सत्य अशा वैदिक धर्माचा स्वीकार न
करणे याहून अधिक वाईट गोष्ट ती कोणती ?॥७८॥
(७९) आणि नास्तिकांचा (काफिरों) मूलच्छेद (समूळ उच्चाटन)
करून टाका. मी लागोपाठ हजार देवदूतांनिशी तुमची (तुम्हाला) मदत करीन. मी लवकरच जे
नास्तिक आहेत त्यांच्या अंतःकरणात दहशत घालून टाकीन. (बरे) तर मारा त्या
नास्तिकांच्या मानांवर व मारा त्यांच्या (बोटांच्या) पेरापेरावर.-मं० २। सि० ९।
सू० ८। आ० ७। ९। १२।।
(समीक्षक) वाहवा कसला हा खुदा आणि कसले हे पैगंबर! निर्दयी
आहेत हे ! ते मुसलमानांखेरीज इतर मतस्थ काफिरांची पाळेमुळे उखडून टाकतात. जो खुदा
आपल्या भक्तांना काफिरांच्या माना कापण्याचे व हातापायांचे सांधे कापून टाकण्याची
आज्ञा,
अनुमती देतो व त्या कामी त्यांना मदत करतो तो क्रौर्याच्या
30
बाबतीत रावणाहून कमी आहे काय ?
हा सारा प्रपंच कुराण रचणाऱ्याचा आहे. तो ईश्वराचा नाही.
परंतु जर तो खुदाचाच असेल तर असला खुदा आमच्यापासून दूर राहिलेला बरा आणि आपणही त्यांच्यापासून
दूर राहावे हेयच बरे.॥७९॥
(८०) परमेश्वर विश्वासू मुसलमानांबरोबर आहे. तुम्ही परमेश्वर
व पैगंबर यांचा हकूम (सावधान चित्ताने ऐका व) मान्य करा. अहो मुसलमानांनो !
परमेश्वर व पैगंबर यांच्याशी दगलबाजी करू नका व आपल्याही अमानतीत दगलबाजी करू नका
व परमेश्वर डाव चालवीत होता आणि परमेश्वर सर्व डावकर्त्यात उत्तम डावकर्ता आहे.
-मं० २। सि० ९। सू० ८। आ० १९। २०। २९। ३०।।
(समीक्षक) मुसलमानांचा अल्ला पक्षपाती आहे काय?
तसे असेल तर तो अधर्म करीत आहे. कारण परमेश्वर हा सर्व जगाचा
आहे. जोराने हाक मारल्याशिवाय खुदाला ऐकू येत नाही काय?
तो बहिरा आहे काय ? त्याच्या बरोबरीने पैगंबराला भागीदार समजणे ही अत्यंत वाईट
गोष्ट नाही काय? अल्लाला
चोरीची एवढी भीती का वाटते ? त्याने आपला खजिना कोठेतरी भरून ठेवला आहे की काय?
अल्ला आणि रसूल यांची चोरी करू नका असे कुराण सांगते म्हणजे
इतर सगळ्यांची चोरी करावी काय? असला उपदेश अविद्वान वा अधर्मी लोकच करू शकतात. जो फसवाफसवी
करतो आणि लबाड लोकांचा साथीदार आहे तो ख़ुदा कपटी व लबाड व अधर्मी नव्हे काय ?
म्हणूनच कुराण हे ख़ुदाने रचलेले नसून एखाद्या कपटी व लबाड
माणसाने रचले असावे. तसे नसते तर कुराणात असल्या आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या का असत्या?॥८०॥
लुटीतील खुदाचा हिस्सा
(८१) आणि नास्तिकांशी (काफिरोशी) लढत राहा. येथपर्यंत की,
फंदफितूर (नावास देखील बाकी) राहणार नाही व धर्म सर्वस्वी
परमेश्वराचाच होईल आणि तुम्ही हे जाणून ठेवा की, जी चीजवस्तू तुम्ही (लढाईत) लुटून आणाल तिचा पाचवा हिस्सा
परमेश्वराचा व पैगंबराचा. -मं० २। सि० ९। सू० ८। आ० ३९। ४१।।
(समीक्षक) अशा प्रकारे अन्यायाने लढणारा-लढविणारा व शांततेचा
भंग करणारा मुसलमानांच्या खुदाखेरीज दुसरा कोण असणार ?
आता या पंथाचे स्वरूप पाहा! अल्ला आणि रसूल (पैगंबर)
यांच्यासाठी साऱ्या जगाला लुटणे, लुटविणे हे लुटारूचे काम नव्हे काय?
आणि लुटीच्या मालात खुदाची भागीदारी असणे म्हणजे जणू लुटारू
बनणेच आहे. अशा लुटारूंची बाजू घेणारा खुदा आपल्या खुदाईला म्हणजे ईश्वरत्वाला
बट्टाच लावतो आहे. हा ग्रंथ, असला खुदा आणि असला पैगंबर हे जगाला उपद्रव देऊन शांतता भंग
करून मानवजातीला दुःख देण्यास कोठून आले? असले पंथ जगात निर्माण झाले नसते तर साऱ्या जगाचे आनंदवन
झाले असते.॥८१ ॥
(८२) आणि (हे पैगंबरा) तू जर अशा वेळी नास्तिकाची स्थिती
पाहशील तर (फार बरे होईल को) जेव्हा दूत या नास्तिकांचे प्राण हरण करतात (व)
त्यांच्या तोंडावर व पाठीवर (लाथाबुक्क्यांचा) प्रहार करीत जातात व म्हणत जातात की
घ्या,
धगधगीत नरकाग्नीची शिक्षा तर चाखा. आम्ही त्यांना त्यांच्या
पापकर्माबद्दल नष्ट करून टाकीले आणि फिरऔनचे लोकांस गर्क करून टाकीले. जितकी
तुमच्याने होता येईल तितकी नास्तिकांच्या (सामन्या) साठी तयारी ठेवा. -मं० २। सि०
९। सू० ८। आ० ५०। ५४। ६०।।
31
(समीक्षक) काय महाराज? अलीकडेच रशियाने तुर्कस्तानचा पाडाव केला आणि इंग्लंडने
ईजिप्तची दुर्दशा करून टाकली. तेव्हा फरिश्ते झोपले होते काय ?
पूर्वीच्या काळी खुदा आपल्या भक्तांच्या शत्रुचा नायनाट
करीत असे,
ही गोष्ट खरी असती तर आताही त्याने तसेच करायला हवे. परंतु
तसे काही घडत नाही. म्हणून या गोष्टीवर विश्वास ठेवता येत नाही. आता पाहा!
"तुमच्याकडून होतील तितकी परमतस्थांना दुःख देणारी कृत्ये तुम्ही करा."
ही केवढी वाईट आज्ञा आहे! असली आज्ञा विद्वान, धार्मिक व दयाळू व्यक्तीची असू शकत नाही. तरीही ते लिहितात
की,
खुदा दयाळू व न्यायी आहे. असल्या आज्ञांवरून मुसलमानांचा
खुदा न्याय, दया
वगैरे सद्गुणांपासून फारच दूर आहे. ॥८॥
(८३) हे पैगंबरा ! परमेश्वर व मुसलमान लोक जे तुला अनुसरतात
ते तुला पुरे होत. हे पैगंबरा! तू मुसलमानांस (नास्तिकांशी) लढण्याचे प्रोत्साहन
दे;
की जर तुम्हां (मुसलमानां) पैकी सहनशील (व करारी) असे वीसही
असतील तर ते दोनशे (नास्तिक) वर जय पावतील. पण (असो,) जे काही तुम्हांस लुटीत मिळाले आहे ते हलालाचे (शुद्ध) व
पवित्र समजून खा; आणि परमेश्वरा (चे कोपा) स भीत राहा. परमेश्वर क्षमाशील (व) दयाळू आहे. -मं०
२। सि० १०। सू० ८। आ० ६४। ६५। ६९।।
(समीक्षक) जो आपल्या बाजूचा आहे त्याने अन्याय केला तरी
त्याचाच पक्ष घ्यावयाचा आणि त्याचा कायदा करावयाचा ही काय न्यायाची,
विद्वत्तेची व धर्माची गोष्ट म्हणावयाची ?
आणि जो प्रजेमध्ये शांतताभंग घडवून आणतो,
भांडणे लावून देतो, लढाया करवितो आणि लुटीचा माल शुद्ध व पवित्र ठरवितो त्यालाच
क्षमावान् व दवाळू म्हणणे हे काम खुदाचेच काय पण कोणत्याही भल्या माणसाचे असू शकत
नाही. असल्या गोष्टींमुळे कुराण हे ईश्वरप्रणीत होऊ शकत नाही. ॥८३॥
(८४) (आणि हे लोक) त्या बागांत सदासर्वदा राहतील. नि:संशय
परमेश्वरासमीप (पुण्याईचे) मोठे प्रतिफल होय. अहो मुसलमानांनो! जर तुमचे बाप व
तुमचे भाऊ विश्वासापुढे नास्तिकपणास प्रिय जाणतील तर तुम्ही त्यांना (आपले) स्नेही
बनवू नका. मग परमेश्वराने आपल्या पैगंबरावर व (तशीच) मुसलमानांवर आपल्याकडून शांती
उतरविली आणि (तुमच्या कुमकेस दूतांची) अशी सैन्ये पाठविली की,
जी तुम्हाला दिसून येत नव्हती आणि (अखेर) नास्तिकांस त्याने
शिक्षा दिली. मग या पश्चात् परमेश्वर ज्याचा इच्छिल त्याचा पश्चाताप मान्य करील.
जे परमेश्वराला मानीत नाहीत अशा (लोक) शीही तुम्ही लढा. -मं० २। सि० १०। सू० ९। आ०
२२। २३। २६। २७।।
(समीक्षक) छान ! स्वर्गात राहणाऱ्यांच्या जवळ अल्ला राहत
असेल तर तो सर्वव्यापक कसा होऊ शकेल? जो सर्वव्यापक नसेल तो सृष्टिकर्ता व न्यायाधीश होऊ शकत
नाही आणि आपली आई, बाप,
भाऊ व मित्र यांना सोडून देण्यास-त्यांचा त्याग करण्यास
सांगणेही अगदीच अन्यायाची गोष्ट आहे. ते चुकीचा उपदेश करतील तर तो ऐकता कामा नये.
परंतु सदैव त्यांची सेवा केली पाहिजे. पूर्वी खुदा मुसलमानांवर बेहद खुष होता आणि
त्यांच्या मदतीसाठी स्वर्गातून खाली लष्कर पाठवीत होता,
हे खरे असेल तर मग आता तो तसे का करीत नाही ?
तो पूर्वी काफिरांना शिक्षा देत होता आणि तर तो आता कोठे
गेला?
आपल्या अनुयायांना युद्ध
32
करायला लावल्याशिवाय खुदा आपल्या
विचारांचा प्रसार करू शकत नाही काय? हा कसला खुदा? तो तर
डावपेच करणारा खेळाडूच दिसतो. अशा
खुदाला आमची कायमची तिलांजली. ॥८४॥
(८५) आणि आम्ही तुमच्या ठायी या गोष्टीची वाट पाहतो आहे की,
परमेश्वर तुम्हांला आपल्याकडून एखाद्या शिक्षेत पीडा देवो.
अगर आमच्या हातून (तुम्हांस एखादी शिक्षा देवो!) -मं० २। सि० १०। सू० ९। आ० ५२।।
(समीक्षक) सगळे मुसलमानच ईश्वराचे पोलीस झाले?
म्हणून इतर पंथाच्या लोकांना स्वतःच्या हातांनी पकडतो अथवा
मुसलमानांच्या हातून पकडवितो काय? इतर पंथाचे कोट्यावधी लोक ईश्वराला अप्रिय आहेत काय?
मुसलमानांतील पापी लोकही त्याला प्रिय आहेत काय?
तसे असल्यास अंधेर नगरीच्या मूर्ख राजासारखी व्यवस्था
दिसते. बुद्धिमान मुसलमानही या निराधार व तर्कविसंगत धर्मावर श्रद्धा ठेवतात,
हे केवढे आश्चर्य आहे!.॥८५॥
(८६) विश्वासू (श्रद्धावान) पुरुष व विश्वासू स्त्रिया
यांच्याशी परमेश्वराने (अशा स्वर्गीय) बागांचा वायदा केला आहे की,
ज्याच्या खालून (पाण्याचे) पाट वाहत असतील (व ती) त्यात
नित्य राहतील आणि (तसाच परमेश्वराने त्यांच्याशी) चिरकालिक निवासस्थानांचे बागांत
छानदार (छानदार) घरांचा (वायदा केला आहे) आणि परमेश्वराची सुप्रसन्नता फारच थोर
होय. हेच मोठे सार्थक होय. एवंच ते त्या (सर्वा) वर हसतात. पण परमेश्वर या
(दांभिकां) वर हसतो. - -मं० २। सि० १०। सू० ९। आ० ७३। ८०।।
(समीक्षक) हे खुदाच्या नावाने स्वतःच्या स्वार्थासाठी स्त्रीपुरुषांना
लालूच दाखविण्यासारखे आहे. कारण मुहम्मद साहेबांनी असे प्रलोभन दाखविले नसते तर
कोणीही मुहम्मद साहेबांच्या इस्लामी जाळ्यात अडकले नसते. इतर पंथाचे लोकही असेच
करतात. माणसे एकमेकांशी थट्टमस्करी करतातच. परंतु परमेश्वराने कोणाची टर उडविणे
किंवा टिंगल करणे हे त्याला शोभत नाही. हे कुराण काय आहे,
मोठा खेळ आहे. ॥८६॥
(८७) परंतु पैगंबर व ज्यांनी त्याच्या बरोबर (परमेश्वर)
विश्वास ठेविला आहे. (या सर्वांनी) आपले धन व आपने तनमन (परमेश्वराच्या मार्गात)
अर्पण करून जिहाद (धर्मयुद्ध) केले. हेच लोक होत की, ज्यांना (इहलोक व परलोक या सर्वांचे) श्रेय होय आणि
परमेश्वराने त्यांच्या अंत:करणावर मोहर लावून दिली आहे. म्हणून हे (लोक जिहादच्या
खुब्या) समजत नाहीत. -मं० २। सि० १०। सू० ९। आ० ८८। ९३।।
(समीक्षक) याला म्हणतात स्वार्थसाधूपणा! ज्यांनी मुहम्मद
साहेबांवर श्रद्धा ठेवून इस्लामचा स्वीकार केला ते लोक चांगले आणि ज्यांनी तसा
स्वीकार केला नाही ते लोक वाईट! ही गोष्ट पक्षपातपूर्ण व अविद्यायुक्त नाही काय?
ईश्वरानेच मोहर ठोकल्यावर पाप करण्यामध्ये त्यांचा काही
अपराध नसून तो ख़ुदाचाच अपराध ठरतो कारण त्या बिचाऱ्यांच्यावर सील ठोकून त्यांना
सदाचार करण्यास त्याने प्रतिबंध केला. हा केवढा मोठा अन्याय आहे!!! ॥८७॥
(८८) (हे पैगंबरा! हे लोक आपल्या मालाची जकात देतील तर)
त्यांच्या मालाची जकात घेत जा, का की ही (जकात स्वीकारल्या) ने तू त्यांची (पापापासून
अंतर्बाह्य ) शुद्धी करतोस. परमेश्वराने मुसलमानांपासून त्यांचे प्राण व त्यांची
धनदौलत (या वायद्याने) खरेदी घेतली आहे की, त्यांच्याऐवजी त्यांनास्वर्ग (प्राप्त)
33
होईल. (हे लोक तन,
मन व धन यांची पवां न बाळगता) परमेश्वराचे मार्गाने लढतात,
(आणि ते लढतात) तेव्हा (शत्रूस)
मारून टाकतात व (आपणही वेळेस) मारले जातात. -मं० २। सि० ११। सू० ९। आ० १०३। १११।।
(समीक्षक) वाहवा मुहम्मद साहेब ! तुम्ही तर गोकुलिये
गोसाव्यांचीच बरोबरी केली की! आपल्या भक्तांकडून संपत्ती घेणे व त्यांना पवित्र
करणे हीच गोष्ट गोसावी लोक करतात. वाहवा खुदा तुम्ही चांगलीच सौदेबाजी चालविली आहे!
मुसलमानांच्या हातून इतर गोणगरिबांचे प्राण घेणे हाच नफा आहे. वस्तुतः त्या
अनाथांना ठार करणाऱ्या त्या निर्दय लोकांना तुम्ही स्वर्ग दिला म्हणून खुदा दया व
न्याय यांनाच पारखा झाला आणि आपल्या ईश्वरत्वाला बट्टा लावून बुद्धिमान् धार्मिक
लोकांच्या दृष्टीने तिरस्कृत बनलात. ॥८८॥
(८९) अहो मुसलमानांनो ! तुम्ही आपल्या आसपासच्या नास्तिकांशी
लढा आणि त्यांना तुमच्यात उग्रता (व शौर्य) आढळून आले पाहिजे आणि काहे लोक इतकेही
अवलोकन करीत नाहीत की, प्रतिवर्षी एकदा किंवा दोनदा ते संकटात तावून सुलाखून पाहिले जातात,
यावरही ते पश्चात्ताप करीत नाहीत व त्यांना अद्दलही घडत
नाही. -मं० २। सि० ११। सू० ९। आ० १२३। १२६।।
(समीक्षक) पाहा! ही देखील एक विश्वासघाताची गोष्ट खुदा
मुसलमानांना शिकवितो आहे की शेजारी असोत की कोणाचे नोकर असोत. त्यांच्याशी संधी
सापडताच लढाई करा किंवा त्यांना ठार मारा कुराणातील या आज्ञा प्रमाण मानून
मुसलमानांनी अशा पुष्कळ गोष्टी केल्या आहेत. आता तरी कुराणातील हा बदसल्ला अयोग्य
आहे हे ओळखून मुसलमान या वाईट गोष्टी सोडून देतील तर फार बरे होईल.॥८९॥
(९०)(लोकानो) तुमचा पालनकर्ता तोच परमेश्वर होय की,
ज्याने सहा दिवसांत आकाशास व पृथ्वीस निर्माण केले. नंतर
दिव्य सिंहासनावर तो विराजमान झाला. (की तेथूनच) प्रत्येक कामाची व्यवस्था लावीत
राहतो. -मं० ३। सि० ११। सू० १०। आ० ३।।
(समीक्षक) आसमान किंवा आकाश हे एकच अनादी आहे. ते बनविले असे
कुराणात लिहिलेले आहे त्यावरून कुराणाच्या लेखकाला पदार्थाविद्येचे ज्ञान नव्हते
याविषयी खात्री पटते. परमेश्वराला सृष्टी रचण्यास सहा दिवस लागले काय ?
वस्तुतः कुराणात असे लिहिले आहे की,
"मी 'हो' असे म्हटले आणि माझ्या हुकुमाने ते झाले.' अल्लाचे एवढे सामर्थ असताना सृष्टीच्या उत्पत्तीला सहा दिवस
लागू शकत नाही. म्हणून सहा दिवस लागले हे म्हणणे खोटे आहे. खुदा सर्वव्यापक असता
तर तो अस्मानातावर (अर्शमध्ये) कशाला राहिला असता? आणि जेव्हा तो कामाची व्यवस्था करतो तर तेव्हा तो खुदा
माणसासारखाच आहे. कारण जो सर्वज्ञ आहे तो बसल्या-बसल्या कसली व्यवस्था करणार?
यावरून असे दिसून येते की, ईश्वराला न जाणणाऱ्या जंगली लोकांनी हे पुस्तक रचले असावे.
॥९०॥
(९१) आणि विश्वासू (मुसलमान) लोकांसाठी सदुपदेश व दया,
-मं० ३। सि० ११। सू० १०। आ० ५७।।
(समीक्षक) हा खुदा काय फक्त मुसलमानांचाच ईश्वर आहे?
इतरांचा नाही? तो जर फक्त मुसलमानांवरच दया करीत असेल व इतरांवर दया करीत
नसेल तर तो पक्षपाती आहे. जर इमानदार लोकांना मुसलमान म्हटले जात असेल तर त्यांना
सदुपदेश (मार्गदर्शन) करण्याची काही आवश्यकता नाही आणि जर तो ख़ुदा मुसलमानांखेरीज
इतरांना उपदेश करीत नाही तर त्याची विद्या (ज्ञान) व्यर्थ होय.॥९१॥
34
(९२) त्याने तुम्हां लोकांस पडताळून पाहावे को,
तुमच्यात कोणाची कृत्ये उत्तम आहेत ?
आणि (हे पैगंबरा!) जर तू (या लोकांस) सांगशील की,
मृत्यूनंतर तुम्ही सर्व पुनः (जिवंत) उठवून उभे केले जाल,
'तर अश्रद्ध लोक अवश्य असे म्हणतील
की,
'ही तर उघडउघड जादू आहे'
-मं० ३। सि० १२। सू० ११। आ० ७।।
(समीक्षक) जर खुदा कर्माची परीक्षा करीत असेल तर तो सर्वज्ञच
नाही आणि जर तो मृत्यूनंतर पुनः जिवंत करीत असेल तर तो मृतजीवांना तसेच ताटकळत
ठेवतो काय ? शरीर
सोडून गेलेला जीव पुनः शरीरात प्रविष्ट होणार नाही हा आपलाच नियम तो मोडतो. या
साऱ्या गोष्टींमुळे खुदाला बट्टा लागतो. ॥९२॥
(९३) आणि हुकूम फर्माविला गेला की,
हे धरित्री! तू आपले पाणी शोधून घे आणि हे आभाळा! तू थांबून
जा आणि पाणी (चढलेले) उतरून गेले आणि हे माझ्या बांधवांनो ! ही परमेश्वराची (धाडलेली)
सांडणी तुम्हाकरिता (माझ्या पैगंबराची) एक निशाणी होय. तर तिला (ह्याच स्थितीत)
सुटी राहू द्या, की
परमेश्वराच्या जमिनीतून हवी तेथे चरत फिरेल. -मं० ३। सि० १२। सू० ११। आ० ४४। ६४।।
(समीक्षक) ही कीती पोरकटपणाची गोष्ट आहे ! पृथ्वी आणि आकाश
हे कधी काही ऐकू शकतात काय ? छान! खुदाजवळ सांडणी (उंटीण) आहे म्हणजे उंटही असणार. मग
हत्ती,
घोडे, गाढवे वगैरे प्राणीही असणार आणि सांडणीला चरण्यासाठी शेतात
सोडून देणे ही गोष्ट खुदाला शोभणारी आहे काय ? तो कधी उंटणीवर स्वारही होतो काय ?
या सगळ्या गोष्टी होत असतील तर खुदाच्या घरात नबाबी धूसपूस
झाली असे म्हटले पाहिजे. ॥९३॥
(९४) (आणि) जोपर्यंत आकाश व पृथ्वी कायम आहेत तोपर्यंत ते
सदासर्वदा त्यातच राहतील आणि लोक सुदैवी असतील ते स्वर्गात राहतील आणि जोपर्यंत
आकाश व पृथ्वी कायम आहेत तोपर्यंत सदैव त्यातच राहतील. -मं० ३। सि० १२। सू० ११। आ०
१०७। १०८।।
(समीक्षक) प्रलयानंतर न्यायनिवाडा होऊन सर्व लोक स्वर्गात व
नरकात जातील. मग आकाश आणि पृथ्वी यांची काय गरज ? आणि जर स्वर्ग व नरक हे आकाश व पृथ्वी अस्तित्वात असेपर्यंत
कायम राहणार असतील तर 'आत्मे सदैव स्वर्गात अथवा नरकात राहतील' हे विधान खोटे ठरते. असले कथन अविद्वानांचे असते. ते
ईश्वराचे किंवा विद्वानांचे नसते. ॥९४॥
(९५) (एक काळ असा होता की) जेव्हा यूसुफने आपल्या बापाला
(याकूबला) असे सांगितले की, 'हे माझ्या पित्या! मी (स्वप्नात) अकरा नक्षत्रे व सूर्य-चंद्र ही
पाहिली...." -मं० ३। सि० १२। सू० १२। आ० ४ से ५९ तक।।
(समीक्षक) या प्रकरणामध्ये पितापुत्राच्या जो संवादरूप कथांचा
एक संग्रहच आहे. यावरून कुराण ईश्वराने रचलेले नसून एखाद्या माणसाने माणसांचा
इतिहासच त्यात वर्णन केला आहे असे दिसते. ॥९५॥
(९६) परमेश्वर असा (परम समर्थ) आहे की,
ज्याने आकाशाला कोणत्याही आधारावाचून उंच बनवून उभे केले की
ते तुम्ही (लोक) पाहतच आहा. नंतर तो महासिंहासनावर विराजमान झाला आणि त्याने सूर्य
व चंद्र यांना नियंत्रित केले आणि तोच (असा परम समर्थ आहे) की,
ज्याने पृथ्वीचा विस्तार केला. (त्यानेच) आकाशातून पाणी
वर्षविले. मग आपापल्या अंदाजाप्रमाणे ओढे वाहू लागले. परमेश्वर ज्याला इच्छितो
त्याला निर्वाहासाठी विपुल धन देतो आणि (ज्याला इच्छितो त्याला) हात राखून देतो.
-मं० ३। सि० १३। सू० १३। आ० २। ३। १७। २६।।
35
(समीक्षक) मुसलमानांच्या खुदाला पदार्थविज्ञानाचे ज्ञान
मुळीच नव्हते. ते त्याला असते तर आकाशामध्ये गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे आकाशाला
खांबांच्या आधाराची आवश्यकता असल्याची कपोलकल्पना त्याने केली नसती. जर खुदा
अर्शरूपी एका स्थानामध्ये राहत असेल तर तो सर्वशक्तिमान व सर्वव्यापक असू शकत
नाही. त्याचप्रमाणे खुदाला मेघविद्येचे ज्ञान असते तर त्याने आकाशातून पाणी खाली
आणले असे लिहिल्यानंतर पृथ्वीवरून पाणी आकाशात चढविले असे लिहिले असते. यावरून
कुराण रचणाऱ्याला मेघविद्येचेही ज्ञान नव्हते ही गोष्ट स्पष्ट दिसून येते. तसेच
बऱ्या वाईट कृत्यांचा विचार न करता तो सुखदुःख देते आहे तर तो पक्षपाती,
अन्यायकारी, निरक्षर भट्ट आहे.॥९६॥
(९७) (तू त्यांना) सांग की, परमेश्वर ज्याला इच्छितो त्याला मार्गाहून वळवितो आणि जो
कोणी (त्याचेकडे) वळतो त्याला आपल्याकडे (पोहोचण्याचा) मार्ग दाखवितो. -मं० ३। सि०
१३। सू० १३। आ० २७।।
(समीक्षक) जर अल्लाच चुकीचा मार्ग दाखवीत असेल तर मग खुदा व
सैतान यांच्यात काय फरक उरला? लोकांना चुकीच्या मार्गाने नेल्याबद्दल,
बहकाविल्याबद्दल सैतानाला वाईट म्हटले जाते तर तसलेच कृत्य
करणाऱ्या खुदाला वाईट सैतान का म्हणू नये? आणि लोकांना बहकाविण्याच्या पापाबद्दल त्याला नरकात का
पडावे लागू नये?॥९७॥
(९८) आणि अशाच कारणाने आम्ही कुराणास अरबी (भाषेचा) हुकूम
म्हणून सादर केले आहे, (की अरब लोकांस हे सहज समजेल) आणि (हे पैगंबरा!) तुला ज्ञान होऊन चुकले आहे.
त्या उपरांतही जर तु त्यांच्या मनोवासनांस अनुसरशील तर (मग) परमेश्वरापुढे कोणी
तुझा पुरस्कर्ता होणार नाही व बचावणाराही होणार नाही. काही झाले तरी (आमच्या
आज्ञा) पोहोचविणे हे तुझे काम होय व (त्यांच्यापासून) हिशोब घेणे हे आमचे. -मं० ३।
सि० १३। सू० १३। आ० ३७। ४०।।
(समीक्षक) कुराण कोणत्या बाजूने खाली उतरले?
खुदा वर राहातो काय? जर तसे असेल तर तो एकदेशी ठरतो व म्हणून तो ईश्वर असू शकत
नाही. कारण ईश्वर हा सर्वत्र एकरस व्यापक आहे. संदेश (निरोप) पोचविणे हे जासूदाचे
किंवा निरोप्याचे काम असते; आणि जो माणसांप्रमाणे एकदेशी असतो त्यालाच निरोप्याची गरज असते. तसेच हिशेब
देणे-घेणे हेही माणसाचे काम आहे. ईश्वराचे नव्हे कारण तो सर्वज्ञ आहे. यावरून अशी
खात्री पटते की, कुराण
हे एखाद्या अल्पज्ञ माणसाने रचले आहे. ॥९८॥
(९९) सूर्य व चंद्र हेही तुमच्या ताब्यात करून दिले की,
दोन्हीही चक्कर खात (फिरत) राहतात. काही संशय नाही की
मनुष्य मोठाच अन्यायी (व) अनुपकारी आहे. -मं० ३। सि० १३। सू० १४। आ० ३३। ३४।।
(समीक्षक) चंद्र व सूर्य सदा फिरत असतात आणि पृथ्वी फिरत
नाही काय?
पृथ्वी फिरत नसती तर अनेक वर्षांचे दिवस व रात्री झाल्या
असत्या आणि माणूस नक्कीच अन्याय व पाप करणारा असेल तर कुराणाद्वारे त्याला उपदेश
करणे व्यर्थ आहे. कारण ज्यांचा स्वभावच पाप करण्याचा असेल त्यांच्यामध्ये पुण्य
करण्याची बुद्धि कधीच येणार नाही. परंतु जगात तर नेहमीच पुण्यात्मे व पापात्मे
दिसतात. म्हणून असले विधान ईश्वरकृत ग्रंथातील असू शकत नाही. ॥९९॥
(१००) तर जेव्हा मी त्याला पूर्णपणे बनवीन व त्यात आपला
(स्वनिर्मित) आत्मा फुनकेन तेव्हा तुम्ही
36
त्याच्यापुढे साष्टांग नमस्कार
घालीत (भराभर पालथे) पडा. (सैतान) म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! तू जशी (मानवाखातर) माझी वाट मारलीस,
(तसेच) मीही पृथ्वीत त्यांना (जगाचे)
उत्तम चित्र दाखवून या सर्वांस बहकवीन. --मं० ३। सि० १४। सू० १५। आ० २९। से
३९-४६।।
(समीक्षक) जर ख़ुदाने आपला आत्मा आदमसाहेबाच्या शरीरात घातला
असेल तर तो (आदम) ही खुदाच झाला आणि जर तो ख़ुदा नव्हता तर त्याला सिजदा करा,
साष्टांग नमस्कार घाला असे सांगून त्याने आदमला आपला
भागीदार का करून घेतले ? सैतानाला बहकाविणारा खुदाच असेल तर तो सैतानाचाही सैतान,
त्याचा थोरला भाऊगुरु का नाही?
कारण तुम्ही बहकाविणाऱ्याला सैतान समजता आणि खदानेही
सैतानाला बहकविले आणि खुद्द सैतानाने म्हटले की, मी बहकाबीन, तरीही त्याला कैद करून खुदाने त्याला शिक्षा का केली नाही ?
त्याला मारून का टाकले नाही?॥१००॥
(१०१) आणि आम्ही प्रत्येक जनतेसाठी (कोणी ना कोणी) पैगंबर
(या गोष्टी समजाविण्यासाठी) पाठवीत राहिलो आहोत. जेव्हा आम्ही एखाद्या वस्तूचा
इरादा करतो, तेव्हा
आमचे म्हणणे तिच्या संबंधाने फक्त एवढेच असते की, आम्ही तिला फर्मावितो की, 'हो' आणि ती होऊन जाते. -मं० ३। सि० १४। सू० १६। आ० ३५।४०।।
(समीक्षक) जर सर्व जमातींसाठी पैगंबर पाठविले आहेत तर मग जे
लोक आपापल्या पैगंबराच्या आदेशाप्रमाणे वागतात ते काफिर कसे ठरतात?
तुमच्या पैगंबराखेरीज इतर पैगंबर माननीय नाहीत काय ?
तसे असेल तर ही अत्यंत पक्षपाताची गोष्ट आहे. जर सर्व
देशांसाठी पैगंबर धाडले तर आर्यावर्त्तामध्ये कोणता पैगंबर धाडला?
म्हणून ही गोष्ट मान्य करता येत नाही. जेव्हा खुदा इच्छा
करतो आणि म्हणतो की, 'हे पृथ्वी, तू
हो,'
तेव्हा ती जड असल्यामुळे ते ऐकू शकत नाही आणि केवळ खुदाचा
हुकूम कसा आमलात येईल? आणि खुदाखेरीज दुसरी कोणतीच वस्तू नाही तर त्याचा हुकूम कोणी ऐकला ?
आणि कोण झाले ? या साऱ्या अडाणीपणाच्या गोष्टी आहेत;
आणि अज्ञानी लोकच त्यांच्यावर विश्वास ठेवतात. ॥१०१॥
(१०२) आणि हे नास्तिक लोक (दूतास) परमेश्वराच्या मुली
ठरवितात,
(वाहवा!) परमेश्वर (जो) परमपवित्र
(त्याच्यासाठी मुली) आणि खुद्द आपणासाठी; जी काही आकांक्षा ते बाळगतात ती (म्हणजे मुलगे) (हे
पैगंबरा!) परमेश्वराची (म्हणजे आम्हांला आपली) शपथ आहे की,
तुझ्यापूर्वीही आम्ही (भिन्नभिन्न) जनतांकडे पैगंबर पाठविले.
-मं० ३। सि० १४। सू० १६। आ० ५७। ६३।।
(समीक्षक) अल्ला मुलींचे काम करणार?
मुलींची गरज तर माणसाला (पुरुषाला) असते. खुदासाठी मुलीच का
निवडल्या जातात, मुले
का निवडली जात नाहीत ? याचे कारण काय ते सांगा. शपथ घेणे हे खोटारड्या लोकांचे काम असते. ईश्वराने शपथ
घ्यायची नसते. कारण जगात सामान्यतः असे आढळते की, जो खोटा असतो तोच शपथ घेतो. खऱ्या माणसाने शपथ कशाला घ्यावी?
॥१०२॥
(१०३) हेच ते लोक होत की, ज्यांच्या अंत:करणावर व ज्यांच्या कानांवर व ज्यांच्या
डोळ्यांवर परमेश्वराने मोहर करून टाकली आहे; आणि हेच (पराकाष्ठेचे) बेफाम होत आणि प्रत्येक जणास त्याने
जे केले सवरले त्याचा भरपूर मोबदला दिला जाईल व लोकांवर कोणत्याही तऱ्हेचा) जुलूम
केला जाणार नाही. -मं० ३। सि० १४। सू० १६। आ० १०८-१११।।
37
(समीक्षक) ख़ुदानेच माणसाच्या अंत:करणावर व कानांवर मोहर
ठोकल्यावर विनाकरण ते बिचारे बिना अपराध मारले गेले. कारण अल्लानेच त्यांना पराधीन
केले आहे. हा त्याचा केवढा मोठा अपराध आहे! वर पुन्हा असे सांगतात की,
ज्याने जेवढे केले असेल तेवढेच त्याला दिले जाईल. कमी-जास्त
नाही. छान! त्यांनी जी पापे केली ती स्वेच्छेने केली नाहीत;
खुदाच्या करविण्याने केली. म्हणून तो त्यांचा अपराधच नव्हे.
त्याचे फळ त्यांना भोगावे लागता कामा नये. त्याचे फळ खुदालाच भोगावे लागणे हे उचित
होय आणि ज्याच्या त्याच्या कर्माची फळे त्याला मिळत असतील तर मग क्षमा कशाबद्दल
केली जाते ? क्षमा
केली जात असेल तर न्याय उरत नाही. असला हा गडबड घोटाळा ईश्वराकडून कधीच होणे शक्य
नाही. निर्बुद्ध पोरासोरांकडूनच तो होत असतो. ॥१०३॥
काफिरांसाठी नर्क
(१०४) आणि आम्ही नास्तिकांसाठी जहन्नमचा बंदीखाना (तयार )
ठेवलाच आहे आणि आम्ही हरेक माणसाचे (बरेवाईट) भाग्य त्याचे त्याच्या गळ्यात घालून
टाकले आहे. (म्हणजे ज्याचे प्रारब्ध त्याच्याबरोबर होय) आणि पुनरुत्थानाच्या दिवशी
आम्ही (त्याचा कर्म-) लेख काढून त्याच्यापुढे ठेवू (व) तो त्याला आपल्या समोर
उघडलेला पाहिल आणि 'नूह'
(नोहा) च्या नंतर आम्ही कितीतरी
वस्त्या नष्ट करून टाकल्या. -मं० ४। सि० १५। सू० १७। आ० ८-१३। १७।।
(समीक्षक) जे कोणी कुराण, पैगंबर, कुराणात सांगितलेला खुदा, सातवे अस्मान, नमाज वगैरे गोष्टींना मानीत नाहीत तेच काफिर आहेत आणि
त्यांच्यासाठीच नरक असेल तर ती गोष्ट निव्वळ पक्षपाताची ठरते. कारण कुराणावर
श्रद्धा ठेवणारे तेवढे सगळे चांगले आणि इतर पंथाचे अनुयायी तेवढे सगळे वाईट असे
कधीतरी असू शकेल काय ? प्रत्येकाच्या गळ्यात त्याच्या कर्मांचे पुस्तक (किंवा खातेवही) अडकवलेले असते
ही कल्पनाच किती बालिशपणाची आहे! आम्हांला तर कोणाच्याही गळ्यात हे कर्मपुस्तक
टांगलेले दिसत नाही. त्याचा उद्देश प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ देणे हा असेल
तर मग माणसांच्या अंत:करणांवर, डोळ्यांवर वगैरे मोहर ठोकणे आणि पापांबद्दल क्षमा करणे हा
कसला पोरखेळ खुदाने चालविला आहे? कयामतीच्या रात्री खुदा पापपुण्याच्या जमाखर्चाची वही बाहेर
काढणार आहे म्हणे. तर ती वही सध्या कोठे आहे ? सावकाराच्या खातेवहीप्रमाणे खुदा प्रत्येक माणसाची खातेवही
रोजच्या रोज लिहित असतो काय? या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की,
इस्लाममध्ये पूर्वजन्माला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे
जीवांच्या कर्मांचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मग त्या कर्माची नोंद कशी ठेवली
जाणार?
पूर्वजन्माची कर्मेच नसतील तर ती नसताना त्यांची नोंद करणे
हा अन्याय आहे. बऱ्यावाईट कर्मांच्या अभावी जीवांना खुदाने सुख-दु:ख का दिले?
'खुदाची मर्जी'
असे म्हणत असाल तर तोही खुदाचा अन्यायच म्हटला पाहिजे.
बऱ्यावाईट कर्माचा विचार न करता सुख-दुःखरूपी फळे कमी अधिक प्रमाणात देणे यालाच
अन्याय असे म्हणतात आणि न्यायनिवाड्याच्या वेळी स्वत: खुदा ती वही वाचणार की एखादा
शिरस्तेदार ते वाचन करणार? जीवांचा काही अपराध नसताना खुदाने त्यांना दीर्घकाळापर्यंत वाट पहायला लावून
त्यांचा नाश केला तर तो अन्यायकारी ठरेल आणि जो अन्याय करतो तो परमेश्वरच असू शकत
नाही. ॥१०४॥
38
(१०५) आम्ही समूद (च्या लोकां) ला सांडणीचा देखत चमत्कार
दिला होता आणि त्यांच्यातून ज्यांना तू आपल्या (मोहक) स्वराने (बहकवू) शकशील
त्यांना बहकव (आणि मोठे श्रेष्ठत्व तर त्या दिवसाचे होय की) ज्या दिवशी आम्ही सर्व
लोकांस त्यांच्या (त्यांच्या) पुढाऱ्यासमवेत (आपल्यासमोर) बोलावून हजर करू. मग
ज्यांचा (कर्म) लेख त्यांच्या उजव्या हातात दिला जाईल. -मं० ४। सि० १५। सू० १७। आ०
५९। ६४। ७१।।
(समीक्षक) वाहवा! खुदाच्या अस्तित्वाच्या ज्या आश्चर्ययुक्त
खुणा आहेत त्यापैकी सांडणी ही एक निशाणी व परीक्षेचे साधक आहे. खुदानेच सैतानाला
बहकविण्याचा हुकुम केला. याचा अर्थ असा की, खुदाच। सैतानाचा सरदार व सर्व पापे करविणारा ठरला. अशा
खुदाला परमेश्वर समजणे हे केवळ अल्पज्ञानच होय. कयामतीच्या रात्री म्हणजे
प्रलयकाळीचा न्यायनिवाडा करण्यासाठी पैगंबर व त्यांचे अनुयायी यांना खुदा बोलवणार
म्हणजे प्रलय होईपर्यंत सर्वांना कच्च्या कैदेतच राहवे लागणार आणि खटल्याचा निकाल
लागेपर्यंत कच्च्या कैदेत राहणे हे नेहमीच दुःखदायक असते. म्हणून ताबडतोब निकाल
देणे हे उत्तम न्यायाधीशाचे कर्तव्य असते. हा तर पोपांचा न्याय झाला. एखाद्या
न्यायाधीशाने असे म्हणावे की, जोपर्यंत गेल्या पन्नास वर्षातील चोर आणि सज्जन एकत्र गोळा
केले जाणार नाहीत तोपर्यंत त्यांचा न्यायनिवाडा करून त्यांना शिक्षा अथवा
प्रतिष्ठा बहाल करता कामा नये. तसेच हे झाले. एकजण पन्नास वर्षे कच्च्या कैदेत
डांबून राहिला आणि एकजण आजच पकडला गेला. म्हणन त्या दोघांना आजच शिक्षा करावयाची!
याला न्याय म्हणत नाहीत. न्याय पहायचा असेल तर तो वेदामध्ये आणि मनुस्मृतीत पाहा.
तेथे न्यायदानाला एक क्षणाचाही विलंब होत नाही; आणि जीव आपापल्या कर्मांनुसार सदैव शिक्षा किंवा प्रतिष्ठा
प्राप्त करीत असतात. दुसरी गोष्ट अशी की, पैगंबरांना साक्षीदार म्हणून वागविणे हे ईश्वराच्या
सर्वज्ञतेत उणीव आहे. तेव्हा असले हे पुस्तक कधी ईश्वरकृत असू शकते काय ?
आणि असल्या पुस्तकाचा उपदेश करणारा कधी ईश्वर असू शकतो काय?
मुळीच नाही! ॥१०५॥
(१०६) ते हेच लोक आहेत की, ज्यांच्या राहण्यासाठी (स्वर्गाच्या) कायमच्या बागा आहेत.
या लोकांच्या (हवेल्या) खालून पाण्याचे पाट बाहत असतील;
तेथे त्यांना अलंकारार्थ सोन्याची कंकणे घातली जातील;
आणि ते तलम रेशमाची किनखाबाची हिरवी (हिरवी) वस्त्रे
ल्यायलेले असतील व (तेथे सिंहासनावर टेक) लावून (खुशाल बसलेले) असतील. (कितीतरी)
उत्कृष्ट पुण्यफल हे! आणि ऐषआरामाचे दृष्टीने (स्वर्गाची किती तरी) उत्तम शय्या ही
! -मं० ४। सि० १५। सू० १८। आ० ३१।।
(समीक्षक) छान! कुराणातला स्वर्ग काय बहारदार आहे! त्यात
बाणा,
दागिने, कपडे, गाद्या-गिरद्या वगैरे गोष्टी विलासासाठी आहेत. वाहवा!
कोणीही बुद्धिमान माणूस विचार करील तर त्याला असे आढळून येईल की,
इहलोकातील चैनीच्या व विलासाच्या गोष्टीहून मुसलमानांच्या
स्वर्गात अधिक असे काहीच नाही. तेथे असणारी विशेष गोष्ट म्हणजे अन्याय ही होय.
त्यांच्या कर्मांना अंत असतो. परंतु त्या कर्माची फळे अनंत काळपर्यंत चालत
राहातात. रोज-रोज गोड धोड खाल्ले तर थोड्याच दिवसांत त्याचा वीट येतो आणि
मिष्टान्न हे विषवत वाटू लागते. मुसलमानांच्या स्वर्गात त्यांना कायम सुख भोगावे
लागते. त्यामुळे त्यांना ते सुखच दुःखासारखे वाटत असणार. म्हणून महाकल्पापर्यंत
मुक्तीचे सुख भोगून पुनर्जन्म घेणे हाच सिद्धांत खरा आहे. ॥१०६॥
39
(१०७) आणि (आद व समूद वगैरे घराण्यांच्या) ह्या वस्त्या(की
ज्या तुम्ही अरब लोक सीरिया देशाच्या मार्गावर ओसाड पडलेल्या पाहता त्या) जेव्हा
त्यांनीही शिरजोरी केली तेव्हा आम्ही त्यांचा संहार करून टाकला आणि त्यांच्या
संहाराचीही आम्ही एक वेळ मुक्रर केली होती. -मं० ४। सि० १५। सू० १८। आ० ५९।।
(समीक्षक) संपूर्ण वस्तीच कधी पापी असू शकते काय ?
आणि मग त्यांच्या विनाशाची प्रतिज्ञा खुदा करतो. याचा अर्थ
जो सर्वज्ञ नाही. कारण त्यांचा अन्याय पाहिल्यावर त्याने प्रतिज्ञा केली. त्याआधी
त्याला काहीच माहीत नव्हते. त्याच्या त्या कृत्यामुळे तो निर्दयीही ठरला. ॥१०७॥
खुदा चे भयभित होणे
(१०८) आणि मुलगा (जो होता) त्याचे आईबाप उभयताही विश्वासू
होते. तर आम्हांस अशी आशंका वाटली की, (असे नव्हावे, मोठा झाल्यावर) त्याने शिरजोरी व नास्तिकपणा करून त्या
उभयतांस इजा द्यावी. येथपर्यंत की जेव्हा तो (चालता चालता ) सूर्यास्त होण्याच्या
जागी पोहचला तेव्हा त्याला असे आढळले की, सूर्य (जणू) काळ्या काळ्या चिखलाच्या कुंडात बुडतो आहे.
त्या लोकांनी (आपल्या भाषेत ) अर्ज केला की, हे जुलकनैनो! (वा घाटाच्या पलीकडे) याजूज व माजूज (यांचे
राष्ट्र आहे व ते लोक आमच्या) देशात येऊन नासाडी (बंडाळी) माजवितात. -मं० ४। सि० १६। सू० १८। आ० ८०। ८६। ९४।।
(समीक्षक) पाहा! हा खुदाचा केवढा अडाणीपणा आहे. मुलाचे आईबाप
माझा वर्ग सोडून भलतीकडेच आपल्या विरुद्ध दिशेला जाणार नाहीत ना,
या शंकेने तो घाबरला. ईश्वराच्या स्वभावाशी हे सुसंगत नाही.
यानंतरचा त्याचा अडाणीपणा पाहा की, हा ग्रंथ रचणाराः असे समजतो की,
सूर्य रात्रीच्या वेळी एका तळ्यात बुडतो आणि सकाळी त्यातून
बाहेर येतो. छान! सूर्य तर पृथ्वीहून खूपच मोठा आहे. तो नदीत,
तळ्यात किंवा समुद्रात कसा बुडू शकेल ?
यावरून असे दिसून येते की, कुराण रचणाऱ्याला भूगोल-खगोल विद्येचे ज्ञान नव्हते. ते
असते तर त्याने अशी विद्याविरोधी गोष्ट का लिहिली असती ?
तसेच या ग्रंथावर श्रद्धा बाळगणाऱ्यांमध्येही विद्या नाही.
जर ती असती तर अशा चुकीच्या गोष्टी असलेल्या पुस्तकाला त्यांनी का मानले असते ?
आता खुदाचा अन्याय पाहा! तो स्वतः पृथ्वीचा निर्माता,
राजा, न्यायाधीश आहे. तरीही तो याज व माजूज यांना पृथ्वीवर
बंडाळीही करू देतो. ही गोष्ट ईश्वरत्वाविरुद्ध आहे. म्हणून असल्या पुस्तकाला जंगली
लोक मानतात. विद्वान लोक त्याला मुळीच मान्यता देत नाहीत.॥ १०८॥
(१०९) आणि (हे पैगंबरा!) कुराणात मर्यमची गोष्टी (लोकांस)
आठवून दे की, जेव्हा
ती आपल्या लोकांपासून एकीकडे होऊन पूर्वेकडेस एका जागी जाऊन बसली आणि तिने
लोकांच्या पलीकडून गोषा करून घेतला. तो आम्ही आपला आत्मा (म्हणजे जिब्रील यास)
तिजकडे पाठविले व तो संपूर्ण मनुष्याचे स्वरूप धारण करून तिजपुढे येऊन उभा राहिला.
तो (त्याला पाहून) म्हणू लागली की, जर तू (परमेश्वराला) भिऊन वागणार असशील तर मी तुजपासून परम
दयाळू (परमेश्वर) चा आश्रय घेते. (की तू माझ्या समोरून निघून जा) (जिब्रीलने)
म्हटले की, मी
तर केवळ तुझ्या पालनकर्त्याने पाठविलेला (दूत) आहे. (व) यासाठ (आलो आहे) की,
मी तुला एक पवित्र पुत्र अर्पण करावा. ती म्हणाली मला पुत्र
होणार तरी कसा? आणि
वास्तविक पाहता (लग्नसंबंधाच्या नात्याने) मला कोणीही पुरुषाने स्पर्श केलेला नाही
व मी (कधीच) जारकर्मीही नव्हते.
40
यावर मर्यमला (आपोआपच पुत्राचा)
गर्भ राहिला वती तो (गर्भ) घेऊन कोठे तरी अलग दूरचे जागी जाऊन वसली. -मं० ४। सि०
१६। सू० १९। आ० १६। १७। १८। १९। २०-२३।।
(समीक्षक) आता बुद्धिमान लोकांनी विचार करावा की,
सगळे फरिश्ते (देवदूत) हे ख़ुदाचे आत्मे आहेत. म्हणून ते
खुदाहून वेगळे असू शकत नाहीत. मर्यम (मेरी) या कुमारीला मुलगा होणे हाही खुदाचा
अन्याय आहे. वस्तुतः कोणाशी संभोग करण्याची तिला इच्छा नव्हती. परंतु खुदाच्या
हुकुमावरून देवदूताने तिला गरोदर केले. ही गोष्ट न्यायाच्या विरुद्ध आहे. या
ठिकाणी पुष्कळशा असभ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. परंतु त्यांचा उल्लेख करणे
आम्हाला योग्य वाटत नाही. ॥१०१॥
(११०) (हे पैगंबरा!) काय तू (या गोष्टीचे) अवलोकन केले नाहीस
की,
आम्ही सैतानास नास्तिकांच्या मागे सोडून ठेवले आहे की,
ते त्यांना फूस देऊन भडकवीत राहतात. -मं० ४। सि० १६। सू०
१९। आ० ८३।।
(समीक्षक) खुदाच सैतानास लोकांना भडकविण्यासाठी पाठवितो,
तर त्यात भडकणाऱ्यांचा काही दोष असू शकत नाही. म्हणून
त्यांना अथवा सैतानालाही शिक्षा केली जाऊ शकत नाही. कारण ते सारे खुदाच्या
हुकुमावरूनच सर्व काही करतात. त्याचे फळ खुदालाच मिळाले पाहिजे. तो ख़ुदा जर
खरोखरी न्यायी असेल तर या दुष्कृत्याचे फळ जो नरक तो त्याने भोगला पाहिजे. तो
न्यायाचा त्याग करून अन्याय करीत असेल तर तो अन्यायी ठरतो. अन्याय करणाऱ्यालाच
पापी म्हणतात. ॥११०॥
(११) आणि जो कोणी (पापापासून) अनुतप्त होईल व विश्वास धरील व
सत्कृत्यही करील व मग सन्मार्गावर (कायम) राहील, तर त्या (च्या पापां) चाही मी मोठा क्षमाकर्ता आहे. -मं० ४।
सि० १६। सू० २०। आ० ८२।।
(समीक्षक) तोबा (पश्चाताप) करण्याने पायाची क्षमा केली जाते
असे कुराणात सांगितले आहे. ही गोष्ट सर्वांना पापी बनविणारे आहे. कारण या
पाप्यांना पाप करण्यास त्यामुळे खूप उत्तेजना मिळते. यावरून हे पुस्तक व ते रचणारा
दोघेही पाप्यांना पाप करण्यास प्रोत्साहन देणारे आहेत,
असे सिद्ध होते. म्हणून हे पुस्तक परमेश्वरकृत असू शकत नाही
व त्यात वर्णन केलेला अल्ला हा परमेश्वर असू शकत नाही. ॥१११॥
(११२) आणि आम्हीच पृथ्वीमध्ये भारी पर्वत (योग्य त्या
ठिकाणी) रोवले की, पृथ्वी लोकांसहित (एका बाजूला) कलून पडू नये.
-मं० ४। सि० १७। सू० २१। आ० ३०।।
(समीक्षक) कुराण रचणाऱ्याला पृथ्वीचे भ्रमण वगैरे गोष्टींचे
ज्ञान असते तर डोंगरांनी धरून ठेवल्यामुळे पृथ्वी कलंडत नाही. असल्या गोष्टी
त्याने कधीच लिहिल्या नसत्या डोंगरांनी पृथ्वीला धरून ठेवले नसते तर ती डगमगली
असती अशी शंका त्याच्या मनात उत्पन्न झाली. परंतु असे असूनही ती भूकंपाच्या वेळ का
हादरते ?॥११२॥
कुरानमधील अश्लील गोष्टी
(११३) आणि त्या (मरियम) बाईची (आठवण कर की,)
जिने आपली लाज सांभाळली (आपल्या वासनेवर काबू ठेवला) आणि
आम्ही आमचा आत्मा तिच्यामध्ये कुंकला. ॥ -मं० ४। सि० १७। सू० २१। आ० ९१।।
(समीक्षक) असल्या अश्लील गोष्टी ईश्वरीय ग्रंथात ईश्वराच्या
संबंधातच नव्हे तर कोणाही सभ्य माणसाच्या
41
विषयीही लिहिल्या जात नाहीत. अशा
गोष्टी लिहिणे माणसाच्या दृष्टीनेही चांगले समजले जात नाही तर मग परमेश्वरासमोर ते
कसे चांगले असू शकेल ? असल्या
गोष्टींनी कुराण दूषित झालेले आहे. कुराणात चांगल्या गोष्टी असत्या तर
वेदांप्रमाणेच त्याचीही अत्यंत प्रशंसा झाली असती. ॥११३॥
(११४) (हे वाचक श्रोत्या!) काय तू या
गोष्टीकडे नजर टाकली नाहीस की, जी (सृष्टी) पृथ्वीत आहे ती
आणि सूर्यचंद्र, नक्षत्रे, पर्वत,
झाडे आणि चतुष्पाद जनावरे (सर्वच तर) परमेश्वरापुढे साष्टांग
नमस्कार घालतात. (व) तेथे त्यांना सोन्याची कंकणे लेवविली जातील आणि (हार
वगैरेंच्या आकाराने) मोती. तेथे त्यांचा (नेहमीचा) पोषाखही रेशमी असेल आणि माझ्या
(या) घराला प्रदक्षिणा घालणारे व उभे राहणारे व ओणवे होऊन नमन करणारे आणि साष्टांग
नमस्कार घालणारे (म्हणजे नमाज पढणारे) यांच्याकरिता पाक साफ ठेव. नंतर आपला मळ
उतरून टाकावा व आपले नवस पूर्ण करावेत आणि पुरातन (उपासनालय म्हणजे काबा) गृहाला
प्रदक्षिणाही घालावी. त्याजवर (बळी देते वेळी) त्यांनी परमेश्वराचे नाव घ्यावे.
-मं० ४। सि० १७। सू० २२। आ० १८। २३। २६। २८। ३३।।
(समीक्षक) छान ! ज्या जड वस्तू आहेत त्या
परमेश्वराला जाणू शकत नाहीत. मग त्या त्याची भक्ती कशा करतील ? यावरून हे पुस्तक ईश्वरकृत असूच शकत नाही. एखाद्या भ्रमिष्ट माणसाने ते
रचले असावे, असे दिसते. वाहवा! मोठा छान स्वर्ग आहे! तेथे
सोन्या-मोत्याचे दागिने आणि रेशमी कपडे घालायला मिळतात. म्हणजे हा स्वर्ग येथील
राजेरजवाड्यांच्या महालाहून मुळीच वेगळा दिसत नाही. स्वर्ग हे परमेश्वराचे घर आहे.
म्हणजे तो त्या घरात राहत असला पाहिजे. मग ही मूर्तिपूजा होत नाही काय ? तर मग हे लोक इतर मूर्तिपूजकांचे खंडन का करतात ? खुदा
भेटी स्वीकार करतो, आपल्या घराला प्रदक्षिणा घालण्याची आज्ञा
देतो आणि पशू मारून खाऊ घालतो. असला हा खुदा देवळातील भैरव, दुर्गा
वगैरे देवदेवतांसारखाच झाला आणि त्याने महामूर्तिपूजा सुरू केली असे म्हटले
पाहिजे. कारण देवाच्या मूर्तिपेक्षा मशीद ही फार मोठी मूर्ती आहे. यावरून असे
सिद्ध होते की, खुदा व मुसलमान हे मोठे मूर्तिपूजक असून
पौराणिक व जैन हे छोटे मूर्तिपूजक आहेत. ॥११४॥
(११५) मग कयामतीच्या (पुररुत्थानाच्या) दिवशी
तुम्हाला (सर्वाना) उठवून उभे केले जाईल. -मं० ४। सि० १८। सू० २३। आ० १६।।
(समीक्षक) पुनरुत्थानाच्या दिवसापर्यंत
प्रेते थडग्यांमध्ये राहणार की इतर एखाद्या ठिकाणी? जर ती
थडग्यांत राहणार असतील तर कुजलेल्या दुर्गधयुक्त शरीरामध्ये राहावे लागल्याने
पुण्यात्म्यांनाही दु:ख भोगावे लागेल. हा न्याय नसून अन्याय आहे. शिवाय प्रेते
पुरण्याने सर्वत्र दुर्गध पसरून रोगराई निर्माण होईल. त्याचे पाप खुदा व मुसलमान
यांच्या माथी बसेल. ॥११५॥
(११६) की ज्या दिवशी त्यांच्याविरुद्ध
यांच्या जिभा व यांचे हातपाय यांच्या कार्याची साक्ष देतील. परमेश्वर (तेजानेच)
आकाश व पृथ्वीचा प्रकाश होय. त्याच्या प्रकाशाची उपमा अशी आहे की, जशी एक मेहराब आहे (व) मेहराबीत एक दिवा (ठेवलेला आहे आणि) दिवा एका
काचेच्या कंदिलात आहे आणि
42
कंदिल (इतका पारदर्शक व चकचकीत
आहे) जणू की तो मोत्याप्रमाणे चकाकता असा एक ताराच आहे. (तो दिवा) जैतून (ऑलिव्ह)
च्या एका आशीर्वादित झाडा (च्या तेला) ने जाळला जातो की ते पूर्वेकडेही नाही व
पश्चिमेकडेही नाही. त्याचे तेल (इतके स्वच्छ आहे की) जरी त्याला अग्नी स्पर्शही न
करील तरीही असे वाटते की ते (आपोआप) प्रकाशू लागेल. प्रकाशावर प्रकाश होय.
परमेश्वर आपल्या प्रकाशाकडे ज्याला इच्छितो त्याला मार्ग दाखवितो. -मं० ४। सि० १८।
सू० २४। आ० २४। ३५।।
(समीक्षक) हात, पाय
वगैरे अवयव जड (अचेतन) असल्यामुळे ते कधीही साक्ष देऊ शकत नाहीत. ही गोष्ट
सृष्टिक्रमाच्या विरुद्ध असल्यामुळे मिथ्या आहे. खुदा हा आग किंवा वीज आहे काय ?
कुराणामध्ये हा जो दृष्टांत दिला आहे तो ईश्वराला लागू पडत नाही.
असले दृष्टांत साकार वस्तूंना लागू होऊ शकतात. ॥११६॥
(११७) आणि परमेश्वरानेच सर्व (चालत्या
फिरत्या) प्राण्यांस पाण्यापासून निर्माण केले आहे. तर (कित्येक) त्यातून असे आहेत
की, जे आपल्या पोटावर चालतात; आणि जो
कोणी परमेश्वराचा हुकुम मानील, सांग की, परमेश्वराचा हुकूम माना आणि पैगंबराचा हुकुम माना. पैगंबराच्या
सांगण्याप्रमाणे चला. कदाचित तुम्हांवर दया केली जाईल. -मं० ४। सि० १८। सू० २४। आ०
४५। ५२। ५६।।
(समीक्षक) ज्या प्राण्यांच्या शरीरात सर्व
मूलतत्व (पंचमहाभूते) दिसतात त्यांना केवळ पाण्यापासून उत्पन्न केले असे सांगणे हे
कुठले तत्वज्ञान ? हा तर निव्वळ अडाणीपणा आहे. अल्ला बरोबर
पैगंबराच्याही आज्ञेचे पालन करावे लागते. म्हणजे तो ख़ुदाचा भागीदार झाला की नाही?
असे आहे तर मग खुदा एकमेवाद्वितीय आहे असे कुराणात का लिहिले आहे व
तुम्ही तसे का म्हणता?॥११७॥
(११८) आणि ज्या दिवशी आकाश फाटून दाग दिसू
लागेल आणि (त्या ढगातून) देवदूताचे घोळकेच्या घोळके (जमिनीवर) उतरविले जातील. तर
(हे पैगंबरा!) तू नास्तिकांचे सांगणे मानू नकोस आणि कुराणा (च्या प्रमाणा) ने
त्यांच्या मोठ्या जोराने झटून समना कर. अशा लोकांची पापे, परमेश्वर
सत्कृत्यात बदलून टाकील आणि जो कोणी पश्चाताप करील व (त्यानंतर तो) सत्कृत्यही
करील, तर तो खरोखरी परमेश्वराकडे वळतो. -मं० ४। सि० १९। सू०
२५। आ० २५-५२। ७०। ७१।।
(समीक्षक) आकाश ढगांनी फाटले जाईल, ही गोष्ट कधीही खरी असू शकत नाही, आकाश हा एखादा
मूर्तिमंत पदार्थ असता तर ते फाटू शकले असते. मुसलमानांचे हे कुराण शांतताभंग करून
भांडणतंटे वाढविणारे आहे. म्हणून धार्मिक विद्वान् लोक ते मानीत नाहीत.
पापपुण्यांची अदलाबदल होणे हाही खासा न्याय आहे तीळ आणि उडीद यांच्यासारखे पापपुण्य
हे काय अदलाबदली करता येणारे पदार्थ आहेत ? तोबा (पश्चाताप)
केल्याने पापे नाहीशी होऊन ईश्वरप्राप्ती होत असेल तर कोणीही पाप करायला घाबरणार
नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्ञानविरोधी आहेत.॥११८॥
(११९) आणि आम्ही मूसाकडे आदेश पाठविला की,
तू माझ्या सेवका (म्हणजे बनी इसराईला) स रातोरात घेऊन नीघ. (कारण)
तुमचा पाठलाग केला जाणार आहे. यावर फिरऔनने (लोकसमुदाय गोळा करण्यासाठी) शहरात
जासूद पाठवून दिले. ज्याने मला उत्पन्न केले; मग तोच
(धर्मसंसाराच्या विघ्नांत) मला
43
मार्ग दाखवितो आणि जो मला खाऊ
घालतो व जो मला (पाणी) पाजतो; आणि
जो (क्षमाकर्ता, दयाळू आहे व त्याच्यापासून) मला तर आशा आहे
की तो निवाड्याच्या दिवशी मला माझे अपराध क्षमा करील. -मं० ५। सि० १९। सू० २६। आ०
५२। ५३। ७८। ७९। ८२।।
(समीक्षक) जर ख़ुदाने मूसाला ईश्वरी आदेश
पाठविला होता तर मग पुन: दाऊद, येशू व मुहम्मद यांना
वेगवेगळी पुस्तके का पाठविली ? कारण परमेश्वराची उक्ती व
कृती ही सदैव एकसारखी व अचूक असते. अशा स्थितीत त्याने कुराणापर्यंत जी पुस्तके
पाठविली याचा अर्थ त्या आधी पाठविलेली पुस्तके अपूर्ण व त्रुटिपूर्ण होती, असे समजावे लागेल. जर पूर्वीची तीन पुस्तके खरी असतील तर हे कुराण खोटे
ठरते. कारण या चार पुस्तकांमध्ये परस्परविरोधी गोष्टी आहेत. त्या पूर्णपणे खऱ्या
असू शकत नाहीत. जर ख़ुदाने आत्मे म्हणजे जीव निर्माण केले असतील तर ते मरुनही
जातील म्हणजे केव्हा ना केव्हा त्यांचा नाश होईल, अभावही
होईल? परमेश्वरच मनुष्यादी प्राण्यांना अन्नपाणी देत असेल तर
कोणालाही रोग होता कामा नये, आणि सर्वांना समान
खाण्यापिण्यास मिळाले पाहिजे. राजा व दरिद्री माणूस यांना जसे श्रेष्ठ व निकृष्ट
अन्नपाणी मिळते तसे परमेश्वराकडून पक्षपाताने एकाला उत्तम अन्नपाणी व दुसऱ्याला
निकृष्ट खाणेपिणे दिले जाता कामा नये. जर परमेश्वरच खाऊपिऊ घालीत असेल आणि
पथ्यपाणी करवीत असेल तर कोणालाच कसलाही रोग-आजार होता कामा नये. परंतु मुसलमान
वगैरे लोकांनाही रोग-आजार होत असतात. खुदा रोग दूर करून माणसाला निरोगी बनवत असेल
तर मुसलमानांच्या शरीरात रोग राहताच कामा नये. तसा रोग राहत असेल तर खुदा चांगला
वैद्य नाही. तो कुशल वैद्य असता तर मुसलमानांमध्ये रोगराई का झाली असती? खुदाच मारीत असेल व जिवंत करीत असेल तर त्याचे पापपुण्य त्या खुदालाच लागत
असणार. जर तो जन्म-जन्मांतराच्या कर्मानुसार व्यवस्था करीत असेल तर त्याच्या हातून
कसलाच अपराध घडत नाही. तो योग्य तेच करतो. पण जर तो पापला क्षमा करीत असेल आणि
कयामतीच्या रात्री न्यायनिवाडा करीत असेल तर तो ख़ुदा पाप वाढविणारा व पापयुक्त
ठरेल. तो क्षमा करीत नसेल तर कुराणातील वचन खोटे आहे असे म्हणण्याशिवाय गत्यंतर
नाही. ॥११९॥
(१२०) तूही आमच्यासारखाच मनुष्य आहेस. तू जर
खरा असशील तर आम्हाला एखादा चमत्कार करून दाखव. (सालेहाने) सांगितले, हो सांडणी (हाच चमत्कार) होय. हिची पाणी प्यायची (एक दिवसाची) पाळी आहे.
-मं० ५। सि० १९। सू० २६। आ० १५४। १५५।।
(समीक्षक) दगडातून सांडणी निघाली या गोष्टीवर
कोणी विश्वास ठेवू शकेल काय ? ज्यांनी तसा विश्वास ठेवला ते
लोक जंगली होते. सांडणीची खूण देणे हा केवळ जंगली लोकांचा व्यवहार आहे. ते ईश्वरी
कृत्य असू शकत नाही. जर हा ग्रंथ ईश्वरकृत असता तर असल्या निरर्थक गोष्टी त्यात
आल्या नसत्या. ॥१२०॥
(१२१) हे मूसा! हा तर मी परमेश्वर आहे.
सामर्थ्यवान (व) बुद्धिमानः आणि तू आपली काठी (खाली) टाकून दे; तर जेव्हा (मूसाने) पाहिले की काठी (अशातऱ्हेने) वळवळत आहे की जणू तो
(जिवंत) सापच होता. तेव्हा त्याने पाठ फिरवून पळ काढला व मागे (वाळूनही) पाहिले
नाही. (आम्ही आज्ञापिले) हे मूसा भिऊ नकोस. माझ्या हुजुरात (येऊन) पैगंबर (समाधान
पावतात व) भीत नाहीत. परमेश्वर (असा परमपवित्र आहे
44
की) त्याच्याशिवाय अन्य कोणी
उपास्य नाही. (आणि ) तोच महान अर्शा (च्या सिंहासना) चा मालक होय. (आणि
परमेश्वराच्या नावानंतर) हे की माझ्यापुढे शिरजोरी करू नका आणि आधीन होऊन माझ्यासमोर
हजर व्हा. -मं० ५। सि० १९। सू० २७। आ० ९। १०। २६। ३१।।
(समीक्षक) ही पाहा मुसलमानांच्या परमेश्वराची
आत्मश्लाघा. अल्ला स्वतःच्या मुखानेच आपला मोठेपणा सांगतो. आत्मस्तुती करणे हे
श्रेष्ठ पुरुषाचे काम नव्हे; मग ते खुदाचे कसे असू शकेल?
म्हणून तर जादूचे प्रयोग दाखवून खुदाने जंगली लोकांना भुरळ घातली व
तो स्वतःच जंगलाचा ईश्वर बनून बसला. असली गोष्ट ईश्वरीय ग्रंथात कधीच असू शकत
नाही. जर तो मोठ्या अर्शचा म्हणजे सातव्या अस्मानचा (आकाशाचा) मालक असेल तर एकदेशी
ठरतो व म्हणून ईश्वर असू शकत नाही. बंडखोरी करणे ही वाईट गोष्ट असेल तर ख़ुदा आणि
मुहम्मद साहेब यांनी आपल्याच स्तुतीने कुराण का भरून टाकले? खुदाच्या
चिथावणीने मुहम्मद साहेबांनी अनेक लोकांना ठार मारले. ती बंडखोरी झाली की नाहीं ?
हे कुराण पुनरुक्ती आणि परस्परविरोधी गोष्टी यांनी भरलेली आहे. ॥१२१||
(१२२) आणि (हे वाचका, श्रोत्या!)
पर्वतांस पाहून विचार करतोस की हे (आपल्या जागी) पाय रोखून उभे आहेत. (बदलू शकत
नाहीत) पण (पुनरुत्थानाच्या दिवशी) हे (पर्वत) ढग चालतात तसे चालू लागतील. ही
परमेश्वराची कारागिरी (होय) की, ज्याने प्रत्येक वस्तू खूप
भक्कम बनविली आहे. नि:संशय जे काही तुम्ही (लोक) करिता त्याच्याशी तो खूप परिचित
(खबरदार) आहे. -मं० ५। सि० २०। सू० २७। आ० ८७। ८८।।
(समीक्षक) छान ढगांप्रमाणे पर्वत चालतातही
गोष्ट कुराणवाल्यांच्या देशात घडत असेल. इतरत्र ती घडत नाही आणि खुदाची खबरदारी
त्याने बंडखोर सैतानाला पकडले नाही आणि शिक्षा दिली नाही. याहून अधिक गाफिलपणा तो
कोणता?॥१२२॥
(१२३) म्हणून मूसाने त्या (च्या शत्रू) स
ठोसा मारला व (तेथेच) त्याचा निकाल लावून टाकला. *(आणि मूसाने त्यावेळी) प्रार्थना
केली की, हे माझ्या पालमकर्त्या! (हा तर) मी आपल्यावर
(मोठाच) जुलूम केला. तर तू माझ्या अपराधाबद्दल क्षमा कर. सारांश, परमेश्वराने त्याच्या अपराधाची क्षमा केली. (आणि) तो (फारच) क्षमाकर्ता
(व) दयाळू आहे आणि (हे पैगंबरा!) तुझा पालनकर्ता जसे इच्छितो तसे लोक उत्पन्न करतो
व (त्यांच्यातून ज्याला इच्छितो त्याला) निवडून देतो. -मं० ५। सि० २०। सू० २८। आ०
१५। १६। ६८।।
(समीक्षक) आता आणखी असे पाहा की, ख्रिस्ती व मुसलमान यांचा देव (ख़ुदा) कसा वागतो. पैगंबर मूसा माणसाची
हत्या करतो आणि खुदा त्याला क्षमा करतो. म्हणजे ते दोघेही अन्यायी आहेत की नाही?
खुदा आपल्या इच्छेनेच मनाला वाटेल तशी उत्पत्ती करतो काय? त्याने आपल्या इच्छेनेच एकाला राजा, दुसऱ्याला
दरिद्री आणि एकाला विद्वान व दुसऱ्याला अडाणी बनविले काय? जर
तसे असेल तर कुराण सत्य असू शकत नाही आणि खुदा अन्याय करणारा असल्यामुळे ईश्वर असू
शकत नाही. ॥१२३॥ ॥
(१२४) आणि आम्ही माणसाला आपल्या आईबापांशी
चांगले वर्तन करण्याची आज्ञा केली आणि (हेही समजावून दिले की) जर आईबाप तुझ्यामागे
ह्यासाठी झटतील की तू अशा एखाद्याला माझा जोडीदार
45
मानावेस की, ज्या (च्या ईश्वरी जोडीदार होण्या) चे
तुजपाशी कोणतेही ज्ञान (युक्त प्रमाण) च नाही; तर (या
गोष्टीत) तू त्यांचे सांगणे मानू नकोस. तुम्हा (सर्वा) स मजकडे परतून येणे आहे आणि
आम्ही नुहला त्याच्या लोकांकडे (पैगंबर करून) पाठविले; तर तो
पन्नास वर्षे कमी हजार वर्षे त्या (लोकांत) राहिला. -मं० ५। सि० २०। सू० २९। आ० ८।
१४।।
(समीक्षक) आईबापांची सेवा करणे चांगले आहे.
आम्हाला देवासमान किंवा प्रतिपरमेश्वर माना असे त्यांनी सांगितले तर त्यांचे
म्हणणे न ऐकणे हेही योग्यच होय. परंतु आईबापांनी खोटे बोलण्यासारख्या वाईट गोष्टी
करायला सांगितल्या तर त्यांची ती आज्ञा पाळली पाहिजे काय ? म्हणून
हे वचन अर्धे चांगले व अर्धे वाईट आहे. नूह (नोहा) वगैरे पैगंबरांनाच खुदा जगात
पाठवितो काय ? मग इतर जीवांना कोण पाठवितो? जर सर्वांना तोच पाठवीत असेल तर सगळेच पैगंबर का होत नाहीत? आणि जर जुन्या काळी माणसांचे आयुष्य हजार वर्षांचे होते तर आता तेवढे
आयुष्य का असत नाही ? म्हणून ही गोष्ट बरोबर नाही. ॥१२४॥
(१२५) परमेश्वरच सृष्टीस प्रथम निर्माण करतो;
व नंतरही तोच (याच तऱ्हे ची) सृष्टी दुसऱ्यांदा निर्माण करतो. नंतर
तुम्ही (सर्व लोक) त्याच्याकडे पालटून नेले जाल; आणि
त्यादिवशी (पुनरुत्थानाची) घटका कायम होईल त्यादिवशी पापी लोक निराश होऊन जातील.
मग ज्यांनी विश्वास धरला व चांगली कामेही केली, ते तर
(स्वर्गाच्या) बागेत असतील व आनंदी आनंद पावत असतील आणि जर आम्ही (असा) वारा चालवू
व हे लोक शेत पिवळे (पडलेले) पाहतील, जे लोक समज बाळगत नाहीत
त्यांच्या मनावर परमेश्वर अशाच तऱ्हेने मोहर लावून टाकीत असतो. -मं० ५। सि० २१।
सू० ३०। आ० ११। १२। १५। ५१। ५९।।
(समीक्षक) अल्ला सृष्टीची उत्पत्ती दोनदा
करतो, तिसऱ्यांदा करीत नाही, हे खरे
असेल तर पहिल्या उत्पत्तीच्यापूर्वी आणि दुसऱ्या उत्पत्तीच्यानंतर तो रिकामा बसून
राहत असणार; आणि एक-दोनदा उत्पत्ती केल्यानंतर त्याचे
सामर्थ्य संपून जात असणार अथवा निरर्थक होत असणार. न्यायनिवाड्याच्या दिवशी पापी
लोक निराश होत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु याचा अर्थ असा तर नव्हे ना की
मुसलमानांखेरीज इतर सर्वांना पापी समजून निराश केले जाईल? कारण
कुराणामध्ये अनेक ठिकाणी मुस्लिमेतरांनाच पापी असे म्हटलेले आहे. बागेत ठेवणे आणि
दागदागिन्यांनी सजविणे हाच मुसलमानांचा वर्ग असेल तर तो इहलोकासारखाच झाला. तेथे
माळी व सोनारही असतील अथवा खुदाच माळी, सोनार वगैरेंची कामे
करीत असेल. एखाद्याला कमी दागिने मिळाले तर चोरीही केली जात असेल आणि मग चोरी
करणाऱ्यांना खुदा स्वर्गातून नरकातही पाठवित असेल. असे होत असल्यास, 'सदैव स्वर्गात राहाल', हे खुदाचे आश्वासन खोटे ठरेल.
शेतकऱ्यांच्या शेतीवरही खुदाची दृष्टी आहे. ही विद्या शेती करण्याच्या अनुभवातूनच
प्राप्त होत असते. खुदाने आपल्या ज्ञानाच्या जोरावर सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या
असतील तर अशी भीती घालणे म्हणजे घमेंड दाखविणेच आहे. अल्लाने जीवांच्या
अंत:करणांवर मोहर ठोकून त्यांच्याकडून पाप करविले असेल तर त्या पापाची जबाबदारी
खुदावर आहे. ती जीवात्म्यांवर येऊ शकत नाही. ज्याप्रमाणे जय अथवा पराजय ही
सेनापतीची जबाबदारी असते त्याप्रमाणे साऱ्या पापांची जबाबदारी खुदावरच येऊन पडते.
॥१२५॥
47
(१२६) ही (त्याच) पुस्तका (म्हणजे कुराण) ची
महावाक्ये होत की, ज्यांत बुद्धी (व शहाणपणा) च्या गोष्टी
आहेत. त्यानेच आकाशाला (जसे) तुम्ही (लोक) पाहता (तसे) स्तंभाविना बनवून उभे केले
आहे आणि (त्यानेच) पृथ्वीत (भारी अचल पर्वताचे) नांगर टाकले आहेत की ती (कोठे)
तुम्हांसह (एकीकडे) कलून पडू नये. का तू या (गोष्टीवर) नजर केली नाहीस की, परमेश्वरच रात्री (च्या एका भाग) स दिवसात दाखल करतो आणि तोच दिवसाला
रात्रीत दाखल करतो. का तू (या गोष्टीचे) अवलोकन केले नाहीस की, परमेश्वराच्याच कृपेने गलबत समुद्रात चालते, की
आपल्या (परम सामर्थ्याच्या) कित्येक निशाण्या तुम्हा लोकांस दाखवाव्या. -मं० ५।
सि० २१। सू० ३१। आ० २। १०। २९। ३१।।
(समीक्षक) वाहवा! किती युक्तियुक्त आहे हा
ग्रंथ ! त्यामध्ये विज्ञानाच्या विरुद्ध असणाऱ्या गोष्टी किती ठामपणे सांगितल्या
आहेत पाहा. आकाशाची उत्पत्ती, त्याला खांबाचा आधार असण्याची
शंका आणि पृथ्वीला स्थिर ठेवण्यासाठी पर्वताची आवश्यकता वगैरे गोष्टी किती
हास्यास्पद आहेत ! ज्याला थोडीफार विद्या अवगत झाली असेल त्याने असले लिखाण कधीच
केले नसते आणि त्यावर विश्वास ठेवला नसता.जेथे दिवस असतो तेथे रात्र नसते व जेथे
रात्र तेथे दिवस नसतो. या दोन अवस्थांचा एकमेकींमध्ये प्रवेश करण्याचा उल्लेख केला
आहे. ही अत्यंत अडाणीपणाची गोष्ट आहे. त्यामुळे कुराण हे ज्ञानाचे पुस्तक असू शकत
नाही. नौका माणसांकडून क्रियाकौशल्याने चालविल्या जातात की, त्या
खुदाच्या कृपेने चालतात? त्या ईश्वरी कृपेने चालतात असे
लिहिणे ही ज्ञानविरोधी गोष्ट नव्हे काय ? लोखंडाची किंवा
दगडाची नौका बनवून ती समुद्रात सोडली तर ती खुदाची निशाणी असली तरी बुडेल की नाही ?
याचा अर्थ असा की, हे पुस्तक कोणाही
विद्वानाने अथवा ईश्वराने रचलेले असू शकत नाही. ॥१२६॥
(१२७) आकाशापासून (ते) पृथ्वीपर्यंत तोच
(प्रत्येक) कामाची व्यवस्था लावतो. मग तुम्हा लोकांच्या (इहलौकिक) गणनेच्या
(अनुरोधाने) हजार वर्षांच्या मुदतीचा एक दिवस होईल. हाच (तर परमेश्वर अदृष्ट व
दृष्ट अशा सर्व) गोष्टींचा ज्ञाता, परम समर्थ (व) दयाळू (असा
आहे) व मग त्याने त्या (च्या पुतळ्या) स दुरूस्त बनविले व त्यात आपल्या आत्म्यास
फुंकले. सांग की, मृत्यूचा दूत ज्याला तुम्हावर नेमलेले आहे
तोच तुमचे प्राण हरण करतो आणि जर आम्ही इच्छिले तर प्रत्येक मनुष्याला सद्बुद्धी
देतो; परंतु गोष्ट सिद्ध होऊनच राहिली की 'जिन्न', दैवत व मनुष्ये या सर्वांनीही मी 'जहन्नम' (नरक) भरून टाकीन. -मं० ५। सि० २१। सू० ३२।
आ० ५। ६। ९। ११। १३।।
(समीक्षक) आता हे पूर्णपणे सिद्ध झाले की,
मुसलमानांचा खुदा माणसासारखा एकदेशी आहे. कारण तो सर्वव्यापक असता
तर तो एका ठिकाणाहून सर्व व्यवस्था पाहणे आणि चढणे-उतरणे या गोष्टी का करीत राहिला
असता? खुदा देवदूतांना पाठवीत असेल तरीही तो एकदेशीच ठरतो.
तो स्वत: आकाशात लोंबकळत बसला आहे आणि देवदूतांना धावपळ करायला लावतां आहे.
देवदूतांनी लाच घेऊन एखादा घोटाळा केला किंवा एखाद्या मृताला सोडून दिले तर खुदाला
काय कळणार? जो सर्वज्ञ व सर्वव्यापक असेल त्यालाच या गोष्टी
कळणार. पण तो काही तसा नाही. तो तसा असता तर देवदूतांना पाठविण्यांची आणि अनेक
लोकांची अनेक
48
प्रकारे परीक्षा घेण्याची काय गरज
होती ? त्याने पाठविलेल्या देवदूतांना परत
आणण्याची व्यवस्था करण्यास त्याला एक हजार वर्षे लागतात. यावरून तो सर्वशक्तिमान
नाही हे सिद्ध होते. एखादा दूत मृत्यूदूत असेल तर त्या दूताला मारणारा कोणता
मृत्यू आहे? जर अमर असेल तर अमरत्वाच्या बाबतीत तो ख़ुदाचा
सहभागी किंवा ईश्वरतुल्य ठरतो. एक देवदूत एकाच वेळी नरक भरण्यासाठी जीवांना
उद्युक्त करू शकत नाही आणि त्या लोकांनी काही पाप केलेले नसताना आपल्या मर्जीनुसार
त्यांना नरकात ढकलून जो त्यांना दु:ख देतो व गंमत पाहतो तो ख़ुदा अन्यायी व निर्दय
आहे. अशा गोष्टी ज्या पुस्तकात असतील ते एखाद्या विद्वानाने अथवा ईश्वराने
लिहिलेले असणे शक्य नाही आणि जो दयाहीन व न्यायहीन आहे, तो
कधीच ईश्वर असू शकत नाही. ॥१२७॥
(१२८) सांग की, जर
तुम्ही मृत्यू किंवा मारले जाण्या (च्या भीती) ने पळून जाल तर (हे पळून जाणे)
तुम्हांस केव्हाच (काहीही) फायदा देणार नाही. अहो पैगंबराच्या पत्न्यांनो!
तुमच्यातून जी कोणी एखादी उघडउघड गैरशस्त वर्तणूक करील तिला दुहेरी शिक्षा दिली
जाईल आणि परमेश्वरासमीप ही (एक) सोपीशी (गोष्ट) होय. -मं० ५। सि० २१। सू० ३३। आ०
१५। ३०।।
(समीक्षक) लढाईच्या वेळी कोणी पळून जाऊ नये,
आपला विजय व्हावा , मरणाला कोणी भिऊ नये,
आपले ऐश्वर्य वाढावे व आपल्या पंथाचा प्रसार व्हावा म्हणून हे
मुहम्मद साहेबांनी लिहिले-लिहविले असावे आणि पत्ल्यांनी पत्न्यांनी गोषा न करता
निर्लज्जपणे येऊ नये असे म्हणावयाचे असेल तर पैगंबर साहेबांनी स्वतः तसे का करावे?
(म्हणजे गोषा न घेता बाहेर का यावे?) या
गुन्ह्याबद्दल पत्न्यांना शिक्षा व्हावी आणि पैगंबरसाहेबांनी सहीसलामत सुटून जावे
हा कुठला न्याय? ॥१२८॥
(१२९) आणि आपल्या घरात बसून राहा. (आपला
शृंगार इतरांना दाखवीत फिरू नका.) अल्ला आणि रसूल यांच्या आज्ञेचे पालन करा.
त्यांच्याखेरीज इतरांची आज्ञा मानू नका. मग जेव्हा जैदने तिजकडून (आपला) हितसंबंध
सोडून दिला. (म्हणजे तिला काडी मोडून दिली) तेव्हा आम्ही तुझ्याशी तिचा विवाह
लावून दिला; की जेणेकरून (सर्व) मुसलमानांचे दत्तक जेव्हा
आपल्या स्त्रियांकडून हितसंबंध सोडून देतील तेव्हा मुसलमानांस त्यांच्या
(सोडलेल्या) स्त्रियां (शी लग्न करुन घेण्या) है (कोणत्याही तऱ्हेची) अडचण राहु
नये आणि परमेश्वराचा हुकूम तर पुरा होऊनच राहतो. परमेश्वराने पैगंबरासाठी जी गोष्ट
ठरवून दिली असेल ती (करण्या) त पैगंबरास काही हरकत नाही. मुहम्मद तुमच्या
पुरुषांतून कोणाचाही बाप नाही; आणि कोणतीही मुसलमान व जर ती
आपल्या जीवाला पैगंबरास अर्पण करून टाकील (म्हणजे बंधनावाचून विवाहसंबंधात येऊ
इच्छिल) तर (ही गोष्ट) खास तुझ्यासाठीच आहे, तू आपल्या
स्त्रियांतून जिला इच्छिशील, (व तिला आपल्यापासून) अलग
राखावेस आणि जिला इच्छिशील (तिला) तू आपल्याजवळ राखावेस, तर
(यातही) तुजवर काही पाप नाही. अहो मुसलमानांनो! पैगंबराच्या घरात शिरत जाऊ नका.
-मं० ५। सि० २२। सू० ३३। आ० ३३। ३६। ३७। ४०। ५०। ५१। ५२।।
(समीक्षक) स्त्रीने घरात कैद्याप्रमाणे आणि
पुरुषांनी मोकळेपणाने वावरावे ही अत्यंत अन्यायाची गोष्ट आहे. शुद्ध हवेत श्वास
घ्यावा, देशामध्ये भ्रमण करावे, सृष्टीतील
अनेक गोष्टी पाहाव्या अशी इच्छा स्त्रियांच्या
49
मनात उत्पन्न होत नसेल काय ? या अपराधामुळेच मुसलमानांची मुले विशेषकरून
उनाडटप्पू व विषयासक्त असतात. अल्ला आणि रसूल यांच्या आज्ञा परस्परविरोधी व विसंगत
आहेत की सुसंगत ? जर त्या एकच व सुसंगत असतील तर दोघांच्या
आज्ञेचे पालन करा, असे सांगणे निरर्थक आहे आणि जर त्या
परस्परविरोधी व वेगवेगळ्या असतील तर त्यांतील एक खरी व दुसरी खोटी असणार. म्हणजे
एकजण खुदा व दुसरा सैतान आहे असे ठरेल. तरीही तो ईश्वराचा भागीदार किंवा
प्रतिईश्वर ठरेल. कुराणातील खुदा, पैगंबर व कुराण यांची धन्य
होय. ज्याला दुसत्याचे हित नष्ट करून आपला स्वार्थ साधणे इष्टा वाटते तो त्या
दृष्टीने डावपेच करतो. या आयतीवरून मुहम्मदसाहेब अत्यंत विषयासक्त होते असे सिद्ध
होते. जर ते तसे नसते तर त्यांनी आपल्या दत्तक मुलाच्या बायकोला म्हणजे स्वत:च्या
सुनेला आपली बायको कशी बनवली असती ? असल्या गोष्टी
करणायाच्या बाबतीत खुदाही पक्षपाती बनला आणि त्याने अन्यायाला न्याय ठरविले. जंगली
लोकही आपल्या सुनेशी लग्न करीत नाहीत. ख़ुदाने पैगंबराला विषयासक्त बनून कामुक
चाळे करण्यास मुळीच प्रतिबंध केला नाही, ही केवळ भयंकर
अन्यायाची गोष्ट आहे! जर नबी हा कोणाचा बाप नव्हता तर जैद हा कोणाचा दत्तक मुलगा
होता? आणि असे का लिहिले? याचा अर्थ एवढाच
की, जे पैगंबरसाहेब खुद आपल्या सुनेशी शरीरसंबंध ठेवण्यास
कचरले नाहीत ते इतर बायकांच्या बाबतीत कसे काय दूर राहिले असतील ? एवढा धूर्तपणा वापरला असला तरी जी गोष्ट निंद्य आहे तिची निंदा
झाल्याखेरीज राहत नाही. एखादी परस्त्री पैगंबरावर फिदा होऊन त्यांच्याशी लग्न करू
इच्छित असेल तर तेही शास्त्रसंमत (हलाल) समजावयाचे काय पैगंबर वाटेल त्या बायकोला
वाऱ्यावर सोडून देऊ शकतो परंतु पैगंबर अपराधी असला तरी त्यांच्या बायका त्याला
सोडू शकत नाहीत ही तर महाअर्धमाची गोष्ट आहे. ज्याप्रमाणे पैगंबरांच्या घरात इतर
कोणा पुरुषाने व्यभिचाराच्या विचाराने प्रवेश करू नये, त्याप्रमाणे
पैगंबर साहेबांनीही कोणाच्या घरात प्रवेश करता कामा नये. नबींनी वाटेल त्याच्या
घरात बेधडक घुसावे आणि तरीही ते सन्माननीय समजले जावेत काय? असा
कोण अंत:करणाचा आंधळा आहे की, जो या कुराणाला ईश्वरकृत,
मुहम्मद साहेबांना पैगंबर आणि कुराणोक्त ईश्वराला परमेश्वर मानू
शकेल? अशा तर्कशून्य, धमविरोधी
गोष्टींनी युक्त असलेल्या या पंथाला (इस्लामला) अरबस्थान वगैरे देशातील लोकांनी
कसे काय स्वीकारले ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. ॥१२९॥
(१३०) आणि तुम्हांस हे शोभत नाही की तुम्ही परमेश्वराच्या
पैगंबरास इजा द्यावी आणि हेही (शोभत) नाही की, त्याच्या
मागून कधीही तुम्ही त्याच्या स्त्रियांशी विवाह करावा. परमेश्वरासमीप ही मोठी
(गैर) गोष्ट आहे. जे लोक परमेश्वर व त्यांचा पैगंबर यांस (कोणत्याही तऱ्हेची) इजा
देतात त्यांच्याबर इहलोक व परलोक या (दोहों) त परमेश्वराचा शाप होय आणि जे लोक
मुसलमान पुरुष व मुसलमान स्त्रिया यांस त्यांनी काही कसूर केल्यावाचून (उगीच तोहमत
लावून) इजा देतात, तर ते (खोटे) तुफान व धडधडीत पाप यांचे
ओझे (आपल्या मानेवर) लादून घेतात. (मग) त्यांची अशी दशा होईल की, (चोहोकडून) धुतकारलेले, जेथे मिळेल तेथे पकडले व
मारून त्यांचे तुकडे तुकडे उडवून दिले तर हे आमच्या पालनकर्त्या! त्यांना दुप्पट
शिक्षा दे आणि त्यांना (मोठ्यात) मोठा शाप दे. -मं० ५। सि० २२। सू० ३३। आ० ५३। ५४।
५५। ६१। ६८।।
50
(समीक्षक) वाहवा ! खुदा आपले ईश्वरत्व
धर्माला अनुसरून, समतेच्या स्वरूपात व्यक्त करीत आहे काय?
उदाहरणार्थ, पैगंबराला कोणी दुख देऊ नये,
हे खुदाचे सांगणे योग्य आहे परंतु पैगंबरानेही इतरांना दुख देऊ नये
म्हणून त्याच्यावर काही निर्बंध लादणे हेही आवश्यक होते. तसे त्याने का केले नाही?
अल्लाला कोणी दुःख दिल्यास तो (अल्ला) ही दु:ख होतो काय? तसे असेल तर तो ईश्वर असू शकत नाही. अल्ला आणि रसूल यांना दुःख देण्यास
प्रतिबंध केल्याने अल्ला व रसूल हे मात्र वाटेल त्याला दु:ख देण्यास मोकळे आहेत
असे सिद्ध होत नाही काय? मुसलमानांना व त्यांच्या बायकांना
दु:ख देणे जितके वाईट आहे. तितकेच मुस्लिमेतरांना दुःख देणेही नक्कीच वाईट आहे. ही
गोष्ट जर ते मानीत नसतील तर ते पक्षपाती आहेत. साऱ्या जगात हाहाकार माजविणारा खुदा
आणि त्याचा नबी दोघेही धन्य होत ! यांच्यासारखे निर्दय प्राणी जगात फारच थोडे
असतील. मुस्लिमेतर लोक जेथे सापडतील तेथे त्यांना पकडावे व मारून टाकावे असे
कुराणात सांगितले आहे. अशीच आज्ञा इतर पंथातील लोकांनी मुसलमानांच्या बाबतीत दिली
तर ती गोष्ट मुसलमानांना आवडेल काय? जो पैगंबर परमेश्वराकडे
अशी प्रार्थना करतो की, "तू मुसलमानांच्या दुप्पट दु:ख
मुस्लिमेतरांना दे." तो केवढा हिंसक असला पाहिजे, हीही
पक्षपाताची, मतलब साधूपणाची (स्वार्थसाधूपणाची) व अत्यंत
अधर्माची गोष्ट आहे. यामुळेच अजूनही मुसलमानांमधील पुष्कळसे लबाड व गुंडलोक असली
कृत्ये करण्यास मुळीच मागे पुढे पाहत नाहीत. माणसाला चांगले शिक्षण मिळाले नाही तर
तो पशू सारखाच जगतो, हे खरे आहे.॥१३०॥
(१३१) आणि परमेश्वरच असा (परस समर्थ) आहे की,
तो वारा चालवितो व वारा ढगांना उभारतो. मग ढगांना आम्ही अशा शहराकडे
हाकून लावतो की, जे (पाण्याच्या अभावामुळे) मृत (म्हणजे पडीत
पडलेले) आहे. मग आम्ही पावसाच्या द्वारे जमिनीस तिच्या मृत अवस्थेतून सजीव (व टवटवीत)
करून टाकतो. अशाच प्रकारे (लोकांचेही पुनरुत्थानाच्यावेळी जिवंत) उठणे होईल की,
त्याने आम्हांस आपल्या कृपेने राहणाऱ्या (अशा) घरात आणून उतरविले की,
तेथे आम्हाला (कोणत्याही तऱ्हेचे) श्रम पोहचत नाहीत व येथे आम्हांस
(कोणत्याही प्रकारचा) थकवा लागत नाही. -मं० ५। सि० २२। सू० ३५। आ० ९। ३५।।
(समीक्षक) वाहवा! काय खुदाची फिलॉसफी! तो
वाऱ्याला पाठवितो आणि ढगांना उठवून इकडे तिकडे फिरवितो! आणि खुदा त्याद्वारे
प्रेतांना जिवंत करीत फिरतो. ही गोष्ट ईश्वराच्या बाबतीत कधीच घडू शकत नाही. कारण
ईश्वराचे काम निरंतर एकसारखे होत असते. घरे बांधल्याशिवाय तयार होत नाही आणि जी
गोष्ट बनविली जाते ती सदैव राहू शकत नाही. ज्याला शरीर असते तो परिश्रमाविना दु:खी
होतो आणि शरीरधारी रोगी झाल्याशिवाय राहत नाही. जो एका स्त्रीशी समागम करतो त्याला
आजार झाल्याशिवाय राहत नाही. तर मग जो अनेक स्त्रियांशी शरीरसंबंध करत त्याची काय
दुर्दशा होत असेल? म्हणून मुसलमानांचा स्वर्गातील मुक्कामही
सदैव सुखदायक असू शकत नाही. ॥१३१॥
कुराण खुदाची रचना नव्हे
(१३२) कुराण ज्यात (सर्वस्वी) शहाणपणाच्या
गोष्टी आहेत त्याची शपथ की, (हे मुहम्मद) काहीच संशय नाही की
(इतर) पैगंबरांपैकीच तूही (पैगंबर) आहेस. (आणि धर्माच्या) सरळ मार्गावर आहेस. (हे
कुराण) सामर्थवान (व) दयाळू (परमेश्वराने) प्रकटिले आहे. -मं० ५। सि० २३। सू० ३६।
आ० २। ३। ४। ५।।
51
(समीक्षक) आता पाहा! हे कुराण ईश्वनिर्मित
असते तर ईश्वराने कुराणाची शपथ का घेतली असती ? नबी हा
ईश्वराने पाठविलेला असता तर तो आपल्या दत्तक मुलाच्या बायकोवर मोहित का झाला असता
कुराणावर श्रद्धा असणारे लोक सन्मार्गावर आहेत असे म्हणणे हा नुसता शाब्दिक खेळ
आहे. कारण सत्यावर श्रद्धा ठेवणे, सत्य बोलणे, सत्याचरण करणे, पक्षपातरहित न्याय-धर्माचे आचरण करणे
आणि याविरुद्ध असणाऱ्या गोष्टींचा त्याग करणे वगैरे गोष्टी ज्यामध्ये आहेत तोच
सन्मार्ग असतो. परंतु कुराणात आणि मुसलमानाच्या व त्यांच्या खुदाच्या स्वभावातच या
गोष्टी नाहीत. पैगंबर मुहम्मदसाहेब हे सर्वांहून श्रेष्ठ असते तर ते सर्वांहून
अधिक ज्ञानवान आणि शुभगुणांनी युक्त नसते काय? म्हणून एखादी
माळीण जशी आपली बोरे आंबट आहेत असे सांगत नाही तशीच ही गोष्ट आहे.॥१३२॥
(१३३) आणि (मग दुसऱ्यांदा) कर्णा फुंकला
जाईल. तेव्हा एकदम (सारेच्या सरे) थडग्यांतून (बाहेर पडून) आपल्या पालन कर्त्याकडे
धावू लागतील आणि त्यांचे पायही साक्ष देतील. त्याचे काम तर असे आहे की, जेव्हा तो कोणत्याही वस्तूचा संकल्प करतो तेव्हा तो तिला केवळ (एवढेच)
सांगतो की 'हो' व ती होऊन जाते. -मं०
५। सि० २३। सू० ३६। आ० ५१। ६६। ८२।।
(समीक्षक) आता या असंबद्ध गोष्टी ऐका! पाय
कधी साक्ष देऊ शकतात काय ? त्यावेळी खुदाशिवाय कोण होता की,
ज्याला आज्ञा दिली? ती कोणी ऐकली? आणि कोण (काय) बनले? जर खुदाशिवाय दुसरे कोणी नसेल
तर हे वचन खोटे ठरते आणि जर कोणी असेल तर 'खुदाशिवाय दुसरी
कोणतीच वस्तू नव्हती व खुदाने सर्वकाही निर्माण केले,’ हे
वचन खोटे ठरते. ॥१३३॥
(१३४) त्यांच्यांत स्वच्छ मद्याचा प्याला
(चौफेर) फिरवला जात असेल. (ते मद्य) पांढरे शुभ्र (असून) पिणारास (फार) स्वाद देईल
आणि त्यांच्यापाशी खाली नजर राखणाऱ्या मोठमोठ्या डोळ्यांच्या (अप्सरा) असतील की,
जणू त्या (शहामृगाची) अंडी होत की ती (सांभाळून) पडद्यात ठेवलेली
आहेत. आता पुढे आम्हाला मरावयाचे नाही आणि काही संशय नाही. 'लूत'
या अर्थात पैगंबरांपैकीच आहे. आम्ही लूतला व त्याच्या कुटुंबाला
(शिक्षेतून) वाचवून घेतले. पण (त्याची) म्हातारी (बायको) मागे राहणाऱ्यांत (राहून
गेली) होती. मग आम्ही इतरांचा विध्वंस करून टाकला. -मं० ६। सि० २३। सू० ३७। आ० ४५।
४६। ४८। ४९। ५६। १२७। १२८। १२९।।
(समीक्षक) काय हो महाराज? येथील मुसलमान दारू वाईट (त्याज्य) आहे. परंतु त्यांच्या स्वर्गात तर
दारूच्या नद्या वाहतात. इहलोकी कसेबसे मद्यपान निषिद्ध ठरविले, ही गोष्ट चांगली आहे. परंतु इहलोकाऐवजी त्यांच्या स्वर्गात फारच वाईट
गोष्ट आहे. बहुधा स्त्रियांच्या वास्तव्यामुळे तेथे कोणाचे चित्त ठिकाणावर राहत
नसावे. शिवाय महाभयंकर रोगही होत असतील. तेथे राहणारे शरीरधारी असतील तर ते अवश्य
मरतील आणि जर ते शरीरधारी नसतील तर ते भोग-विलासच करू शकणार नाहीत. त्यामुळे
त्यांच्या स्वर्गात जाणे व्यर्थ आहे जर तुम्ही लूतला पैगंबर मानीत असाल तर बायबलात
असे लिहिले आहे की, लूतच्या मुलींनी त्याच्याशी समागम करून
दोन मुलांना जन्म दिला ही गोष्ट खरी मानता की नाही? जर खरी
मानत असाल तर अशाला पैगंबर मानणे निरर्थक आहे! आणि अशा माणसाला व त्याच्या साथीदारांना
खुदा मुक्ती देत असेल तर तो खुदाही तसलाच आहे. कारण म्हातारीची गोष्ट सांगणारा आणि
पक्षपाताने इतरांना ठार मारणारा खुदा कधीही ईश्वर असू शकत नाही. असला खुदा
मुसलमानांच्या घरातच राहू शकतो, अन्यत्र राहू शकत नाही.॥१३४॥
52
(१३५) सर्वकाल राहणाच्या (स्वर्गाच्या) बागा
की ज्यांची दारे त्यांच्यासाठी (पहिल्यानेच) उघडलेली असतील (आणि ते) त्यात तक्ये
लावून बसतील. तेथे पुष्कळ फळे व पेये मागवितील आणि त्यांच्यापाशी खाली नजर
राखणाऱ्या (पत्न्या) असतील. (व त्यात मौज ही की त्या त्यांच्या) समवयस्कही
(असतील.) तात्पर्य एकूण एक सर्वच देवदूतांनी साष्टाग नमस्कार घातला. पण (एक)
इब्लिस (सैतान) (मात्र नमला नाही) की तो अभिमानात येऊन गेला व नास्तिकांपैकी होऊन
बसला. परमेश्वराने (इब्लिसला) विचारले की, 'हे इब्लिसा,
ज्या वस्तूला मी आपल्या हातांनी बनविले त्या (वस्तू) स साष्टांग
नमस्कार घालण्यापासून तुला कोणत्या वस्तूने प्रतिबंध केला? काय
तू शेखीत येऊन गेलास की तू (खरोखरीच) बड्या लोकांपैकी आहेस?' तो म्हणाला, 'मी त्याच्यापेक्षा फारच श्रेष्ठ आहे.
मला तू अग्नीतून बनविलेस व त्याला मातीतून बनविलेस. (परमेश्वराने) सांगितले,
'तू येथून नीघ (चालता हो!); की तू धोंडमार
करून पिटाळला जाशील आणि (शेवटच्या) निवाड्याच्या दिवसापर्यंत तुझ्यावर माझा शाप
(पडत राहील).' (तो)
बोलला, 'माझ्या पालनकर्त्या (सर्व लोक पुनः) उठवून उभे केले
जातील. त्यादिवसापर्यंत मला तू अवसर दे.' (परमेश्वराने)
म्हटले, '(होय, तुला त्या दिवसा पावतो
अवसर आहे. की ज्याचा वेळ (मलाच) माहीत आहे.' (तो) म्हणाला,
'(तर मलाही) तुझ्याच प्रतापाची शपथ आहे की या (मानवा) त जे तुझे
निःसीम भक्त आहेत त्यांना सोडून या समस्त लोकांस मी बहकवून सोडीन तरच खरा!'
-मं० ६। सि० २३। सू० ३८। आ० ४९। ५०। ५१। ५२। ७०। ७१। ७३। ७५। ७६।
७८। ८०। ८१।।
(समीक्षक) कुराणात वर्णन केल्याप्रमाणे
स्वर्गामध्ये बागबगीचे, कालवे, इमारती
वगैरे खरोखरीच असतील तर त्या गोष्टी सदैव तेथे नव्हत्या व सदैव तशाच राह शकणार
नाहीत. कारण जो पदार्थ संयोगाने बनतो तो संयोगपूर्वी तेथे नसतो व वियोगानंतरही
अस्तित्वात असत नाही. जर तो स्वर्णच कायम राहणार नाही तर त्यात राहणारे सदैव कसे
राहू शकतील ? कुराणात असे लिहिले आहे की, स्वर्गात गाद्या-गिरद्या, तक्क्ये, फळे, पेये वगैरे मिळतील यावरून हे सिद्ध होते की,
जेव्हा मुसलमानांचा पंथ सुरू झाला त्यावेळेस अरबस्थान हा देश फारसा
श्रीमंत नव्हता. म्हणून मुहम्मद साहेबांना गाद्यागिरद्या वगैरे गोष्टींचे आमिष
दाखवून गरीब लोकांना आपल्या पंथात ओढले. जेथे स्त्रिया आहेत तेथे निरंतर सुख कसे
असेल ? त्या स्त्रिया तेथे कोठून आल्या? त्या कायम स्वर्गात राहणाऱ्या आहेत काय? जर त्या
बाहेरून आल्या असतील तर परत आपल्या गावी जातील आणि जर त्या तिथल्याच रहिवासी असतील
तर निवाड्याच्या दिवसापूर्वी त्या काय करीत होत्या रिकामटेकड्या बसून त्या आपले
आयुष्य वाया घालवीत होत्या काय?
आता खुदाचे तेज पाहा ! त्याचा
हुकूम मान्य करून इतर देवदूतांनी आदम साहेबांना नमस्कार केला. पण सैतानाने तो
हुकूम मानला नाही. तेव्हा खुदा सैतानाला म्हणाला की, "मी आदमला माझ्या दोन्ही हाताने बनविले आहे. तू गर्व करू
नकोस. " यावरून असे सिद्ध होते की, कुराणातला खुदा दोन
हात असणारा माणूस होता. म्हणून तो सर्वव्यापक व सर्वशक्तिमान मुळीच असू शकत नाही
आणि सैतानाने सत्यच सांगितले की, 'मी आदमहून श्रेष्ठ
आहे" यावर खुदा का रागावला ? खुदाचे घर आकाशातच आहे काय?
पृथ्वीवर नाही? तर मग काबा हे खुदाचे घर आहे,
असे प्रथम का लिहिले?
53
छान! परमेश्वर आपणच निर्माण
केलेल्या सृष्टीपासून स्वतःला वेगळे कसे काढू शकतो? आणि सारी
सृष्टी परमेश्वराची आहे. यावरून हे
स्पष्ट दिसून येते की, कुराणाचा
खुदा हा स्वर्गाचा मक्तेदार (मालक) होता.
खुदाने सैतानाचा धिक्कार करून
त्याला कैद केले, यावर
सैतानाने त्याला सांगितले की, "मालक ! मला
न्यायनिवाड्याच्या दिवसांपर्यंत
मोकळे सोडा त्याने केलेल्या खुशामतीमुळे ख़ुदाने त्याला कयामतीच्या
दिवसापर्यंत सोडून दिले. मुक्त
होताच सैतानाने खुदाला सागितले की,
"आता मी खूप लोकांना बहकावीन
आणि बंडाळी करीन." तेव्हा
खुदा म्हणाला, "तु जितक्या
लोकांना वाममार्गाला लावशील त्या सर्वांना आणि
तुलाही मी नरकात टाकीन."
सज्जन मंडळींनो, आता तुम्हीच विचार करा. सैतानाला
बहकाविणारा खुदा आहे की सैतान आपणहून बहकला? जर ख़ुदाने
त्याला बहकाविले असेल तर तो सैतानाचा सैतान ठरतो. जर सैतान स्वतः होऊन बहकला असेल
तर इतरही जीव स्वत:च बहकतील. त्यासाठी सैतानाची जरूर नाही आणि या बंडखोरे सैतानाला
खुदाने मोकळे सोडले. यावरून हे सिद्ध होते की, अधर्माचरण
करविण्याच्या कामी खुदाही सैतानाचा सहभागी होता. एखाद्याला चोरी करायला लावून
स्वत:च त्याला शिक्षा द्यावयाची, या अन्यायाला तोड नाही.
॥१३५॥
(१३६) परमेश्वर सर्व पापांची क्षमा करतो. तो
नि:संशय (फारच) क्षमाशील व दवाळू आहे. (ही) सारी पृथ्वी त्याच्या एका मुठीत असेल
आणि आकाश (हे पत्रांप्रमाणे) गुंडाळलेले त्याच्या उजव्या हातात आणि पृथ्वी आपल्या
पालन कर्त्याच्या प्रकाशाने चकाकू लागेल व (लोकांचे कर्माचे) पुस्तक (आणून समोरे)
ठेवले जाईल आणि पैगंबर आणि साक्षीदार हे हजर केले जातील व लोकांचे दरम्यान
(त्यांच्या मतभेदांचा) न्यायपुरस्पर निवाडाकेला जाईल. -मं० ६। सि० २४। सू० ३९। आ०
५३। ६७। ६९।।
(समीक्षक) जर खुदा सगळ्या पापांची क्षमा करीत
असेल तर तो जणू सगळ्या जगाला पापी बनवीत आहे व तो निर्दयी आहे. कारण एका दुष्टावर
दया व क्षमा केल्याने तो जास्तच दुष्टपणा करील आणि इतर अनेक धर्मात्म्यांना दु:ख
देईल. अगदी लहानशा अपराधाबद्दलही क्षमा केल्यास जगात सर्वत्र अपराधच अपराध पसरतील.
परमेश्वर अग्नीसारखा प्रकाशमान आहे काय? आणि कर्मपत्रे कोठे
जमा होतात? ती कोण लिहितो? ख़ुदा जर
पैगंबर व साक्षीदार यांच्या भरवशावर न्यायनिवाडा करीत असेल तर तो सर्वज्ञही नाही व
सामर्थ्यसंपन्नही नाही. जर तो अन्याय करीत नसेल व न्यायच करीत असेल तर तो
कर्मानुसार तसे करीत असणार. ती कर्में पूर्वजन्मातील असतील अथवा या जन्मातील
असतील. अशा स्थितीत क्षमा करणे, अंत:करणांना कुलुपे घालणे,
शिक्षा न देणे, सैतानाला बहकाविणे आणि त्यांना
कच्च्या कैदेत ठेवून त्यांचा छळ करणे हा निव्वळ अन्याय आहे. ॥१३६ ॥
(१३७) (हे) लेखी फर्मान (अशा) परमेश्वरांच्या
हुजुरातून सादर होत आहे. (की जो) परम समर्थ (व सर्व) ज्ञान (आहे). (तो) पापांबद्दल
क्षमा करणारा व पश्चात्तापाचा स्वीकार करणारा आहे. -मं० ६। सि० २४। सू० ४०। आ० १।
२। ३।।
54
(समीक्षक) भोळ्याभाबड्या लोकांनी अल्लाच्या
नावाने कुराणावर श्रद्धा ठेवावी म्हणून हे लिहिलेले आहे. यामध्ये थोडेसे सत्य असून
बाकी सारे असत्यच भरलेले आहे आणि ते सत्यही असत्यासोबत जणू असत्यासारखेच वाटते.
म्हणून कुराण, कुराणातील खुदा आणि त्यांच्यावर विश्वास
ठेवणारे हे सारे पाप करणारे, करविणारे व पाप वाढविणारे आहेत.
कारण पापाला क्षमा करणे हा फार मोठा अधर्म आहे. परंतु त्यामुळेच मुसलमान लोक पापे
आणि दंगेधोपे करण्यास फारसे कचरत नाहीत.॥१३७॥
(१३८) त्यानंतर दोन दिवसात त्याने त्या
(धुक्याचा थरा) ची सात आकाशे बनविली आणि प्रत्येक आकाशात व्यवस्था त्याने (दूतांस)
सांगून दिली. येथपर्यंत की जेव्हा (सर्व) नरकात येऊन गोळा होतील तेव्हा त्यांचे
कान व त्यांचे डोळे व त्यांच्या त्वचा यांच्याविरुद्ध ते जसजशी कर्मे करत राहिले
आहेत त्या (कर्मां) ची साक्ष देतील आणि हे लोक आपल्या त्वचांशी पुसतील की (बरे,)
तुम्ही आमच्याविरुद्ध का म्हणून साक्ष दिली असेल? ते उत्तर देतील की ज्या परमेश्वराने प्रत्येक वस्तूस वाचा दिली त्यानेच आम्हालाही
वाचा दिली. तोच (परमेश्वर पुनरुत्थानाच्या वेळी) मेलेल्यांनाही जिवंत करणारा
आहे.-मं० ६। सि० २४। सू० ४१। आ० १२। २०। २१। ३९।।
(समीक्षक) शाबास मुसलमानांनो! वाहवा! तुम्ही
आपल्या खुदाला सर्वशक्तिमान समजता. पण तो सात आकाश दोन दिवसांत बनवू शकला.
ज्याप्रकारचा त्याप्रकारे पाहता त्याने क्षणात सर्वकाही बनवावयास पाहिजे. कान,
डोळे व कातडी यांना ईश्वराने जड बनविले आहे. ते कसे साक्ष देऊ शकतील
? त्यांना साक्ष द्यावयास लावावयाचे होते तर त्याने प्रथम
त्यांना जड (अचेतन) का बनविले ? आणि आपल्या आधीचे व नंतरचे
काम नियमाविरुद्ध का केले ? याहूनही अधिक खोटी गोष्ट ही आहे
की, जेव्हा अवयवांनी जीवांविरुद्ध साक्ष दिली तेव्हा ते जीव
आपल्या कातडीला विचारू लागले की, 'तू आमच्याविरुद्ध साक्ष का
दिलीस ?' कातडी म्हणाली, 'खुदान
द्यायला लावली. मी काय करणार?' असे कधी घडू शकते काय?
एखाद्याने असे म्हणावे की, 'मी वंध्येच्या
पुत्राचे तोंड पाहिले तसे हे आहे. पुत्र असेल तर ती वंध्या कशी असेल? जी वंध्या असेल तिला मूल होणे हीच अशक्य गोष्ट आहे. तशीच ही खोटी गोष्ट
आहे. तो मृतांना जिवंत करीत असेल तर आधी त्यांना मारलेच का? स्वतः
खुदाही मरू शकतो की नाही? जर तो मरू शकत नसेल तर मृत्यूला तो
वाईट का समजतो? आणि न्यायनिवाड्याच्या दिवसापर्यंत मृत जीव
कोणत्या मुसलमानाच्या घरात राहणार? आणि खुदाने जीवांचा काही
अपराध नसताना त्यांचा निवाडा स्थगित का ठेवला ? ताबडतोब
न्याय का केला नाही? असल्या गोष्टीमुळे ईश्वरत्वाला बट्टा
लागतो.॥१३८॥
(१३९) आकाश व पृथ्वीच्या (खजिन्यांच्या)
किल्ल्या त्याच्याचपाशी आहेत. तो ज्याची इच्छितो त्याची अन्नसंपत्ती वाढवितो आणि
(ज्याला इच्छितो त्याला) काटकसरीने देतो. तो जे इच्छितो ते निर्माण करतो. ज्याला
तो इच्छितो त्याला (निव्वळ) मुलीच देतो; आणि ज्याला इच्छितो
त्याला (केवळ) मुलेच देतो. अथवा मुले व मुली (मिळून) दोन्ही प्रकारची संतती त्यास
देतो आणि ज्याला इच्छितो त्याला असा (नामशेष) करून टाकतो की त्याला संततीच होत
नाही आणि कोणाही मनुष्याची ताकद नाही की परमेश्वर त्याच्याशी (प्रत्यक्ष) संभाषण
करील. पण प्रकटीकरणाद्वारे अगर पडद्याच्या मागून अथवा तो कोणा दूतास (त्याच्याकडे)
पाठवतो. -मं० ६। सि० २५। सू० ४२। आ० १०। १२।४७। ४८। ४९।।
55
(समीक्षक) खुदाजवळ किल्ल्यांचे एक भांडारच
भरलेले असणार. कारण त्याला सर्व ठिकाणची कुलुपे उघडावी लागत असणार. ही पोरकटपणाची
गोष्ट आहे. त्याच्या मनास येईल त्याला त्याने पुण्यकर्म केले नसेल तरी तो ऐश्वर्य
देतो काय? अथवा त्रास देतो काय? असे
असेल तर तो फार मोठा अन्याय करणारा आहे. आता कुराणकर्त्याचे चातुर्य पाहा.
त्यामुळे स्त्रियासुद्धा मोहित होऊन त्याच्या जाळ्यात अडकतील. त्याला वाटेल ते तो
उत्पन्न करू शकत असेल तर तो दुसरा खुदाही निर्माण करु शकतो काय? जर करू शकत नसेल तर त्याचे सर्वशक्तिमत्व येथे अडले. माणसांपैकी ज्यांना
मुले हवे असतील त्यांना मुले व ज्यांना मुली हव्या असतील त्यांना मुली तो देतो.
परंतु कोंबड्या, मासे, डुकरे इत्यादी
ज्या पशुपक्ष्यांना पुष्कळ मुले होतात त्यांना ती कोण देतो? आणि
श्रीपुरुषांचा समागम झाल्याशिवाय तो मुले का देत नाही? एखादीला
आपल्या इच्छेने बांझ ठेवून दुख का देतो ? वाहवा ! खुदा इतका
तेजस्वी आहे की, त्याच्या समोर कोणी बोलूही शकत नाही. परंतु
यापूर्वी कुराणात असे सांगितले आहे की, पडद्याआडून
त्याच्याशी बोलता येते; अथवा देवदूत किंवा पैगंबर खुदाशी
संभाषणे करतात. असे असेल तर देवदूत आणि पैगंबर त्याच्याशी बोलून आपला स्वार्थ साधत
असणार. खुदा सर्वज्ञ व सर्वव्यापक आहे असे कोणी म्हणत असेल तर पडद्याआडून बोलणे
आणि टपालाप्रमाणे बातम्या मागवून त्या जाणून घेणे व लिहिणे व्यर्थ आहे आणि असेच
असेल तर तो खुदाच नसून कोणीतरी चलाखी करणारा माणूस असावा. म्हणून हे कुराण कधीच
ईश्वरकृत असू शकत नाही.॥१३९॥
(१४०) आणि जेव्हा येशू चमत्कार घेऊन आला.
-मं० ६। सि० २५। सू० ४३। आ० ६३।।
(समीक्षक) जर येशूलाही खुदानेच पाठविले होते
तर त्याच्या उपदेशाविरुद्ध उपदेश करणारे कुराण खुदाने का बनविले ? आणि कुराणाविरुद्ध बायबल का निर्माण केले ? म्हणूनच
हे दोन्ही ग्रंथ ईश्वरकृत नाहीत. ॥१४०॥
(१४१) याला धरा आणि ओढीत ओढीत याला नरकाच्या
मधोमध घेऊन जा आणि मोठमोठ्या व काळ्या डोळ्यांच्या अप्सरांशी आम्ही त्यांच्या
जोड्या लावून दिलेल्या असतील. -मं० ६। सि० २५। सू० ४४। आ० ४७। ५४।।
(समीक्षक) छान! खुदा न्याय करणारा असूनही
प्राण्यांना पकडवितो आणि ओढत न्यायला लावतो काय ? मुसलमानांचा
खुदाच असे करतो तर त्याचे उपासक मुसलमान अनाथांना व दुबळ्यांना पकडून फरपटत नेत
असतील यात काय आश्चर्य ? तो संसारी माणसांप्रमाणे लग्नेही
लावून देतो. जणू काही तो मुसलमानांचा भटजीच आहे.॥१४१॥
(१४२) (मुसलमानांनो !) (लढाईत) जेव्हा
नास्तिकांशी तुमची गाठ पडेल तेव्हा (बेलाशक त्यांच्या) माना उडवून टाका. येथपर्यंत
की जेव्हा तुम्ही खूप त्यांचा जोर मोडून टाकाल तेव्हा तुम्ही त्यांच्या मुस्क्या
बांधून टाका (म्हणजे कैद करा) आणि (हे पैगंबरा!) तुझी (ही) वस्ती (मक्का) जेथील
लोकांनी तुला (घरातून) काढून लावले त्याहूनही कित्येक वस्त्या फारच बलवत्तर होत्या,
की आम्ही त्यांचा नाश करून टाकला व कोणीही त्याच्या मदतीस उभा
राहिला नाही. ज्या स्वर्गाचे अभिवचन (परमेश्वराला) भिऊन वागणाऱ्यांस दिले जाते
त्याची तऱ्हा अशी आहे की, त्यात (अशा) पाण्याच्या नद्या आहेत
की ज्यांत (नावासही) वास नाही व
56
(अशा) दुधाच्या आहेत की ज्याची रुची (मुळीच)
बदलली नाही आणि (अशा) मद्याच्या नद्या आहेत की जे सेवन करणाऱ्यास फारच रुचकर लागेल
व (तशाच) स्वच्छ (व निर्मळ) मधाच्याही नद्या आहेत, आणि
त्यांना तेथे हरतऱ्हेची फळफळावळ (प्राप्त) होईल व त्यांच्या पालनकर्त्यांकडून
क्षमा (ती वेगळेच). -मं० ६। सि० २६। सू० ४७। आ० ४। १३। १५।।
(समीक्षक) म्हणूनच हे कुराण, खुदा व मुसलमान दंगेधोपे करणारे, सर्वांना दुःख
देणारे आणि स्वार्थी व निर्दयी आहेत. येथे जसे लिहिले आहे तसेच वर्तन इतर पंथाचे
लोक मुसलमानांशी करतील तर मुसलमान लोक इतरांना जसे दुःख देतात तसेच दु:ख
मुसलमानांना होईल की नाही? हा खुदा मोठा पक्षपाती आहे कारण
यांनी मुहम्मद साहेबांना हाकलून दिले त्यांना खुदाने मारून टाकले. जेथे शुद्ध पाणी,
दूध, मद्य आणि मध यांच्या नद्या आहेत तो
स्वर्ण या जगाहून कोणत्या बाबतीत श्रेष्ठ आहे? दुधाच्या
नद्या कधीतरी असू शकतील काय? कारण दूध फार थोड्या वेळात
नासते. म्हणूनच शहाणे लोक कुराणात सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार करीत नाहीत.
॥१४२॥
(१४३) जेव्हा जमीन मोठ्या जोराने हालू लागेल;
आणि पर्वताचे तुकडे तुकडे होऊन जातील की (जशी) धूळच उधळून पडली आहे.
(एक) तर उजवाहातवाले, तर उजव्याहाताकडल्यांचे काय, (सांगणे) ! आणि (एक) डावाहातवाले, तर डाव्या
हाताकडल्यांचे काय (ती दुर्गती)! सुवर्णाच्या रत्नजडित तक्तांवर ते एकमेकांच्या
समोर टेकून (बसलेले) असतील. त्यांच्यापाशी (स्वर्गीय) तसण मुले जी नित्य (मुलेच
बनून) राहतील. ती (सरबत पाजण्यासाठी) पेले व सुरया (तोटीदार तांब्ये) घेऊन येत जात
असतील आणि (अशा) स्वच्छ मद्याचे पेलेही, की ज्या (च्या
पिण्या) ने त्यांचे डोके दुखणार नाही व ते बरळणारही नाहीत आणि तसेच ज्या तऱ्हेची
फळे ते पसंत करतील (ती फळे); व ज्या प्रकारच्या पक्ष्यांच्या
मांसाची त्यांना इच्छा होईल (तेच मांस) आणि (या देणग्यांखेरीज) काळ्याभोर मोठ्या
डोळ्यांच्या अप्सरा (असतील); की ज्या जणू घड्यात ठेवलेल्या
मोत्यासारख्या (सुंदर असतील) आणि उंच उंच बिछायती (च्या सुखा) ने (मजा मारीत)
असतील या (अप्सरा) आम्ही (त्यांच्यासाठी एकदम) बनवून उभ्या केल्या आणि त्यांना
(अशा) बनविल्या (की त्या कुमारिका आहेत); आपल्या पतीस प्रिय
व समवयस्क (अशा आहेत) आणि त्यानेच पोटे भरावी लागतील तथापि मी (उल्का)
नक्षत्रांच्या तुटण्याची शपथ वाहतो. -मं० ७। सि० २७। सू० ५६। आ० ४। ५। ६। ८। ९।
१५। १६। १७। १८। १९। २०। २१। २२। २३। ३३। ३४। ३५। ३६। ३७। ३८। ५३।।
(समीक्षक) आता पाहा ! कुराण रचणाऱ्यांची
विचित्र लीला ! पृथ्वी ही नेहमीच हलत असते ; आणि खुदाने
उल्लेख केलेल्या वेळीही ती हलत असेल. यावरून असे सिद्ध होते की कुराण रचणारा
पृथ्वी स्थिर आहे असे समजत होता. बरे, पर्वतांना तो काय
पक्ष्याप्रमाणे उडायला लावील ? ते भुंगे बनले तरीही ते
सूक्ष्म शरीरधारी होतील. मग त्यांचा पुनर्जन्मही का होणार नाही? छान! खुदा शरीरधारी नसता तर त्याच्या उजव्या व डाव्या बाजूला कोणी कसे उभे
राहू शकले असते ? तेथील पलंग सोन्याच्या तारांचे बनलेले
आहेत. म्हणजे तेथे सुतार व सोनारही राहत असणार शिवाय ढेकूण चावत असतील व रात्री
झोपूही देत नसतील. ते स्वर्गामध्ये लोडाला टेकून रिकामटेकडे बसूनच राहतात की काही
कामधाम करतात? जर ते नुसतेच बसून राहत असतील
57
तर त्यांना अन्न न पचल्याने ते
आजारी पडत असतील व लवकरच मरूनही जात असतील, नाही काय ? आणि जर ते काम करीत असतील तर इहलोकी जसे
मेहनत मजुरी करतात तसेच तेथे काबाडकष्ट करून पोट भरत असतील. मग इथल्यापेक्षा
स्वर्गात विशेष असे काय आहे? काहीही नाही. तेथे सदैव मुले
राहत असतील तर त्यांचे आईबापही राहत असतील आणि सासू-सासरेही असतील. म्हणजे भले मोठे
शहरच तयार झालेले असणार. मग मलमूत्रादी खूप वाढल्याने रोगांचाही खूप प्रसार होत
असणार. कारण जर ते फळे खात असतील फुलपात्रांतून पाणी आणि मद्यचषकांतून मदिरा पीत
असतील तर मग त्यांची डोकी का दुखणार नाहीत ? आणि हे
एकमेकांविरुद्ध वाईटसाईट का बोलणार नाहीत ? यथेष्ट मेवामिठाई
खाल्यानंतर ते पशुपक्ष्यांचे मांसही खात असतील. त्यामुळे त्यांना नाना प्रकारचे
रोग होऊन दु:ख भोगावे लागत असणार. तेथे पशुपक्षी असणार, त्यांची
हत्या केली जात असणार, कसायांची दुकानेही असणार आणि मृत
पशुपक्ष्यांची हाडे जिकडे-तिकडे पडलेली असणार. वाहवा! त्यांच्या त्या दिव्य
स्वर्गाचे काय वर्णन करावे? अरबस्तानापेक्षाही तो वरचढ
नक्कीच असणार! मद्यपान करून व मांस खाऊन झिंगल्यावर त्यांना उत्तमोत्तम स्त्रिया व
लोंडे(तरुण मुलगे) लागणारच. त्याची सोय तेथे अवश्य असली पाहिजे. नाहीतर अशा
नशाबाजांच्या डोक्यात गरमी चढून ते पिसाळतील इतक्या सगळ्या स्त्री पुरुषांना
बसण्यासाठी मोठेमोठे कोच-सोफे आणि झोपण्यासाठी मोठमोठे पलंग हवेतच. जेव्हा ख़ुदा
स्वर्गामध्ये कुमारिकांना उत्पन्न करतो तेव्हाच तो कुमारांनाही उत्पन्न करतो. आता
येथून उमेदवार स्वर्गात गेले आहेत त्यांच्याशी खुदाने तेथील कुमारिकांचे विवाह
लावून टाकले. परंतु सदैव तरूण राहणाऱ्या तेथील मुलांचे काय ? त्यांच्याशी तेथील कुमारिकांचे लग्ने झाली नाहीत तर त्यांनी काय करायचे ?
त्यांनीही त्या उमेदवारांजवळ कुमारींसारखे राहायचे काय ? या बाबतीत काही तरतूद कुराणात केलेली दिसत नाही. खुदाकडून एवढी मोठी चूक
कशी काय झाली? समवयस्क सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीसह
स्वर्गात राहत असतील तर ते योग्य नाही. कारण स्त्रीच्या वयाच्या दीडपट किंवा
दुप्पट वय पुरुषाचे असले पाहिजे. असो, ही झाली मुसलमानांच्या
स्वर्गाची कथा ! आता नरकाची कथा ऐका. तेथे गेलेल्या लोकांना थूहड नावाच्या
झाडाच्या (शेरासारख्या) काटेरी फांद्या खाऊन पोट भरावे लागते. याचा अर्थ असा की,
नरकामध्ये काटेरी झाडे आहेत. त्या लोकांना उकळते पाणी प्यावे लागते.
अशा प्रकारच्या यातना नरकात पडणाऱ्यांना भोगाव्या लागतात. शपथ घेण्याचा उल्लेख
कुराणात येतो. वस्तुत: जे. खोटारडे असतात ते शपथा घेतात. सत्यवादी लोक शपथ घेत नाहीत.
म्हणून जर खुदाच शपथ घेत असेल तर तोही खोटारडाच ठरतो. ॥१४३॥
(१४४) जे लोक परमेश्वराच्या मार्गात फळी
बांधून लढतात त्या लोकांस तर परमेश्वर नि:संशय चाहतो. -मं० ७। सि० २८। सू० ६१। आ०
४।।
(समीक्षक) वाहवा! छान! असला उपदेश करून
खुदाने बिचाऱ्या अरबांना सर्वांशी लढायला लावून जगाचे शत्रु बनविले आणि सर्वांनाच
दुःखाच्या खाईत लोटले. धर्माचा झंडा फडकावून जो कोणी लढाया घडवून आणतो त्याला
कोणताही शहाणा माणूस ईश्वर मानणार नाही. जो मानव-जातीमध्ये विद्वेष निर्माण करतो
तोच सर्वांना दु:ख देणारा असतो. ॥१४४॥
58
घरगुती भांडणांनी खुदा चिंतीत
(१४५) हे पैगंबरा! ज्या (वस्तू) परमेश्वराने
तुझ्यासाठी मुभा (विहित) केल्या आहेत त्या तू आपल्या पत्न्यांची मर्जी
संपादण्यासाठी (आपल्याला) का म्हणून निषिद्ध करतोस? आणि
परमेश्वर क्षमाकर्ता व दयाळू आहे. जर पैगंबर तुम्हां (स्त्रियां) स काडी मोडून
देईल तर नव्हे की, त्याचा पालनकर्ता त्याला तुमच्यापेक्षा
उत्तम पत्न्या तुमच्या बदली देईल. (म्हणजे) ईश्वराधीन, विश्वासू,
भक्तिपरायण, (परमेश्वराच्या सेवेत) पश्चाताप
करणाऱ्या उपासिका, उपोषण (रोज) करणाऱ्या, विधवा व कुमारिका (अश. -मं० ७। सि० २८। सू० ६६। आ० १। ५।।
(समीक्षक) नीट लक्ष देऊन पाहिल्यास असे दिसून
येईल की, हा खुदा म्हणजे जणू मुहम्मद साहेबांच्या घराची आतील
व बाहेरील व्यवस्था पाहणारा नोकरच आहे. यातील पहिल्या आयतीच्या संदर्भात दोन कथा
सांगितल्या जातात. पहिली कथा अशी की, मुहम्मद साहेबांना
मधाचे सरबत आवडत असे. त्यांना अनेक बायका होत्या. त्यांच्यापैकी एकीच्या घरी मधाचे
सरबत पिण्यास थोडा उशीर झाला. पण तो इतर बायकांना असह्य झाला. त्यांनी मुहम्मद
साहेबांना त्याबद्दल फैलावर घेतले. तेव्हा मुहम्मद साहेबांनी शपथ घेतली की,
"मी यापुढे कधीही मधाचे सरबत पिणार नाही." दुसरी कथा अशी
की, मुहम्मद साहेबांच्या अनेक बायकांपैकी एकीची पाळी होती.
तिच्याकडे ते रात्री गेले. पण ती घरी नव्हती. ती माहेरी गेली होती. म्हणून मुहम्मद
साहेबांनी एका दासीला बोलावून घेतले व तिलाच 'पावन' केले. जेव्हा त्या बायकोला ही गोष्ट कळली तेव्हा ती फार नाराज झाली.
तेव्हा मुहम्मद साहेबांनी अशी शपथ घेतली की, "यापुढे मी
असे करणार नाही." आणि त्यांनी त्या बायकोलाही सांगितले की, "तू ही गोष्ट कुणाला सांगू नको." त्या बायकोने आपण कोणाला सांगणार
नाही असे कबूल केले. परंतु दुसऱ्या बायकोकडे गेल्यावर खुद्द मुहम्मद साहेबांनीच ही
गोष्ट तिला सांगितली. या घटनेच्या संदर्भात खुदाने ही आयत पाठविली की,
"आम्ही जी वस्तू तुझ्यासाठी ग्राह्य (हलाल) ठरविली ती तू
निषिद्ध (हराम) का करतोस?" आता विचारवंतांनी असा विचार
करावा की, खुदा एखाद्या माणसाची घरगुती भांडणे मिटविण्याचे
काम करीत फिरतो काय? या घटनांवरून मुहम्मद साहेबांचे वर्तन
कसे होते तेही दिसून येते. कारण जो अनेक बायका करतो तो ईश्वराचा भक्त अथवा पैगंबर
कसा असू शकेल ? आणि जो एका स्त्रीच्या पक्षपाताने अपमान करतो
आणि दुसरीचा सन्मान करतो तो पक्षपाती व अधर्मी आहे असे का म्हणू नये? आणि अनेक बायकांनीही ज्याचे समाधान न झाल्यामुळे जो दासी-बटकींशी
शरीरसंबंध ठेवतो त्याला लाजलज्जा, भीती व धर्म कोठून असणार?
कोणीतरी म्हटलेच आहे की, ‘कामातुराणां न भयं न
लज्जा' ।।
कामवासनेच्या आधीन झालेल्या
लोकांना अधर्माची भीती अथवा लाज वाटत नाही आणि यांचा खुदाही मुहम्मद पैगंबर आणि त्यांच्या
बायका यांच्यातील भांडणाचा निर्णय देणारा सरपंच बनला आहे. आता बुद्धिमान लोकांनीच
विचार करावा की, हे कुराण एखाद्या
अविद्वानाने रचलेले अथवा ईश्वरकृत आहे की एखाद्या अविद्वान व स्वार्थी माणसाने
लिहिलेले आहे ? त्यांना स्पष्ट समजेल. दुसऱ्या आयतीवरून असे
दिसते की, मुहम्मद साहेबांवर त्यांची बायको नाराज झाली
असावी. म्हणून खुदाने ही आयत प्रकट करून तिला धमकावले असावे की, "तूफार गडबड करशील तर मुहम्मद साहेब तुला सोडून देतील आणि मग त्यांना
त्यांचा खुदा पुरुषाशी
59
संबंध न आलेल्या (कुमारिका) उत्तम
बायका देईल. "ज्या माणसामध्ये थोडी देखील बुद्धी असेल तो निर्णय करू शकेल की
हे सारे खुदाचे काम असेल की, आपला
स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी (पैगंबरानेच) केलेली चलाखी असेल? असल्या गोष्टींवरून हे पूर्णपणे सिद्ध होते की, हे
बोलणारा खुदा-विदा कोणी नव्हता. तर देश काळ पाहून आपला हेतू साध्य करण्यासाठी
खुदाच्या वतीने मुहम्मद साहेबच स्वत: बोलत होते. जे लोक हे प्रकार ईश्वरीय मानीत
असतील त्यांना आम्हीच काय पण सर्व बुद्धिमंत लोक असेच सांगतील की, “हा कसला खुदा? तो तर जणू मुहम्मद साहेबांसाठी बायका
आणणारा मध्यस्थ (न्हावी) च आहे !!" ॥१४५॥
(१४६) हे पैगंबरा! नास्तिकाशी (हातांनी) व
दांभिकांशी (वाचेने) धर्मयुद्ध करीत राहा आणि त्यांच्यावर जुलूम कर. -मं० ७। सि०
२८। सू० ६६। आ० ९।।
(समीक्षक) मुसलमानांच्या खुदाचीही करामत
पाहा! इतर पंथांच्या लोकांशी लढण्यासाठी ते पैगंबराला व मुसलमानांना चिथावणी देतो.
म्हणूनच मुसलमान लोक नेहमी दंगेधोपे करतात. परमेश्वराने मुसलमानांवर कृपा करावी.
म्हणजे तरी लोक दंगेधोपे करणे सोडून देऊन
सर्वाशी प्रेमाने वागतील. ॥१४६॥
(१४७) आणि आकाश फाटून जाईल व त्यादिवशी फारच
पोचट (फुसफुशीत) होऊन जाईल आणि त्याच्या किनाऱ्यावर दूत असतील आणि त्या दिवशी
तुझ्या पालनकर्त्याच्या सिंहासनास आठ (दूत) आपल्यावरती उचलून धरतील. त्यादिवशी
तुम्ही (परमेश्वरापुढे) रुजू केले जाल. तुमचे कोणतेच गूढ गुप्त राहणार नाही. तर
ज्याला त्याचे (कर्म) पत्रक उजव्या हातात दिले जाईल तो म्हणेल की घ्या हो! (हे)
माझे (कर्म) पत्रक तर वाचा आणि ज्याचे (कर्म) पत्रक त्याच्या डाव्या हातात दिले
जाईल तो म्हणेल, माझे (कर्म) पत्रक मिळाले नसते तर बरे झाले
असते! -मं० ७। सि० २९। सू० ६९। आ० १६। १७। १८। १९। २५।।
(समीक्षक) वाहवा! काय तत्वज्ञान आणि काय हा
न्याय ! आकाशही कधी फाटू शकते काय ? ते फाटायला काय वस्त्र
आहे? जर वरच्या लोकाला (परलोकाला) आकाश म्हणत असतील तर ती
गोष्ट ज्ञानविरोधी आहे. आता कुराणातील खुदा शरीरधारी आहे यात काहीच शंका उरली
नाही. कारण सिंहासनांवर बसणे, आठ भोयांनी उचलणे, वगैरे गोष्टी खुदा हा शरीरधारी (साकार) असल्याखेरीज संभवत नाहीत. तसेच
मागे-पुढे येणे जाणे ही गोष्टही मूर्तिमानाच्या बाबतीतच घडू शकते. जर तो मूर्तिमंत
असेल तर तो एकदेशी असल्याने सर्वज्ञ, सर्वव्यापक व
सर्वशक्तिमान असू शकत नाही आणि सर्व जीवांच्या सर्व कर्माची माहिती त्याला असू शकत
नाही. पुण्यात्म्यांच्या उजव्या हातात कर्मपत्र देणे, ते
वाचावयास लावणे व त्यांना नरकात पाठविणे व कर्मपत्रे वाचून न्याय करणे ही मोठी
आश्चर्याची गोष्ट आहे. हा व्यवहार सर्वज्ञाचा असू शकतो काय? मुळीच
नाही. हा साराच पोरकटपणा आहे. ॥१४७॥
(१४८) की ज्या (पायऱ्यांच्या) (वाटा) द्वारे
देवदूत व आत्मा (म्हणजे जिब्रील) त्याच्याकडे चढून जातात. (पुनरुत्थानाच्या) अशा
एका दिवशी (जी घडून येईल) की ज्याचा अंदाज पन्नास हजार वर्षांचा होईल. जेव्हा हे
आपल्या थडग्यातून निघून बाहेर पडतील (व) असे धावत असतील की जणू एखाद्या निशाणाकडे
धावत चालते आहेत. -मं० ७। सि० २९। सू० ७०। आ० ४। ४३।।
(समीक्षक) जर दिवस पन्नास हजार वर्षांचा आहे
तर रात्रीही पन्नास हजार वर्षांची का नाही? तेवढी मोठी
60
रात्र नसेल तर तेवढा मोठा दिवसही
कधी असू शकत नाही. पन्नास हजार वर्षांपर्यंत खुदा, फरिश्ते (देवदूत) आणि कर्मपत्रधारक उभे, बसलेले अथवा जागतच राहातील काय ? तसे असल्यास सर्वजण
रोगी बनून पुनः मरूनच जातील. थडग्यांतून बाहेर पडून प्रेते खुदाच्या न्यायालयाकडे
धावत जातील काय? त्यांची समन्से त्यांच्यावर थडयांमध्ये कशी
काय बजावली जातील? आणि जे कोणी पुण्यात्मे अथवा पापात्मे
असतील त्या विचाऱ्यांना इतक्या दीर्घकाळापर्यंत थडग्यांमध्ये कच्च्या कैदेत डांबून
का ठेवले? आजकाल खुदाचे न्यायालय बंद असेल. म्हणजे खुदा आणि
देवदूत रिकामेच बसले असतील की! अथवा ते काय काम करीत असतील? बहुधा
आपापल्या घरात ऐषआराम करीत असतील, झोपत असतील, नाचगाणे व नाटक-तमाशे पाहत असतील अथवा इकडेतिकडे फिरत असतील. असली
अंदाधुदी कोणत्याही राज्यात नसेल. असल्या गोष्टीवर जंगली लोकांखेरीज कोण विश्वास
ठेवील?॥१४८॥
(१४९) आणि वास्तविक पाहता त्याने तुम्हास
तऱ्हेतऱ्हेचे पैदा केले. का तुम्ही पाहीले नाही की परमेश्वराने एकावर एक अशी सात
आकाशे बनविली आहेत? आणि त्यात चंद्रालाही बनविले (की तो एक)
प्रकाश (होय) आणि सूर्याला बनविले (की तो एक प्रकाशित) दिवा (होय)!! -मं० ७। सि०
२९। सू० ७१। आ० १४। १५। १६।।
(समीक्षक) ख़ुदाने जीवांना उत्पन्न केले असेल
तर ते कधीही नित्य, अमर राहू शकत नाहीत. मला स्वर्गात ते
कायमचे कसे राहू शकतील ? जी वस्तू उत्पन्न होते ती अवश्य
नष्ट होते. (आकाश हे निराकार आहे) ते वरच्या बाजूला खुदा कसा निर्माण करू शकतो?
दुसऱ्या एखाद्या वस्तूचे नाव आकाश असे ठेवीत असाल तरीही आकाश हे नाव
ठेवणे व्यर्थ आहे. वर खाली आकाशे बनविली असतील तर त्यांच्या मध्ये चंद्र-सूर्य कधीच
राह शकणार नाहीत. ते मध्यभागी ठेवले गेले तर त्यांच्या वरच्या व खालच्या आकाशात
प्रकाश पडेल आणि इतर आकाशात अंधार पसरेल. प्रत्यक्षात तसे काही दिसत नाही. म्हणून
हे सारे थोतांड आहे.॥१४९॥
(१५०) आणि मशिदी तर परमेश्वराच्या (उपासने)
साठी आहेत. तर (लोकांनो ! त्यांत) परमेश्वराबरोबर (आणखी) कोणाचा धावा करू
नका. -मं० ७। सि० २९। सू० ७२। आ० १८।।
(समीक्षक) ही गोष्ट खरी असेल तर मुसलमान लोक
"लाइलाह इल्लिलाः मुहम्मदर्रसूलल्लाः" (लाइलह इलल्लह मुहम्मद उर
रसूलल्लाह) या कलम्यामध्ये ख़ुदाच्या बरोबर मुहम्मद साहेबांना का हाका मारतात?
ही गोष्ट कुराणाच्या विरुद्ध आहे. जर ती तशी विरुद्ध नसेल तर
कुराणातील ही आयत खोटी ठरते. मशिदी ही खुदाची घरे असतील तर मुसलमान महामूर्तिपूजक
ठरतात. कारण पौराणिक व जैन लोक लहानशा मूर्तीला ईश्वराचे घर मानल्याने जसे
मूर्तिपूजक ठरतात तसे हे लोक मूर्तिपूजक का ठरू नयेत ? ॥१५०॥
(१५१) आणि सूर्य व चंद्र (दोन्ही) एकत्र गोळा
केले जातील .-मं० ७। सि० २९। सू० ७५। आ० ९।।
(समीक्षक) सूर्य आणि चंद्र हे कधीतरी एकत्र
येऊ शकतील काय ? ही किती अडाणीपणाची गोष्ट आहे पाहा आणि सूर्य व चंद्र यांनाच एकत्र
करण्यामध्ये काय प्रयोजन होते ? इतर सर्व लोक-लोकांन्तरांना
एकत्र न करण्यात कोणते तर्कशास्त्र आहे? असल्या अशक्य गोष्टी
कधी तरी परमेश्वरकृत असू शकतात काय ? अडाण्यांखेरीज इतर कोणी
असल्या गोष्टी लिहिणार नाही. ॥१५१॥
61
(१५२) स्वर्गवाश्यांपाशी (सेवेसाठी) मुले
येत-जात असतील. ती नेहमी (मुलेच) राहतील त्यांना पाहशील तर तू (अशी) कल्पना करशील
की, जणू ती पसरलेली मोत्येच (आहेत) व त्यांना चांदीची कडी
लेवविली जातील आणि त्यांचा पालनकर्ता त्यांना पवित्र (शुद्धीकारक) मद्य पाजवील.
-मं० ७। सि० २९। सू० ७६। आ० १९। २१।।
(समीक्षक) काय हो, मोत्यांसारखा
रंग असणारी मुले स्वर्गात कशासाठी ठेवली जातात ? तरुण
(प्रौढ) लोकांकडून केली जाणारी सेवा व स्त्रिया ही त्यांना तृप्त करू शकत नाहीत
काय? दुष्ट लोक किशोर वयाच्या मुलांशी जे महाभयंकर अनैसर्गिक
कृत्य करतात त्याचे मूळ कुराणाच्या या वचनात असल्यास काय आश्चर्य? तसेच, स्वर्गामध्ये स्वामी-सेवक भाव असल्याने
स्वामीला आनंद मिळतो आणि सेवकाला कष्ट करावे लागल्याने दुख भोगावे लागते. असा
पक्षपात का केला जातो? आणि जेव्हा ख़ुदा स्वत:च मद्य पाजील
तेव्हा तो नोकरासारखा होईल. मग खुदाचे श्रेष्ठत्व ते काय राहिले? स्वर्गामध्ये स्त्रीपुरुषांचा समागम, गरोदरपण आणि
मुलेबाळे होणे या गोष्टी होतात की नाही? जर मुलेबाळे होत नसतील
तर त्यांचे विषयसेवन करणे व्यर्थ ठरते आणि जर ती होत असतील तर ते जीव कोठून येतात ?
आणि खुदाची सेवा न करताच त्यांचा स्वर्गात जन्म झाल्याने
स्वर्गप्रासी कशी होते? जर त्यांचा जन्म तेथे होत असेल तर
इस्लामचा स्वीकार न करता आणि खुदाची भक्ती न करताही त्यांना मोफत स्वर्ग मिळतो.
काही बिचाऱ्यांना मुस्लिम पंथाचा स्वीकार केल्यामुळे व काहींना पंथाचा स्वीकार न
करता सुख मिळणे याहून दुसरा मोठा अन्य कोणता असेल ? ॥१५२॥
(१५३) (हा त्यांच्या कर्माचा) पुरेपूर मोबदला
(होय) व (प्यावयास पवित्र मद्याचे) ओतप्रोत भरलेले प्याले. त्या दिवशी जिब्रील व
(इतर) दूत व (त्याच्या हुजुरात) रांगे-रांगेने उभे राहतील. -मं० ७। सि० ३०। सू०
७८। आ० २६। ३४। ३८।।
(समीक्षक) कर्मानुसार फळे दिली जात असतील तर
सदा स्वर्गात राहणाऱ्या अप्सरा, देवदूत व मोत्यांसारखे मुलगे
यांना त्यांच्या कोणत्या कर्मानुसार सदैव राहण्यासाठी स्वर्ग मिळाला? तेथे प्याले भरभरून दारू पितील तर त्या नशेत ते आपसात का भांडणार नाहीत ?
स्वर्गातील एका देवदूताचे नाव रुह (आत्मा) असे आहे. तो सर्व
देवतांचा दादा आहे. रुह आणि इतर देवदूत यांना रांगेत उभे करून खुदा त्यांची फलटण
तयार करणार आहे काय? त्या फलटणीकडून तो सर्व जीवांना शिक्षा
देणार आहे काय ? त्यावेळी खुदा उभा असेल की बसलेला? न्यायनिवाड्याच्या दिवसापर्यंत खुदा आपली सगळी फलटण एकत्र करून सैतानाला
पकडील तर त्याचे राज्य निष्कंटक होईल. त्याला म्हणतात ईश्वरत्व! ॥१५३॥
(१५४) ज्यावेळी सूर्या (च्या प्रकाशपटलास)
गुंडाळले जाईल व जेव्हा तारे निस्तेज होतील आणि ज्यावेळी पर्वत (आपल्या जागेवरून)
चालविले जातील व जेव्हा आकाशाचे कातडे काढले जाईल. -मं० ७। सि० ३०। सू० ८१। आ० १।
२। ३। ११।।
(समीक्षक) गोल सूर्यलोक गुंडाळला जाईल ही
कल्पना अत्यंत अज्ञानजन्य आहे आणि तारे निस्तेज कसे होतील? पर्वत
जड (अचेतन) असल्यामुळे ते कसे चालतील? आणि कातडे सोलून
काढायला आकाश हा काय एखादा प्राणी आहे काय ? ही अत्यंत
अडाणीपणाची व जंगलीपणाची कल्पना आहे.॥१५४॥
62
(१५५) जेव्हा आकाश फाटून जाईल, आणि तारे झडून पडतील व जेव्हा नद्या उकळून वाहू लागतील आणि जेव्हा थडगी
उखडून टाकली जातील. -मं० ७। सि० ३०। सू० ८२। आ० १। २। ३। ४।।
(समीक्षक) कुराणकाराचे हे तत्त्वज्ञान मोठे
विचित्र आहे. आकाश कसे फाडता येईल ? तारे कसे झाडून टाकता
येतील ? समुद्राला चिरून टाकायला ते काय लाकूड आहे? आणि थडगी जिवंत करायला ती काय प्रेते आहेत? या
सगळ्या अगदी बालिश गोष्टी आहेत. ॥१५५॥
(१५६) आकाश, ज्यात घुमट
आहेत, त्याची शपथ. तर हे महनीय कुराण होय. (व ते आमच्या
येथे) सुरक्षित पत्रक (मध्ये हुबेहूब लिहिलेले आहे.) -मं० ७। सि० ३०। सू० ८५। आ०
१। २१। २२।।
(समीक्षक) हे कुराण रचणाऱ्याने भूगोल व खगोल
यांचा मुळच अभ्यास केलेला नव्हता. नाहीतर आकाश हे बुरुज असणाऱ्या किल्ल्यासारखे
आहे असे त्याने का म्हटले असते ? तो मेषादी राशींना बुरुज
म्हणत असेल तर इतर बुरुज का नाहीत ? वस्तुतः ते बुरुज नसून
सर्व तारे लोक आहेत. हे कुराण खुदाने लिहिले आहे काय ? जर ते
त्याने लिहिले असेल तर तोही विद्या (ज्ञान) व तर्कशास्त्र यांना पारखा झालेला व
अविद्येने भरलेला असावा. ॥१५६॥
(१५७) नि:संशय हे (नास्तिक तर आपले) डावपेच
लढवीत आहेत आणि मी (आपले डावपेच करीत आहे.) -मं० ७। सि० ३०। सू० ८६। आ० १६।१७।।
(समीक्षक) 'मकर'
म्हणजे लबाडी, ठकबाजी. खुदाही ठक आहे काय ?
आणि चोरीचे उतर चोरी आणि असत्याचे उत्तर असत्य आहे काय? एखाद्या चोराने एखाद्या सज्जनाच्या घरी चोरी केली तर त्या सज्जन माणसाने
त्या चोराच्या घरी जाऊन चोरी करावी काय ? वाहवा! हे
कुराणकर्त्या तु धन्य आहे !॥१५७॥
(१५८) आणि (हे पैगंबरा!) तुझा पालनकर्ता येऊन
विराजमान होईल दूत रंगरंगांनी (त्याच्या पुढे उभे राहतील) आणि त्या दिवशी 'जहन्नम' नरकाग्नी
(सर्वांच्या समक्ष) आणून हजर केला जाईल. -मं० ७। सि० ३०। सू० ८९। आ० २१।
२२।।
(समीक्षक) आता बोला! जसा एखादा कोतवाल किंवा
सेनापती आपल्या शिपायांच्या रांगा तयार करून त्यांच्याकडून कवाईत करवून घेतो तसाच
यांचा खुदा आहे काय ? नरक ही काय एखादी घागर आहे की, जी घेऊन इकडे-तिकडे जाता येईल; नरक जर इतका लहान
असेल तर त्यात असंख्य कैदी कसे मावतील?॥१५८॥
(१५९) यावर परमेश्वराचा पैगंबर (सालेह) याने
त्यास बजावले की, परमेश्वराच्या सांडणीला (हात लावू नका);
आणि तिचे पाणीही (बंद करू नका) यावरही त्या लोकांनी सालेहला पाखंडी
म्हटले आहे व सांडणीला मारून टाकले. तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने त्यांच्या
पापाबद्दल त्यांचा नाश केला. -मं० ७। सि० ३०। सू० ९१। आ० १३। १४।।
(समीक्षक) काय खुदाही उंटणीवर बसून सहल करतो ?
नाहीतर त्याने ती कशाला बाळगली आणि आपला नियम मोडून
न्यायनिवाड्याच्या दिवसापूर्वीच त्याने त्या लोकांना महामारीस बळी का पडले?
त्याने त्यांना रोग ग्रस्त बनविले, म्हणजे
शिक्षा दिली. याचा अर्थ असा की, न्याय निवाड्याची रात्र व
त्या रात्री न्यायनिवाडा केला जाणे या गोष्टी खोट्याच ठरल्या. शिवाय या उंटिणीशी
संबंधित आयतीवरून असेही
63
अनुमान नियते की अरबस्तानात उंटव
सांडणी यांच्याखेरीज ज्यांच्यावर बसून जाता येईल असे पशु फार कमी आहेत. यावरून असे
सिद्ध होते की, हे कुराण
अरबस्तानातील एखाद्या रहिवाशाने लिहिले आहे.॥१५१॥
(१६०) पाहा हो ! जर तो (आपल्या कृत्यांपासून)
पराङ्मुख न होईल तर आम्ही त्याच्या डोक्याचे केस धरून फरफटत ओढू (म्हणजे ) त्या
लबाड, पापी (चांडाळ) चे केस (तसेच) आम्हीही (आपल्या)
नरकाच्या दूतांना (त्याच्या पारिपत्यासाठी) बोलावून घेऊ. -मं० ७। सि० ३०। सू० ९६।
आ० १५। १६। १८।।
(समीक्षक) एखाद्याला फरफटत ओढण्याचे काम
खालच्या दर्जाच्या नोकराचे असते. पण ते काम करण्यापासून खुदाचीही सुटका झाली नाही.
मस्तकही कधी खोटारडे व अपराधी असू शकते काय ? केवळ जीवच तसा
असू शकतो. जसा एखादा तुरुंगाधिकारी आपल्या रक्षकाना (वार्डरांना ) बोलावून घेतो
तसा जो नरकाच्या दूतांना बोलावून घेतो तो कधीतरी खुदा असू शकेल काय ? ॥१६०॥
(१६१) आम्ही कुराणा (च्या प्रथम
प्रकटीकरणाला) कद्रच्या रात्री उतरविले आणि (हे पैगंबरा!) तू समजलास की कद्रची
रात्र म्हणजे काय ? त्या रात्री (पुढील सालाच्या) प्रत्येक
व्यवस्थेसाठी देवदूत व पवित्रात्मा (रूह) हे आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेने
(पृथ्वीवर) उतरतात -मं० ७। सि० ३०। सू० ९७। आ० १। २। ४।।
(समीक्षक) जर संपूर्ण कुराण एका रात्रीत
प्रकट झाले (स्फुरले) असेल तर त्यातील एखादी विशिष्ट आयत (ओवी) एका विशिष्ट वेळीच
स्फुरली असे ठामपणे कसे सांगता येईल ? रात्र काळोखी असते यात
सांगण्यासारखे काय आहे? आम्ही यापूर्वी सांगितलेच आहे की,
अवकाशामध्ये वर आणि खाली असे काही नसते. परंतु येथे असे म्हटले आहे
की, देवदूत व पवित्रात्मा खुदाच्या आज्ञेवरून जगाची व्यवस्था
ठेवण्यासाठी येत असतात. यावरून असे स्पष्ट दिसून येते की, खुदा
हा माणसाप्रमाणे एकदेशी आहे. आतापर्यंत कुराणामध्ये खुदा, देवदूत
व पैगंबर यांचाच उल्लेख येत होता. आता एका चौथ्या पवित्रात्म्याची त्यात भर पडली.
हा चौथा पवित्रात्मा हे काय प्रकरण आहे ते काही कळत नाही. ख्रिस्ती पंथात पिता,
पुत्र व पवित्रात्मा ही त्रिपुटी आहे. तिच्यात या चौथ्याची भर
घालण्यात आलेली दिसते. जर तुम्ही (मुसलमान) असे म्हणत असाल की, आम्ही या तिघांना खुदा मानीत नाही, तर ते असो. परंतु
तर पवित्रात्मा हा इतरांहून पूर्णपणे वेगळा असेल तर खुदा, देवदूत
व पैगंबर यांना पवित्रात्मे म्हणता येईल की नाही? जर ते
पवित्र आत्मे असतील तर मग एकाचेच नाव पवित्रात्मा असे का असावे? तसेच हा खुदा दिवस, रात्र, घोडे
वगैरे जनावरे आणि कुराण इत्यादींच्या शपथ घेतो. वस्तुतः शपथ घेण-देणे हे भल्या
माणसांचे काम नाही. ॥१६१॥
आता कुराणातील उपदेशासंबंधी माझे
म्हणणे मी थोडक्यात विचारवंतासमोर मांडतो. हा ग्रंथ कसा आहे याचा निर्णय त्यांनी
करावा. मला विचाराल तर मी असे सागेन की, हे पुस्तक ईश्वरकृत नाही, कोण्या विद्वानाने रचलेले
नाही व त्यात ज्ञानाच्या गोष्टीही नाहीत. या ग्रंथातील अनेक दोषांपैकी काही थोडेच
दोष आम्ही दाखविले आहेत. हेतू एवढाच की लोकांची फसगत होऊन त्यांनी आपला जन्म वाया
घालवू नये. यामध्ये जो थोडा सत्यांश आहे तो वेदांच्या शिकवणीशी व शास्त्रीय
ग्रंथांतील विचारांशी मेळ खाणारा असल्याने जसा मला ग्राह्य वाटतो तसाच तो इतर
पंथांच्या निराग्रही व निष्पक्ष विद्वानांना ग्राह्य वाटेल. तेवढा भाग वगळल्यास या
ग्रंथामध्ये इतर जे काही आहे ते सर्व अज्ञानाने परिपूर्ण असे भ्रमाचे जाळेच आहे.
हे लिखाण माणसांच्या
64
आत्म्याला पशुवत् बनवून शांतताभंग
करविते, दंगेधोपे माजविते आणि माणसांमध्ये
परस्परांविषयी विद्वेष पसरविते आणि त्यांच्या दु:खात भर घालते. पुनरुक्तीच्या
दोषाचे तर कुराण हे जणू भांडारच आहे. परमेश्वराने सर्व मानवांवर कृपा करावी आणि
सर्वांना एकमेकांशी प्रेमाने वागण्याची व परस्परांच्या सुखात भर घालण्याची प्रेरणा
द्यावी. जसा मी आपले व इतर मत-पंथांच्या लोकांचे दोष निष्पक्षपणे व्यक्त करतो तसे
इतर सर्व विद्वान लोक करतील तर लोकांचा परस्परांतील विरोध नाहीसा होऊन, त्यांचे मनोमीलन घडून येऊन आनंदाने व एकमताने सत्याची प्राप्त करून
घेण्यात कसलीच अडचण येणार नाही.
अशा प्रकारे कुराणाविषयी हे थोडेसे
लिहिले. बुद्धिमान व धार्मिक वृत्तीच्या लोकांनी ग्रंथकाराचा अभिप्राय समजून घेऊन
त्याचा लाभ घ्यावा. जर कोठे भ्रमाने चुकले असेल तर शुद्ध करून घ्यावे.
आता शेवटी एकच गोष्ट सांगावयाची
राहिली आहे. ती अशी की, पुष्कळसे
मुसलमान असे म्हणतात, लिहितात अथवा छापतात की, आमच्या पंथाचा उल्लेख अथर्ववेदात आलेला आहे. त्याचे उत्तर असे की, अथर्ववेदात इस्लामचा नामोल्लेखही नाही.
(प्रश्न) तुम्ही संपूर्ण अथर्ववेद वाचला आहे
काय ? जर वाचला असेल तर त्यातील अल्लोपनिषद पाहा. त्यामध्ये
ही गोष्ट स्पष्ट शब्दात सांगितलेली आहे. मग अथर्ववेदात मुसलमानांचा नामोल्लेखही
नाही असे का म्हणता?
अथाल्लोपनिषदं व्याख्यास्यामः ।
अस्मांल्लां इल्ले मित्रवरुणा
दिव्यानि धत्ते। इल्लल्ले वरुणो राजा पुनर्द्ददु ।
ह या मित्रे इल्लां इल्लल्ले
इल्लां वरुणो मित्रस्तेजस्काम ।।१।।
होतारमिन्द्रो होतारमिन्द्र
महासुरिन्द्रा ।
अल्लो ज्येष्ठं श्रेष्ठं परमं
पूर्णं ब्रह्माणं अल्लाम्।।२।।
अल्लोरसूलमहामदरकबरस्य अल्लो
अल्लाम्।।३।।
आदल्लाबूकमेककम्।। अल्लाबूक
निखातकम्।।४।।
अल्लो यज्ञेन हुतहुत्वा। अल्ला
सूर्यचन्द्रसर्वनक्षत्र ।।५।।
अल्ला ऋषीणां सर्वदिव्याँ इन्द्राय
पूर्वं माया परममन्तरिक्षा ।।६।।
अल्ल पृथिव्या अन्तरिक्षं
विश्वरूपम्।।७।।
इल्लां कबर इल्लां कबर इल्लाँ
इल्लल्लेति इल्लल्ला ।।८।।
ओम् अल्ला इल्लल्ला अनादिस्वरूपाय
अथर्वणा श्यामा हुं ह्रीं
जनानपशूनसिद्धान् जलचरान् अदृष्टं
कुरु कुरु फट्।।९।।
असुरसंहारिणी हुं ह्रीं
अल्लोरसूलमहमदरकबरस्य अल्लो अल्लाम्
इल्लल्लेति इल्लल्ला ।।१०।।
इत्यल्लोपनिषत् समाप्ता।।
यामध्ये प्रत्यक्ष मुहम्मद साहेब
हे रसूल (पैगंबर) असल्याचे लिहिले आहेयावरून इस्लाम हा वेदमूलक आहे असे सिद्ध
होते.
(उत्तर) तुम्ही अथर्ववेद वाचला नसेल तर
आमच्याकडे या. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो वाचून पाहा. अथवा कोणाही अथर्ववेदी
गृहस्थाकडे जा आणि त्यांच्या जवळ बसून वीस कांडे असलेल्या अथर्ववेदाची मंत्रसंहिता
वाचा. त्यामध्ये तुम्हांला कोठेही पैगंबर साहेबांचे नाव अथवा इस्लामचा उल्लेखही
आढळणार
65
नाही. हे जे अल्लोपनिषद आहे ते
अथर्ववेदात, त्याच्या गोपथ
ब्राह्मणात अथवा इतर कोणत्याही शाखेत नाही. असे अनुमान आहे की, अकबर बादशहाच्या काळी हे उपनिषद कोणीतरी रचले असावे हे रचणारा इसम थोडीफार
अरबी व थोडीशी संस्कृत शिकलेला असावा असे दिसते. कारण यात आरबीची व संस्कृतची पदे
(शब्द) लिहिलेला आढळतात. पाहा! ‘अस्माल्लां इल्ले मित्रवरुणा दिव्यानि धत्ते’
--इत्यादीमध्ये दहा श्लोक बनविले आहेत. यातील ‘अस्माल्लां और इल्ले’ ही अरबीची आणि ‘मित्रवरुणा दिव्यानि धत्ते ‘ही
संस्कृतची पदे आहेत. याचप्रमाणे सर्वत्र अरबी व संस्कृत यांचे मिश्रण केलेले
दिसते. यावरून अरबी व संस्कृत शिकलेल्या कोण्यातरी व्यक्तीने त्याची रचना केली
असावी असे दिसते. याचा अर्थ पाहिल्यास तो कृत्रिम, तर्क
विसंगत आणि वेद व व्याकरण यांच्या रीतीविरुद्ध असल्याचे आढळून येते. या
उपनिषदाप्रमाणेच इतरही मतमतांतरांच्या अभिमान्यांनी आपापली पुष्कळ उपनिषदे रचली
आहेत. उदाहरणार्थ, स्वरोपनिषद्, नृसिंहतापनी,
रामतापनी, गोपालतापनी वगैरे.
(प्रश्न) आता तुम्ही जे म्हणत आहात तसे
आजपर्यंत कोणीही म्हटलेले नाही. मग तुमचे म्हणजे कसे खरे मानावे?
(उत्तर) तुम्ही मानल्याने अथवा न मानल्याने
आमचे म्हणणे खोटे ठरत नाही. ज्याप्रकारे मी हे विधान चूक असल्याचे दाखवून दिले आहे
त्याप्रकारे तुम्ही अथर्ववेद, गोपथ अथवा त्याच्या शाखांच्या
प्राचीन लिखित ग्रंथांमध्ये अल्लोपनिषदाचा उल्लेख असल्याचे आणि मूळ ग्रंथाशी
त्याचा अर्थ सुसंगत असल्याचे दाखवून द्याल तर तुमचे म्हणणे सप्रमाण सिद्ध होऊ
शकेल.
(प्रश्न) पाहा! आमचा पंथ किती चांगला आहे की,
त्यायोगे सर्व प्रकारची सुखे मिळतात व शेवटी मुक्तीही मिळते,
(उत्तर) सर्वच मतांचे व पंथाचे लोक असेच
म्हणतात की, आमचा मत-पंथ तेवढा चांगला असून इतर मत-पंथ वाईट
आहेत; आणि आमच्या पंथाखेरीज इतर पंथांतील लोकांना मोक्ष मिळू
शकत नाही. आता आम्ही तुमचे म्हणणे खरे मानावे की त्यांचे? आम्ही
तर असे मानतो की सत्य भाषण, अहिंसा, दया
इत्यादी शुभ गुण कोणत्याही पंथातील असले तरी ते चांगले आहेत आणि दुराग्रहपूर्ण
वाद-विवाद, ईर्ष्या, दोष, मिथ्या-भाषण वगैरे गोष्टी कोणत्याही पंथातील असल्या तरी त्या वाईट आहेत.
तुमची इच्छा सत्य धर्म ग्रहण करावा अशी असेल तर तुम्ही वैदिक मताचा स्वीकार करा.
यानंतर 'स्वमन्तव्यामन्तव्य' थोडक्यात
लिहिणार आहोत.
इति
श्रीमद्वयानन्दसरस्वतीस्वामिकृते सत्यार्थप्रकाशे
सुभाषा विभूषिते यवनमतविषये
चतुर्दशः समुल्लासः सम्पूर्णः
।।१४।